Contact Lens : पावसाळ्यात लेन्स वापरणे टाळा! मुंबईत दररोज आढळताहेत २०० रुग्‍ण

पावसाळा हा ऋतू जितका आल्हाददायक वाटतो तितकाच डोळ्यांसाठी आणि शरीरासाठीही घातक असतो.
Contact Lens
Contact Lenssakal
Updated on

मुंबई - पावसाळा हा ऋतू जितका आल्हाददायक वाटतो तितकाच डोळ्यांसाठी आणि शरीरासाठीही घातक असतो. डॉक्टरांच्या मते, पावसाळ्यात कोणीही कॉन्टॅक्ट लेन्स घालू नये, कारण त्यामुळे अंधत्व येऊ शकते. रुग्णालयातून मिळालेल्या आकडेवारीनुसार, पावसाळ्यात मुंबईत डोळ्यांच्या संसर्गाशी संबंधित सुमारे २०० प्रकरणे समोर येत आहेत, त्यापैकी २५ टक्के म्हणजेच ५० रुग्ण कॉन्टॅक्ट लेन्सशी संबंधित समस्यांसाठी डॉक्टरांकडे उपचारासाठी पोहोचत आहेत.

पावसाळ्यामध्ये घरातून बाहेर पडताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पावसाळ्यात बॅक्टेरियासह अनेक प्रकारचे विषाणू मानवी शरीरावर आक्रमण करतात. आपल्या त्वचेत आणि डोळ्यांमध्ये संसर्ग सर्वाधिक पसरतो. काहींना पावसात ओलावा आणि पाण्यामुळे चष्मा घालण्याचा त्रास होतो. या कारणास्तव ते चष्म्याऐवजी कॉन्टॅक्ट लेन्स घालणे पसंत करतात. बरेच लोक फक्त छंद म्हणून कॉन्टॅक्ट लेन्स वापरतात, पण पावसात कॉन्टॅक्ट लेन्स घातल्याने संसर्ग होण्याचा धोका असतो, असे नेत्रतज्‍ज्ञांनी सांगितले.

पावसात कॉन्टॅक्ट लेन्स घातल्याने संसर्ग

मुंबईतील नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. शशी कपूर म्हणाले की, पावसाळ्यात अनेक विषाणू, जीवाणू आणि इतर संसर्ग होण्याचा धोका इतर कोणत्याही ऋतूपेक्षा दुप्पट असतो. हवेतील ओलावा अधिक हानिकारक जीवाणू पसरवतो, ज्यामुळे डोळ्याच्या फ्लूसह अनेक आजार होतात. पावसात कॉन्टॅक्ट लेन्स वापरल्यास डोळ्यांना संसर्ग होण्याचा धोका असतो. पावसाचे पाणी कॉन्टॅक्ट लेन्सच्या आत जाते आणि त्यातून परिणाम होतो.

...तर कॉर्निया प्रत्यारोपणाची गरज

डॉ. कपूर म्हणाले की, कॉन्टॅक्ट लेन्समुळे संसर्ग होण्याची अनेक कारणे असू शकतात. पावसाळ्यात ‘अकांथामोएबा’ नावाचे छोटे जीव पाण्यात राहतात. पाण्यात कॉन्टॅक्ट लेन्स घातल्यास ते डोळ्यांना सहज संक्रमित करू शकतात. परजीवीदेखील एक कारण आहे. परजीवी सामान्यतः गरम पाण्याच्या टबमध्ये आढळतात, त्यामुळे अशा परिस्थितीत कॉन्टॅक्ट लेन्स घालू नका. या परजीवीमुळे होणारा आजार केरायटिसवर उपचार करणे फार कठीण आहे. हा आजार झाल्यास कॉर्निया प्रत्यारोपणाची आवश्‍यकता असते.

डोळ्यांपर्यंत ऑक्सिजन पोहोचत नाही

पावसात डोळ्यांपर्यंत पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन पोहोचत नाही, असे डॉ. कपूर यांनी सांगितले.  कॉन्टॅक्ट लेन्स प्लास्टिकपासून बनवल्यामुळे डोळ्यांना ऑक्सिजनचा पुरवठा विस्कळित होतो. अशावेळी आपण प्रतिजैविकांचा वापर केल्यास ते डोळ्यांच्या कॉर्नियापर्यंतही पोहोचत नाहीत. त्यामुळे डोळ्यांमध्ये संसर्ग झपाट्याने पसरतो. अनेक प्रकरणांमध्ये दृष्टी गमावण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत लोकांनी पावसाळ्यात कॉन्टॅक्ट लेन्स घालू नयेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.