Mumbai Rain Update : बारवी धरण 60 टक्के भरले; मुसळधार पावसाने पाणी पातळीत वाढ

Barvi Dam Latest news | बारवी धरणातील पाणी साठ्यात वाढ होत असून गुरुवारी सकाळपर्यत यातील पाणीसाठ्यात 60 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.
barvi dam 60 percent water storage due to heavy rains in mumbai dombivli
barvi dam 60 percent water storage due to heavy rains in mumbai dombivliSakal
Updated on

डोंबिवली - गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. नदी नाले दूथडी भरून वहात असताना जिल्ह्याची तहान भागवणारे बारवी धरण कधी भरते याकडे मात्र साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. बारवी धरणातील पाणी साठ्यात वाढ होत असून गुरुवारी सकाळपर्यत यातील पाणीसाठ्यात 60 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

गेल्या 24 तासात बारावी धरणक्षेत्रात 154 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे धरणात 206.67 घन मीटर पाणीसाठा होता. पाऊस असाच सुरू राहिल्यास जुलै अखेर किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला बारवी धरण भरेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्वच जलाशयातील पाणीसाठा वाढला आहे. ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शहरांना बारवी धरणातून पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरणे आवश्यक आहे. यंदाच्या वर्षात बारवी धरणातील पाणीसाठा 25 टक्क्यांपर्यंत खाली आला होता.

मात्र सुदैवाने पाणी कपात करण्याची वेळ आली नाही. जून महिन्यापासून पाऊस सुरू झाला असला तरी धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस होत नव्हता. त्यामुळे बारवी धरण संथगतीने भरत होते. मात्र गेल्या आठवड्यापासून बारवी धरण क्षेत्र परिसर, मुरबाड तालुका आणि आसपासच्या भागात संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे बारवी धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होत आहे.

बुधवारी दिवसभर बारवी पणालोट क्षेत्रात 154 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणात 206.67 घन मीटर पाणीसाठा झाला. तर धरणाने 67.40 मीटर इतकी उंची गाठली. त्यामुळे गुरुवारी धरण 60.99 टक्के इतके भरले आहे.

barvi dam 60 percent water storage due to heavy rains in mumbai dombivli
Dombivali Blast: डोंबिवली MIDC मधील त्या कंपन्या स्थलांतरीत होणार की नाही? प्रश्न चिघळला

बुधवारी धरणात 54 टक्के इतका पाणीसाठा होता. त्यामुळे एका दिवसात तब्बल 6 टक्के पाणी धरणात वाढले आहे. गेल्या आठवडाभरात बारवी धरणाचा पाणीसाठा 44 टक्क्यांवरून 60 टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा धरण संथगतीने भरते आहे. गेल्या वर्षी 25 जुलै रोजी धरणात 76 टक्के पाणी साठा होता.

गुरुवारीही संततधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे बारवी धरणात समाधानकारक पावसाची अपेक्षा आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास जुलै महिना अखेर पर्यत किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला बारवी धरण भरेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.