'या' महामार्गावर चार महिन्यात 12 ठार तर, 28 जण जखमी; काँग्रेसने आंदोलन करत खानिवडे टोलनाका पाडला बंद

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Ahmedabad National Highway) गेल्या चार महिन्यांपासून सीमांत काँक्रिटीकरणाचे काम सुरु आहे.
Mumbai-Ahmedabad National Highway
Mumbai-Ahmedabad National Highwayesakal
Updated on
Summary

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गेल्या चार महिन्यात १२ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास २८ जण गंभीर जखमी झाले आहेत.

विरार : चार महिन्यापासून रेंगाळत सुरु असलेले काँक्रिटीकरण, महामार्गावर होत असलेले अपघात, त्याचबरोबर वारंवार खचणारा महामार्ग आणि रस्त्याच्या कामामुळं होणारी वाहतूक कोंडी या विरोधात आज काँग्रेसचे (Congress) प्रदेश पर्यावरण विभागाचे अध्यक्ष समीर वर्तक यांच्या नेतृत्वाखाली खानिवडा टोलनाका बंद पाडण्यात आला. याबाबत महामार्गावरील ठेकेदार आणि महामार्ग प्राधिकरणाच्या (Highway Authority) अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Ahmedabad National Highway) गेल्या चार महिन्यांपासून सीमांत काँक्रिटीकरणाचे काम सुरु आहे. परंतु, या कामामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. तसेच डांबरी रस्ता व्यवस्थित असताना ठेकेदाराचे खिसे भरण्यासाठी हे काम सुरु केल्याचा आरोप वर्तक यांनी केला असून हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचाही आरोप त्यांनी केला.

Mumbai-Ahmedabad National Highway
जयभीम नगरातील झोपड्यांवर मुंबई महानगरपालिकेचा 'बुलडोझर'; भरपावसात भिजत रहिवाशांना काढावी लागली रात्र

या महामार्गावर गेल्या चार महिन्यात १२ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास २८ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातील जबाबदार अधिकारी आणि कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, असे पत्र चार पोलीस ठाण्यात देण्यात आले होते. तर, आज सकाळी खानिवडे येथील टोलनाका काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बंद पडल्याने काही काळ येथील वातावरण तणावपूर्ण झाले होते. जो पर्यंत गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत आपण मागे हटणार नाही, असा पवित्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतला होता.

यावेळी समीर वर्तक, टोनी डाबरे, अमर पटेल, डेरिक फुर्ट्याडो, टायस फर्नांडिस, अभिजित घाग, निझाम खान उपस्थित होते. या आंदोलनाच्या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाचे ठाण्यातील अधिकारी सुहास चिटणीस यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. दरम्यान, महामार्गावरील अपघातात जीव गेलेल्या नातेवाईकांना घेऊन वर्तक यांनी मांडवी पोलीस ठाण्यात ठेकेदार आणि महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाची तक्रार दाखल केलीये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com