मुंबई - महाराष्ट्र विकास आघाडीकडून आज दिवसभर महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तहसील कार्यकत्यांसमोर शेतकरी कर्जमाफी आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी धरणं आंदोलन करण्यात आलं. याच पार्श्वभूमीवर मुंबईत आझाद मैदानावर देखील भाजपकडून आंदोलन करण्यात आलं. या मुंबईतील आंदोलनात भाजपच्या बड्या नेत्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, विनोद तावडे, आशिष शेलार याचसोबत अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते.
मोठी बातमी - नाहीतर गुरं-ढोरं आणि पोरांसह 'मातोश्री'वर धडक देऊ...
यानंतर आता विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोल्हापुरातील पन्नास हजार शेतकऱ्यांच्या सह्यांची पत्र घेऊन राज्यपालांच्या भेटीला गेलेत. यामध्ये काही पत्र शेतकऱ्यांनी रक्ताने लिहिलीयेत. सरसकट कर्जमाफी करावी आणि सातबारा कोरा करावा या आशयाची ही पत्र आहेत. भाजपचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी ही पत्र आणली आहेत. पुठ्ठ्याच्या अनेक बॉक्समधून ही पत्र राज्यपालांकडे सुपूर्त केली गेलीत. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मोठी बातमी - अबब...! पोटात निघालं पावणेदोन कोटींचं 'हे' घबाड!
काय म्हणालेत देवेंद्र फडणवीस :
farmers lone wavier fadanavis submits sixty thousand letters governor
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.