High Court: त्या ८० मुलांच्या मृत्यूला जवाबदार कोण? राज्य सरकारला सवाल

Maharasthra School Education News: मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
Published on

Mumbai latest news: राज्यभरातील आश्रमशाळांच्या दयनीय अवस्थेप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. याप्रकरणी मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठाने राज्यभरातील आश्रमशाळेत आतापर्यंत झालेल्या ८० मुलांच्या मृत्यूला जबाबदार कोण, असा सवाल राज्य सरकारला केला आहे.

राज्यभरातील आश्रमशाळांची बिकट अवस्था आहे. मुलींना पायाभूत सुविधा मिळत नसल्याने रवींद्र तळपे यांनी याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर बुधवारी (ता. ९) मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

High Court: त्या ८० मुलांच्या मृत्यूला जवाबदार कोण? राज्य सरकारला सवाल
Mumbai High Court: खड्डे बुजवण्यासाठी आतापर्यंत काय केले? महामुंबईतील पालिकांना न्यायालयाचा सवाल

या वेळी आश्रमशाळांच्या परिस्थितीबद्दल खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. तुम्ही कधी अशा संस्थांना भेट दिली आहे, कृपया अशाच संस्थेत जाऊन मुलांची दुर्दशा पाहा. कुठल्यातरी आश्रमात जाऊन तुम्हाला परिस्थितीची जाणीव होईल, असे खंडपीठ म्हणाले. तसेच आश्रमशाळांसाठीच्या विविध योजना कागदावर असल्याने सरकारने याप्रकरणी सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.

High Court: त्या ८० मुलांच्या मृत्यूला जवाबदार कोण? राज्य सरकारला सवाल
Delhi High Court : मृत्यूनंतरही दिला जाऊ शकतो मुलाला जन्म... दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.