Kalyan News: मतदान यादीतून नाव गायब? तर इथे नोंद करा... दक्ष नागरिकांनी उचलले पाऊल

Kalyan News:
Kalyan sakal
Updated on

Dombavali News: कल्याण लोकसभा मतदारसंघात वर्षानुवर्षे मतदान करणाऱ्या मतदारांची नावेच मतदार यादीतून गायब झाल्याने मोठा गोंधळ उडाल्याचे सोमवारी पहायला मिळाले. यामध्ये सर्वसामान्य नागरिकच नाही तर माजी नगरसेवक, व्यावसायिक, उद्योजक, राजकीय पदाधिकारी यांची ही नावे वगळली गेल्याचे आढळून आले आहे.

काही मतदार हे विदेशातून मतदान करण्यासाठी खास आले होते, मात्र त्यांचेही नाव नसल्याने त्यांना मतदान करता आलेले नसल्याची बाब पुढे आली आहे.

याप्रकरणी मनसे तसेच दक्ष नागरिक संघटनेकडून मतदानापासून वंचित राहिलेल्या मतदारांची नावे नोंदवून घेतली जात आहेत. ही नावे निवडणूक आयोगाकडे सादर केली जाणार आहेत. त्यासोबतच निवडणूक आयोगाच्या या कार्यपध्दतीच्या विरोधात व्यावसायिक संदेश प्रभुदेसाई हे ॲड. मंगेश कुसुरकर यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत.

Kalyan News:
Kalyan News: देशाच्या विकासासाठी मतदार महायुतीच्याच बाजूने, विश्वनाथ भोईरांचे वक्तव्य

अॅड. कुसूरकर यासंदर्भात माहिती जमा करत असून न्यायालयीन सुट्टी संपताच ही याचिका दाखल केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कल्याण लोकसभा मतदारसंघात यंदा मतदारांची संख्या वाढली असून विक्रमी मतदानाची नोंद झाली आहे. असे असले तरी मतदार याद्यांतील नावाच्या घोळामुळे अनेक मतदार हे मतदानापासून वंचित राहीले आहेत. मतदार याद्यात नावच नसल्याने ज्येष्ठ, जुन्या मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता आलेला नाही.

सुमारे 80 हजाराहून अधिक मतदारांना याचा फटका बसल्याचे बोलले जात आहे. नाव वगळलेल्या मतदारांमध्ये अनेक मतदार हे वर्षानुवर्षे त्याच पत्त्यावर राहत आहेत. मात्र तरीही त्यांचे नाव मतदार यादीत नाही. घरातील 8 सदस्यांपैकी 3 लोकांची नावे आहेत तर बाकीच्यांची नावेच नाहीत असे चित्र सोमवारी ठिकठिकाणी आढळून आले. याप्रकरणी नागरिकांनी अधिकाऱ्यांकडे तक्रारी देखील केल्या परंतू त्यांच्या पदरी निराशाच पडली.

Kalyan News:
Kalyan News: देशाच्या विकासासाठी मतदार महायुतीच्याच बाजूने, विश्वनाथ भोईरांचे वक्तव्य

खुद्द लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी बूथवर जाऊन मतदारांची नावे शोधत होते, नावाच्या स्पेलिंगमध्ये उलट सूलट नाव टाकून तपासले जात होते, मात्र नावच नसल्याचे आढळून आले. यामुळे सर्वसामान्य नागरिक निराश झाले आहेत. याचा फटका केवळ सर्वसामान्य नागरिकांना नाही तर माजी नगरसेवक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांसोबतच व्यावसायिक, उद्योजकांचा देखील समावेश आहे.

डोंबिवलीत राहणारे व्यावसायिक संदेश प्रभूदेसाई यांनी यापूर्वी लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणूकांमध्ये मतदान केले आहे. यंदाच्या निवडणूकीत त्यांच्या कुटूंबातील सदस्यांचे मतदान यादीत नाव होते, मात्र त्यांचे नाव गायब असल्याचे त्यांना आढळून आले.

निवडणूक आयोगाच्या गलथान कारभारामुळे मतदान त्यांना करता आले नसल्याचे त्यांचे म्हणने आहे. असे अनेक जणांच्या बाबतीत झाल्याने मतदारांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका निवडणूक आयोगाच्या विरोधात ॲड. कुसुरकर यांच्या मार्फत दाखल ते करणार आहेत.

निवडणूक आयोगाकडे तक्रार

कल्याण, डोंबिवलीतील ज्या नागरिकांची नावे मतदार यादीतून गायब झाली आहेत. त्यांना लोकसभा निवडणुकीत मतदानापासून वंचित रहावे लागले. अशा नागरिकांंनी दक्ष संघटनेच्या माध्यमातून, सामाजिक कार्यकर्ते अक्षय फाटक यांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडे यासंंदर्भात तक्रारी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Kalyan News:
Kalyan News: कल्याण लोकसभा मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत 5.39 टक्के मतदान

या प्रक्रियेसाठी मतदानापासून वंचित नागरिकांकडून एक गुगल अर्ज भरून घेतला जात आहे. या तक्रार प्रकरणात सहभागी इच्छुकांंनी आपली माहिती 9870985910 या व्हाॅट्सप क्रमांकावर पाठविण्याचे आवाहन जागरूक संघटनेने केले आहे.

कल्याण लोकसभा क्षेत्रातील अनेक मतदार जे गेले अनेक वर्षे मतदान करत आहेत. त्यांची नावे यंदा गायब असल्याने त्यांना मतदानापासून वंचित रहावे लागले. याविषयी मनसेच्या वतीने एक उपक्रम राबविला जात आहे. प्रत्येक शाखेत हा उपक्रम राबविला जाणार असून अशा मतदारांची माहिती घेत नोंदणी केली जाणार आहे.

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांची नावे मतदार यादित समाविष्ट करण्याविषयी निवडणूक आयोगाला सांगणार आहोत असे मनसेचे माजी शहरप्रमुख मनोज घरत यांनी सांगितले.

Kalyan News:
Kalyan Lok Sabha : कल्याण लोकसभा मतदारसंघात झाले एकूण 50.12 टक्के मतदान; निवडणूक निर्णय अधिकारी सातपुतेंची माहिती

याचिकाकर्ते संदेश प्रभूदेसाई यांच्या माध्यमातून उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहोत. कल्याण डोंबिवली लोकसभेतील सर्वसामान्य नागरिकांचा मतदान करण्याचा न्याय हक्क डावलला गेला आहे. याला निवडणूक आयोग जबाबदार असून त्याबाबत आम्ही हायकोर्टात रिट पिटिशन दाखल करणार आहोत.

जवळ जवळ 86 हजार लोकांचे मतदान येथे झालेले नाही त्याचे कारण भारतीय निवडणूक आयोग आहे. त्यामध्येच आता सर्व मतदारांची नावे अॅड करणे निवडणूक होण्याबाबत फेर मतदान करण्याबाबत आदेश पारित करणे आणि जे तत्सम अधिकारी, कर्मचारी वर्गामुळे सदर घोळ हा घडलेला आहे किंवा भोंगळ कारभार निवडणूक आयोगाने केलेला आहे त्यांच्याबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आम्ही करणार आहोत.

ॲड. मंगेश कुसुरकर (वकील, डोंबिवली)

Kalyan News:
Kalyan News: शेवटच्या एका तासात चित्र पालटले, कल्याणमध्ये रेकॉर्ड ब्रेक मतदान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.