Ladki Bahin Yojana: उल्हासनगरात 3/4 हजार रुपये घेऊन दाखले बनवून देणारी टोळी सक्रिय!

Thane Crime: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेण्याची शक्यता,मनसेचे खळबळजनक निवेदन
Ladki Bahin Yojana: उल्हासनगरात 3/4 हजार रुपये घेऊन दाखले बनवून देणारी टोळी सक्रिय!
Ladki Bahin Yojanasakal
Updated on

Ulhasnagar Latest Update: महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राबवण्यात येत आहे.त्यासाठी रहिवाशी दाखला व उत्त्पन्नाचा दाखला बंधन कारक आहे.मात्र सेतू केंद्र गेल्या दिड वर्षांपासून बंद असल्याने तहसीलदार कार्यालयात दाखल्यांसाठी प्रचंड प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे.

Ladki Bahin Yojana: उल्हासनगरात 3/4 हजार रुपये घेऊन दाखले बनवून देणारी टोळी सक्रिय!
Ekanth Shinde: विद्यमान खासदारांना नकार मुख्यमंत्र्यांना पडणार महागात?; वाचा कसा होणार शिंदेंना तोटा

अशातच 3/4 हजार रुपये घेऊन दाखले बनवून देणारी टोळी सक्रिय झालेली आहे.त्यामुळे महिलांसाठीच्या या योजनेचा गैरफायद्या घेण्याची शक्यता निर्माण झाल्याचे खळबळजनक निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख,शहराध्यक्ष संजय घुगे यांच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा,तहसीलदार कल्याणी मोहिते यांना दिले आहे.

दाखले देतांना ती व्यक्ती खरोखर महाराष्ट्राची रहिवाशी आहे का? किती वर्षांपासून महाराष्ट्रात राहते?त्यांच्या आधारकार्ड वरील पत्ता हा महाराष्ट्राचा आहे का?त्यांनी जमा केलेले कागदपत्र खरे आहेत का? या सर्व कागदपत्रांची कसून तपासणी करण्याची मागणी जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख,शहराध्यक्ष संजय घुगे यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.यावेळी उपशहर अध्यक्ष सचिन बेंडके,रवी पाल,शैलेश पांडव,विभाग अध्यक्ष अक्षय धोत्रे,संकेत शिंदे उपस्थित होते.

Ladki Bahin Yojana: उल्हासनगरात 3/4 हजार रुपये घेऊन दाखले बनवून देणारी टोळी सक्रिय!
Eknath Shinde: "विजयराव तुम्ही काल नव्हते..." मुख्यमंत्र्यांचा विरोधी पक्षनेत्यांना चिमटा, विधानसभेत टोलेबाजी
Ladki Bahin Yojana: उल्हासनगरात 3/4 हजार रुपये घेऊन दाखले बनवून देणारी टोळी सक्रिय!
Eknath Shinde: "विजयराव तुम्ही काल नव्हते..." मुख्यमंत्र्यांचा विरोधी पक्षनेत्यांना चिमटा, विधानसभेत टोलेबाजी

दिड वर्षांपासून सेतू केंद्र बंद असल्याने नागरिकांची मोठया प्रमाणात गैरसोय होत आहे.त्यामुळे नागरिकांना नाईलाजास्तव एजंटचा सहारा घ्यावा लागत आहे.नागरिकांचे आर्थिक व मानसिक नुकसान होत आहे.सरकारी नियमानुसार 35 रुपये भरून शासकीय दाखला मिळायला हवा.पण एजंट करवी या दाखल्यासाठी एक हजार ते बाराशे रुपये मोजावे लागत आहेत.

अशातच ज्यांच्याकडे कोणतेही कागदपत्रे नाहीत अशा नागरिकांकडून 3 ते 4 हजार रुपये घेऊन दाखले बनवून देणारी टोळी सक्रिय झालेली आहे.त्यामुळे सेतूकेंद्र तात्काळ सुरु करून नागरिकांना दिलासा देण्यात यावा असे बंडू देशमुख,संजय घुगे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com