नितीन बिनेकर
मुंबई : मुंबईत लोकल आणि रेल्वे स्थानक परिसरात गर्दुल्ल्यांचे प्रवाशांवरील हल्ल्यांत वाढ झाली आहे. त्यामुळे या गर्दुल्ल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, कायद्यानेच रेल्वे पोलिसांचे हात बांधले गेल्याने गर्दुल्ल्यांवर कारवाई करताना अडथळे येत आहेत. भारतीय रेल्वे कायद्यातील १४४ बी हे कलम फौजदारी प्रकरणांतून वगळल्याने गर्दुल्ल्यांवरील कारवाईचा पेच निर्माण झाला आहे.