Mumbai: कल्याण - डोंबिवलीकरांनो... खड्ड्यांची तक्रार करा फोनद्वारे, या टोल फ्री क्रमांकावर साधा संपर्क

'या' खड्डयांमुळे एका दुचाकीस्वाराचा मृत्यु देखील झाला.
Mumbai
MumbaiSakal
Updated on

डोंबिवली - कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील रस्त्यांवर खड्डे पडून रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. खड्ड्यात खडी टाकून हे खड्डे बुजविण्याचे काम सुरु असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून केला जात असून ही कामे अत्यंत संथ गतीने सुरु असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांना खड्ड्यांमुळे भेडसावणाऱ्या तक्रारींची दखल घेणे व त्याचे निवारण करण्यासाठी पालिकेने नुकताच टोल फ्री क्रमांक जारी केला आहे.

Mumbai
Mumbai News : पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पालिका मुख्यालयातील दालनाचा वाद चिघळला

मागील वर्षी देखील ऑक्टोबर महिन्यात पालिकेला जाग येऊन हा टोल फ्री क्रमांक जारी करण्यात आला होता. यंदा नागरिकांच्या सेवेत लवकरच ही सेवा केडीएमसीकडून देण्यात आली असून शहरातील खड्ड्यांची समस्या या निमित्ताने सोडवली जाऊ शकते का ? हे आता पहावे लागेल.

कल्याण डोंबिवली शहरात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांवरुन केडीएमसी प्रशासन आणि पालिका अधिकाऱ्यांवर चौफेर टिका होत आहे. खड्डे भरण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे असा दावा पालिका प्रशासनाकडून केला जात आहे.

मात्र प्रत्यक्षात ही कामे संथ गतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. या खड्डयांमुळे एका दुचाकीस्वाराचा मृत्यु देखील झाला आहे. खड्ड्यांच्या समस्येच्या या पार्श्वभूमीवर पालिका हद्दीतील खड्ड्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी प्रशासनाने 18002330045 हा टोल फ्री क्रमांक नागरिकांसाठी जाहीर केला आहे.

नागरिकांनी आपल्या विभागातील खड्ड्यांविषयीच्या तक्रारी या टोल फ्री क्रमांकावर केल्यास तेथे त्या तक्रारीची नोंद करुन घेतली जाईल.

Mumbai
Amit Shah In Pune : अमित शहा तात्काळ त्यांच्यासाठी पुण्यात आले; कोण होते मदनदास देवी ?

तातडीने संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना तक्रारीचे ठिकाण देऊन संबंधित खड्डे बुजविण्याची कार्यवाही प्रशासनाकडून केली जाणार असल्याचे शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी स्पष्ट केले आहे.

मागील वर्षी देखील पावसाळ्यात कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांची दुरावस्था होऊन पालिका प्रशासनावर टिकेची झोड उठविण्यात आली होती. अखेर ऑक्टोबर महिन्यात पालिका प्रशासनाने खड्ड्यांच्या तक्रारी निवारण्यासाठी टोल फ्री क्रमांक जारी केला होता.

Mumbai
Mumbai News : पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पालिका मुख्यालयातील दालनाचा वाद चिघळला

यंदा जुलै महिना अखेरीस प्रशासनाला या टोल फ्री क्रमांकाची आठवण आली आहे. आता या क्रमांकावर किती तक्रारी नोंदविल्या जातात व त्याची पालिका स्तरावर काय दखल घेतली जाते हे पहावे लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.