Mumbai : विठ्ठला....! झोपलेल्या सरकारला जागे कर; टाळ-मृदंग वाजवून शेतकऱ्यांचे आंदोलन

Mumbai
Mumbai
Updated on

मुंबई : खेड, आंबेगाव व शिरूर तालुक्यातील कोरडवाहू गावांना वरदान ठरणाऱ्या कळमोडी प्रकल्पाला गती मिळावी.  तसेच  डिभे धरणातील जुन्नर, आंबेगाव व शिरूर तालुक्यांच्या हक्काचे पाणी बोगद्याद्वारे थेट नगर जिल्ह्यात पळवू पाहणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.  सोमवारपासून आझाद मैदानावर एल्गार

Mumbai
Mumbai News : हत्या करून आत्महत्येचा बनाव...! पोलिसांकडून दोघांना अटक

आंदोलन सुरू केले. गुरुवारी आषाढी एकादशीनिमित्ताने आझाद मैदानांवर ‘वारकरी टाळ-मृदंग वादन करून विठ्ठलाकडे आपल्या मागणीसाठी सरकराला जाग येऊ दे असे साकडे घातले आहे. 

आंबेगाव तालुक्यातील कळमोडी धरणाचे पाणी सातगाव पठार या भागातील शेतीला मिळावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे माजी गटनेते देविदास दरेकर यांच्या नेतृत्वाखाली सातगाव पठार भागातील शेतकऱ्यांचा यामध्ये सहभाग आहे. 

Mumbai
Devendra Fadnavis : ''मी क्लिन बोल्ड होण्याऐवजी पवारांनी त्यांच्या पुतण्याला बोल्ड केलं, आणखी सत्य बाहेर आणणार''

शेतकऱ्यांचे सातबारा उताऱ्यावरील पुनर्वसन खात्याचे शिक्के त्वरित काढावेत व डिंभे धरणातून ( बाबू गेनू जलाशय) काढण्यात येणाऱ्या बोगदयाला विरोध असून सदर बोगदा नामंजूर करावा अशी मागणी करण्यात आली आहे. बेमुदत आमरण उपोषणचा चौथा दिवस आहे.

कळमोडीचे पाणी सातगाव पठार भागाला देण्यास टाळाटाळ केल्यास व डिंभे धरणातून बोगद्याद्वारे नगर जिल्ह्यात पाणी पळविण्याचा प्रयत्न झाल्यास आंबेगाव तालुका, खेड तालुका, तसेच शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यावर अन्याय होणार आहे, असे देविदास दरेकर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.