Mumbai : रेल्वे बोर्डाकडे पश्चिम रेल्वेचे मागणीचे निवेदन पडून!, दोनशे एमएसएफ जवानांची भर्ती केव्हा होणार ?

लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. लोकल प्रवासात महिला प्रवाशांची छेडछाड, विनयभंग, मारहाणीचे प्रकार होतात.
Mumbai
Mumbaisakal
Updated on

Mumbai - रेल्वे सुरक्षा दलाकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याने रात्रीच्या वेळी महिला डब्यातील सुरक्षा रक्षक नसल्याने गेल्या काही दिवसात लोकल ट्रेनमध्ये विनयभंगाच्या घटनातही वाढ झाली.

मात्र, अजूनही पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात २०० महाराष्ट्र सुरक्षा दलाचे (एमएसएफ) जवानाची भर्ती झालेली नाही. फक्त रेल्वे बोर्डाकड़े मागणीचे पत्र पडून असून आतापर्यंत यावर निर्णय झालेला नाही.

Mumbai
Mumbai : अवघ्या 4 महिन्यातच, 645 कोटी खर्चून बांधलेल्या पुलाची दुरावस्था; पहिल्याच पावसात खड्डेच-खड्डे

लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. लोकल प्रवासात महिला प्रवाशांची छेडछाड, विनयभंग, मारहाणीचे प्रकार होतात. महिला प्रवाशांवर गर्दुल्ल्यांकडूनही हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

त्यामुळे रात्री आठ ते सकाळी सहा वाजेपर्यंत लोकलच्या प्रत्येक तीन महिला डब्यांत सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली. ३ मे २०२३ रोजी मध्यरात्री पश्चिम रेल्वेवर १.१० च्या सुमारास शेवटच्या चर्चगेट-बोरिवली रेल्वेतून काही महिला प्रवास करत असताना महिला डब्यात जीआरपी अथवा आरपीएफ तैनात नसल्याचे दिसून आले.

Mumbai
Mumbai : कोविड घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या पालिका रुग्णालयांना सुचना

यावेळी एका महिला प्रवासीने रेल्वे पोलिसांना याबाबत विचारणा केली असता याचे महिला प्रवासी आणि पोलिसांमध्ये वाद झाला.

या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला असून रात्रीच्या वेळी महिला डब्यातील सुरक्षा रक्षक नसल्याने महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने २०० महाराष्ट्र सुरक्षा दलाचे (एमएसएफ) जवान भरती करण्याची मागणी रेल्वे बोर्डाकडे केली आहे. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले.

Mumbai
Mumbai Rivers Algae : ठाणे जिल्ह्यातील नद्यांना जलपर्णीचा विळखा; प्रशासनाने वेळीच लक्ष दिले असते तर ...

आणखी प्रतिक्षा-

आता लोकल ट्रेनमध्ये महिला प्रवाशांच्या विनयभंगाच्या घटनातही वाढ झाली. रेल्वे सुरक्षा दलाकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याने रात्रीच्या वेळी महिला डब्यातील सुरक्षा रक्षक नसल्याची माहितीही समोर आली आहे.

मनुष्यबळाची कमतरता असल्याचे २०० एमएसएफ जवान भरती करण्याची मागणी रेल्वे बोर्डाकडे केली आहे. आणखी काही काळ या प्रक्रियेसाठी लागणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या आरपीएफ पोलिसांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.