Mumbai: मुंबई नाशिक महामार्गावर न्यू कसारा घाटामध्ये रविवारी भीषण रस्ते अपघात झाला. यामध्ये कमीत कमी पाच लोकांचा मृत्यू झाला आहे. दुपारी एक कंटेनर खोल दरीमध्ये कोसळला. त्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. कसारा येथे झालेल्या अपघातात सिन्नर तालुक्यातील निरृहाळे येथील मामा भाचे मयत झाले आहेत. रक्षाबंधनासाठी आत्याकडे जाणाऱ्या कुटुंबावर हा काळाचा घाला झाला आहे.
वडील मंगेश वाघ व भाऊ अनिकेत वाघ यांच्या सोबत सार्थक हा कल्याण येथे राहणाऱ्या आत्याकडे रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यासाठी चालला होता. मंगेश वाघ यांची बहीण रामदास दराडे यांची पत्नी आहे. गावी आलेल्या दराडे यांच्यासोबत हे तिघेही नाशिक येथून कल्याणकडे जाण्यासाठी सदर कंटेनर मधून प्रवास करत होते.