संभाजी छत्रपतींचा ताफा मुंबईत अडवला, गाडीवर चढून भाषण! म्हणाले, "पटेलांचा पुतळा झाला पण..."

Sambhaji Chhatrapati's Convoy Halted, Speaks on Shiv Smarak Project: संभाजी छत्रपतींच्या या भाषणामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात शिवस्मारकाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.
Sambhaji Chhatrapati addressing the crowd after his convoy was stopped by police at Gateway of India, Mumbai
Sambhaji Chhatrapati addressing the crowd after his convoy was stopped by police at Gateway of India, Mumbaiesakal
Updated on

मुंबई: महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती यांचा ताफा आज मुंबईत गेटवे ऑफ इंडिया परिसरात पोलिसांनी अडवला. यानंतर संभाजी छत्रपतींनी तिथेच गाडीवर उभं राहून कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण दिलं. या भाषणात त्यांनी महाराष्ट्रातील शिवस्मारकाच्या रखडलेल्या कामावरून सरकारवर कडाडून टीका केली.

शिवस्मारकाच्या रखडलेल्या कामावर प्रश्नचिन्ह

२०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाचं जलपूजन केलं होतं. मात्र, आज २०२४ असूनही या स्मारकाचं काम सुरू झालेलं नाही. या पार्श्वभूमीवर संभाजी छत्रपतींनी आक्रमक भूमिका घेत सरकारवर सवाल उपस्थित केला, "शिवाजी महाराज हे देशाचे दैवत आहेत, मग अद्याप त्यांचं स्मारक का झालं नाही? केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार असताना देखील हे काम पूर्ण का झालं नाही?"

समितीचं काय झालं?

शिवस्मारकासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. परंतु, त्या समितीचं काय झालं, याबाबत संभाजी छत्रपतींनी सरकारवर प्रश्नचिन्ह उभं केलं. "समिती स्थापन झाली, परंतु तिचं पुढे काय झालं याची कुणालाच माहिती नाही. सरकारला विचारलं की ते हा विषय कोर्टात आहे असं सांगतात. यामुळे या प्रकरणात जनतेचा भ्रमनिरास होत आहे," असं ते म्हणाले.

शिवस्मारकासाठी चळवळ

संभाजी छत्रपती यांनी त्यांच्या भाषणात महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची पहिली मोठी चळवळ म्हणून शिवस्मारकाचा मुद्दा हाताळला आहे. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना 'चला शिवस्मारक शोधायला!' असं आवाहन केलं. "शिवाजी महाराजांचं स्मारक हे एक गौरवपूर्ण कार्य आहे, परंतु राज्य सरकारसोबत याबाबत चर्चा निरर्थक ठरली आहे," असं ते म्हणाले. सरदार पटेलांचा पुतळा झाला, मग शिवाजी महाराजांचं स्मारक का नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला.

Sambhaji Chhatrapati addressing the crowd after his convoy was stopped by police at Gateway of India, Mumbai
AIMIM Maharashtra: विधानसभेसाठी 'एमआयएम'ला सापडेना मित्र पक्ष; महाविकास अन् तिसरी आघाडीही सोबत घेईना

आक्रमक भूमिका आणि शांततापूर्ण आवाहन

संभाजी छत्रपती यांनी आपला मुद्दा स्पष्टपणे मांडतांना आक्रमक भूमिका घेतली असली तरी, त्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. पोलिसांनी ताफा अडवला असताना, "कोणीही कायदा हातात घेऊ नका," असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. शिवाजी महाराजांचे नाव घेऊन आता राजकारण थांबवण्याची वेळ आली आहे, असं ते म्हणाले.

विधानसभा निवडणुकांचं रणसंग्राम

महाराष्ट्र स्वराज्य संघटनेला आता पक्षाचा दर्जा मिळाल्यानंतर संभाजी छत्रपती विधानसभा निवडणुका लढवण्याच्या तयारीत आहेत. शिवस्मारकाचा मुद्दा या निवडणुकांमध्ये महत्वाचा ठरणार आहे, असा संकेत त्यांनी आपल्या भाषणातून दिला. "आता हे प्रकरण जनतेसमोर नेणार आहोत, कारण जनतेला याचा संपूर्ण तपशील कळायला पाहिजे," असा इशाराही त्यांनी दिला.

Sambhaji Chhatrapati addressing the crowd after his convoy was stopped by police at Gateway of India, Mumbai
Sharad Pawar: तुतारीची उमेदवारी मिळवण्यासाठी काय आहे पात्रता? शरद पवारांच्या जवळच्या नेत्यानं सांगितलं गणित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.