'मनुस्मृती'बाबत जितेंद्र आव्हाडांचा मोठा निर्णय; म्हणाले, 'महाडमध्ये जाऊन मनुस्मृतीची होळी करणार..'

'एससीईआरटी'ने राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील (Manusmriti) काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
Jitendra Awhad Manusmriti
Jitendra Awhad Manusmritiesakal
Updated on
Summary

बाबासाहेब आंबेडकरांनी १९२७ मध्ये मनुस्मृती दहन केलं आणि 1950 मध्ये संविधान जन्माला घातलं त्यासाठी आपण महाडला जात आहोत.

ठाणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (National Education Policy), 'एससीईआरटी'ने राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील (Manusmriti) काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागवण्यात आल्या आहेत. याच मुद्द्यावरून आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे आक्रमक झाले असून शालेय पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीचा समावेशाच्या हालचालींना देखील त्यांनी विरोध केला आहे.

त्यासाठी जितेंद्र आव्हाड बुधवारी २९ मे २०२४ रोजी महाड येथे जाऊन मनुस्मृतीची होळी करणार आहेत. मनुस्मृतीमधील तीन श्लोकांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यासंदर्भातल्या सरकारच्या निर्णयाविरोधात डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी सर्वांना एकत्र येण्याचं आव्हान केले आहे.

Jitendra Awhad Manusmriti
Pune Porsche Accident : 'कितीही श्रीमंत बापाचा पोरगा असला, तरी त्याला सोडणार नाही'; कल्याणीनगर अपघातावर अजितदादांचं थेट भाष्य

ज्या मनुस्मृतीने स्त्रियांचे अधिकार नाकारले, ज्या मनुस्मृतीमुळे आपले पूर्वज ५ हजार वर्ष त्रासात जगले, तीच मनुस्मृती पुन्हा एकदा हे सरकार आणत आहे, याचा तीव्र विरोध व्हायला हवा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांनी ज्या ठिकाणी या मनुस्मृतीचे दहन केले, त्याच ठिकाणी पुन्हा एकदा आपण जाऊन याचं दहन करणार आहोत आणि सरकारचा निषेध करणार आहोत त्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा, असे आवाहन डाॅ. आव्हाड यांनी केले आहे.

Jitendra Awhad Manusmriti
गुजरातच्या GST आयुक्तांनी कांदाटी खोऱ्यात बळकावली 620 एकर जमीन; महाबळेश्वरातलं 'झाडाणी' का आलं चर्चेत, जमिनीचा काय आहे दर?

सत्ताधारी मागच्या दाराने त्यांच्या मनातील गोष्ट पूर्ण करु पाहत आहेत. आमचं संविधान म्हणजेच मनुस्मृती, असं म्हणणारे जेव्हा सत्तेत येतात तेव्हा काय घडतं, त्याचं उदाहरण म्हणजे पाठ्यपुस्तकांचा यादीत पुस्तकात मनुस्मृतीचा समावेश होत आहे. ज्या मनुस्मृतीने भारताच्या वाटोळं केलं, समाजात दुही माजवली आहे, समाजामध्ये चातुवर्ण्याचा समावेश केला, जातीभेद निर्माण केला, स्त्रियांना तर सर्वात घाणेरडी वागणूक घेण्याची पद्धती या मनुस्मृतीने जन्मला घातली, ती मनुस्मृती परत आणली जात आहे.

दरम्यान, जे लोक १९५० साली म्हणाले की, आम्हाला तुमचं संविधान मान्य नाही, आमचं संविधान म्हणजे मनुस्मृती. तेच लोक आता मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न करत आहेत.  तुम्हाला आणि आम्हाला संविधान वाचवायचे आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी १९२७ मध्ये मनुस्मृती दहन केलं आणि 1950 मध्ये संविधान जन्माला घातलं त्यासाठी आपण महाडला जात आहोत. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करून आपण मनुस्मृतीच दहन करतोय, संविधानासाठी दो बलिदान, असे डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

Jitendra Awhad Manusmriti
Pune Car Accident : 'तावरेंच्या सांगण्यावरूनच डॉक्टरांनी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने कचऱ्याच्या पेटीत फेकले'; DNA चाचणीत धक्कादायक बाब उघड

सुरबानानांचे नातू करणार मनुस्मृतीचे दहन

२५ डिसेंबर १९२७ रोजी मंचावर सहस्रबुद्धे, चित्रे, चिटणीस आदी उपस्थित होते. त्यांच्या समोर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे मनुस्मृतीमधील प्रत्येक अध्याय वाचून दाखवत होते. मनुस्मृतीमधील हे अध्याय मंजूर आहेत का, असेही विचारत होते. त्यावेळेस लोकांकडून उत्स्फूर्तपणे नाही असेच उत्तर येत होते.

त्यानंतर त्यांनी मनुस्मृती जाळण्याचा निर्णय जाहीर केला अन् मनुस्मृती जाळत असताना त्यांनी सहस्रबुद्धेंना विचारले, तुम्हाला मनुस्मृती जाळणे मान्य आहे का? त्यावर सहस्रबुद्धे म्हणाले, ब्राह्मण म्हणून नाहीच; पण, माणूस म्हणून तर नाहीच नाही! या सर्वांच्या मागे जी शक्ती उभी होती ती म्हणजे तत्कालीन नगराध्यक्ष सुरबानाना उपाख्य चिटणीस यांचे नातू मिलींद चिटणीस यांच्या हस्ते बुधवारी मनुस्मृती जाळण्यात येणार आहे, असेही डाॅ. आव्हाड यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.