Thane: कळव्यातील शाळेत विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा; 38 जणांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु

Students news in Kalwa school: ३८ विद्यार्थ्यांना कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एकूण ४० विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असल्याची माहिती आहे
Students khichdi
Students khichdi
Updated on

Mumbai News: कळवा येथील सह्याद्री सहकार विद्या प्रसारक मंडळ शाळेतील पाचवी आणि सहावीतील सुमारे ४० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. या विद्यार्थ्यांवर ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मंगळवारी दुपारी कळवा येथील सह्याद्री सहकार विद्या प्रसारक मंडळातील विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आले होते. त्यात भात मटकीच्या उसळी देण्यात आले होते अशी माहिती शालेय सूत्रांनी दिली. हे अन्न देत असतानाच काही विद्यार्थ्यांना त्याच्या वासानेच मळमळल्या सारखे झाले. तर काहींना अन्न खाल्यानंतर त्यांना उलटी, पोटदुखी आदींचा त्रास सुरु झाला. त्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना तत्काळ महापालिकेच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयात हलविण्यात आले.

Students khichdi
News School Rules : राज्यातील सर्व शाळा नवीन नियमांच्या बंधनात! नवे नियम 24 सप्टेंबरपासून लागू

हे अन्न खाल्याने ४० विद्यार्थ्यांना त्यातून विषबाधा झाल्याचा अंदाज रुग्णालय प्रशासनाने वर्तविला आहे. त्यातही शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांच्या घराच्यांना सांयकाळच्या सुमारास याची माहिती दिल्याने विद्यार्थ्यांचे पालकांनी देखील रुग्णालयात धाव घेतली. विषबाधा झालेले विद्यार्थी हे इयत्ता पाचवी आणि सहावीत शिकणारे असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

दरम्यान कळवा रुग्णालयात दाखल झालेल्या ४० विद्यार्थ्यांवर रुग्णालय प्रशासनाकूडन उपचार सुरु असून अन्नातून विषबाधा झाल्यानेच त्यांना हा त्रास झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला असून तुर्तास सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातील डॉ. अनिरुध्द माळगावकर यांनी सांगितले.

Students khichdi
Dhule School Video: शाळेमध्ये विद्यार्थ्यांना दिलेल्या चॉकलेटमध्ये जिवंत अळ्या; धुळ्यामधील घटना

यापूर्वी देखील येथे देण्यात येणाऱ्या अन्नातून झुरळ, किडे आढळून आले असल्याचा दावा माजी नगरसेवक मिलिंद पाटील यांनी केला आहे. त्यातही शालेय पोषण आहार हे आधी शाळेच्या मुख्याध्यपकांनी खाणे अपेक्षित असतांना त्यांनी तसे न करता थेट विद्यार्थ्यांना दिल्याचा आरोपही पाटील यांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.