टोल नाका प्रकरणी संघर्ष सुरूच

टोल नाका प्रकरणी संघर्ष सुरूच

Published on

टोल नाकाप्रकरणी संघर्ष सुरूच

याचिका मागे घेतलेली नाही; याचिकाकर्ते श्रीनिवास घाणेकर यांची माहिती


कल्याण, ता. १० (बातमीदार) : राज्यातील टोलवसुलीप्रकरणी मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी जनहित याचिका मागे घेतली नसून, त्याचा संघर्ष सुरू असून नव्याने पुन्हा याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती याचिकाकर्ता श्रीनिवास घाणेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

सध्या टोल नाक्यावरील वसुलीवरून प्रकरण गाजत असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाणे येथे नुकतीच पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे २०१२ मध्ये टोलसंदर्भातील एका पिटिशनमध्ये याचिकाकर्ता होते व ही याचिका मागे घेतली गेली असल्याच्या विधानाचे खंडन करण्यासाठी याचिकाकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी आज कल्याणमध्ये पत्रकार परिषद घेत याचिका मागे घेतली नसल्याचा खुलासा केला. घाणेकर म्हणाले की, ‘टोल नाकाप्रकरणी जनहित याचिकेत मी क्रमांक एकचा याचिकाकर्ता होतो व तत्कालीन आमदार एकनाथ शिंदे हे क्रमांक दोनचे याचिकाकर्ते होते, ही जनहित याचिका कधीही मागे घेतली गेली नाही.’ दरम्यान न्यायालयाने यावर आदेश देत एकनाथ शिंदे हे आता संबंधित खात्याचे मंत्री झाल्याने याचिकाकर्ता क्रमांक एक म्हणजे श्रीनिवास घाणेकर यांनी त्यांच्याकडे एक अधिकृत पत्र द्यायचे आहे व त्यावर संबंधित मंत्रिमहोदय शक्य तेवढ्या लवकर निर्णय घेतील, अशी आम्हास आशा आहे, असे नमूद करून ही याचिका त्यावेळी निकाली काढली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com