Water Crisis : ठाणे जिल्ह्यात पाणी संकट कायम; बारवी धरणात 27 टक्के पाणीसाठा

बारवी धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस घटत असून ठाणे जिल्ह्यातील पाणी कपातीचे संकट गडद होऊ लागले आहे.
Baravi Dam Water
Baravi Dam Watersakal
Updated on

डोंबिवली - जून महिना संपण्यास अवघे 10 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. पावसास अद्याप सुरवात झाली नाही, तोच बारवी धरणात अवघा 27 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. बारवी धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस घटत असून ठाणे जिल्ह्यातील पाणी कपातीचे संकट गडद होऊ लागले आहे. खालावलेली पाण्याची पातळी पहाता नागरिकांनी पाणी जपून वापरावे अशा सूचना जलसंपदा विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

Baravi Dam Water
Mumbai News : आयटीआयमधील मुलींना बौद्धिक संपदेचे धडे; नवीन शोध दृष्टी विकसित करण्यासाठी मुली झाल्या प्रेरित

2022 च्या तुलनेत यंदा धरणात 5 ते 6 टक्के कमी पाणीसाठा शिल्लक आहे. वाढत्या तापमानामुळे पाणी पातळीत घट होत असतानाच यंदा एक वेगळेच संकट घोंगावत आहे. पाऊस लांबण्याची शक्यता असल्याने ऑगस्ट पर्यंत पाण्याचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

त्यानुसार एमआयडीसी प्रशासनाने मे महिन्यापासून पंधरा दिवसांतून एकदा पाणी कपात लागू केली होती. बारवी धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करता 15 जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा आहे. पाऊस लांबण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने पाणी कपातीचे संकट गडद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ठाणे जिल्ह्यातील बहुतांश भागाला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरणातून पाणी पुरवठा केला जातो. यात ठाणे, मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर या महापालिकांसह अंबरनाथ नगरपालिका आणि ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

Baravi Dam Water
Mumbai University : मुंबई विद्यापीठाच्या पंचवार्षिक बृहत आराखड्याला मंजुरी

तसेच ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, अंबरनाथ, डोंबिवली, ठाणे येथील औद्यागिक क्षेत्रालाही बारवी धरणातून पाणी पुरवले जाते. त्यामुळे बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरणे आवश्यक असते. यंदाच्या वर्षात सप्टेंबर महिन्यात बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यामुळे जिल्ह्याला अविरत पाणी पुरवठा सुरू होता. मार्च महिन्याचा अखेरीस याच बारवी धरणात 50 टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.

बारवी धरणाची क्षमता 338.84 दशलक्ष लीटर इतकी आहे. 30 मार्च रोजी धरणात 170.61 दशलक्ष लीटर पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे धरण एकूण क्षमतेच्या 50.36 टक्के पाणीसाठा उपलब्ध होते. मात्र यावर्षी पाऊस लांबल्याने बारवी धरणातील पाण्याचीं पातळी कमी झाली आहे. दरम्यान जलसाठ्याचं योय नियोजन करण्यासाठी 15 ते 20 टक्क्यांची पाणीकपात केले असेल तरी यंदा जून महिन्यात बारवी धरणात फक्त 27 टक्के जलसाठा उपलब्ध आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.