कल्याण डोंबिवलीचा शुक्रवारी पाणी पुरवठा बंद

कल्याण डोंबिवलीचा शुक्रवारी पाणी पुरवठा बंद
Published on

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २१ : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने जांभुळ जलशुद्धीकरण केंद्र व बारवी गुरुत्ववाहिनीच्या देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या कामासाठी २४ तासांचा शटडाऊन शुक्रवारी (ता. २४) घेण्यात येणार आहे. गुरुवारी रात्री १२ ते शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. एमआयडीसीच्या वतीने पावसाळ्यापूर्वी देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येत आहेत. याअंतर्गत जांभुळ जलशुद्धीकरण केंद्र व बारवी गुरुत्ववाहिनीवरील देखभाल व दुरुस्तीचे काम एमआयडीसीने हाती घेतले आहे. त्यामुळे डोंबिवली औद्योगिक क्षेत्र, तळोजा औद्योगिक क्षेत्र, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका व परिसरातील इतर ग्रामपंचायतींना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभुळ जलशुद्धी केंद्रातून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शनिवारी पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी अतिरिक्त पाणीसाठा करून ठेवावा, असे पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.