नांदेड : मराठवाड्यातून भाविकांना कृष्णा, रायचूर या लिंक एक्स्प्रेसमुळे अवघ्या १४ ते १५ तासात तिरूपती गाठणे शक्य होत आहे. यासाठी या गाडीचा विस्तार छत्रपती संभाजीनगरपर्यंत झाला तर, मराठवाड्यातील उर्वरीत तीन जिल्ह्यांतील भाविकांची सोय होणार आहे. यासाठी नांदेड-रायचूर एक्स्प्रेसचा छत्रपती संभाजीनगरपर्यंत विस्तार करावा, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.