नांदेड : लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीदरम्यान समाज माध्यमांवर आचारसंहिता भंग होईल, अशा पोस्ट करू नका. कारण समाज माध्यमांवरील पोस्ट हा सबळ पुरावा मानल्या जातो. तसेच आचारसंहिता भंग करण्याचे गुन्हे कोणीही गृहीत पकडू नयेत. याप्रकरणात १०० टक्के शिक्षा भोगावीच लागते. त्यामुळे याकाळात आचारसंहितेचे सक्त पालन करा. गेल्या लोकसभा निवडणुकीतील अशा स्वरूपाचे २३ गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत.