Almatti Dam : कोल्हापुरातील 'हे' बंधारे गेले पाण्याखाली; 'हिप्परगी'चे 22 पैकी 16 दरवाजे केले बंद; 'आलमट्टी'ची काय आहे स्थिती?

आलमट्टी धरणाची (Almatti Dam) पाणीपातळी ५१७ मीटरपेक्षा जादा ठेवू नये, अशी मागणी समितीने निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे केली.
Karnataka Government Almatti Dam
Karnataka Government Almatti Damesakal
Updated on
Summary

पाटबंधारे विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळेच बंधारे पाण्याखाली ही परिस्थिती ३० जूनलाच उद्‌भवली आहे. सध्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार सरासरीपेक्षा जादा पाऊस पडणार असल्याचे अनुमान आहे.

कोल्हापूर : हिप्परगी बॅरेजचे २२ पैकी १६ दरवाजे बंद केले आहेत. येथे येणारा विसर्ग हा २१००० क्युसेक्स इतका आहे. येथील उघडलेल्या सहा दरवाजातून १२००० क्युसेक्स पाणी प्रवाहित होत आहे. येथील पाण्याच्या फुगीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राजापूर व तेरवाड हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तसेच पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे वाहून आलेल्या पाण्याचा योग्य पद्धतीने विसर्ग न झाल्याने राजाराम बंधाराही (Rajaram Bandhara) पाण्याखाली गेला आहे. याला कोल्हापूर पाटबंधारे विभाग (Kolhapur Irrigation Department) जबाबदार आहे, असा आरोप आज कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीने (सांगली)ने केला. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे.

तसेच, ३१ ऑगस्टपर्यंत हिप्परगीचे (Hipparg Dam) सर्व दरवाजे खुले ठेवावेत व आलमट्टी धरणाची (Almatti Dam) पाणीपातळी ५१७ मीटरपेक्षा जादा ठेवू नये, अशी मागणी समितीने आज निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे केली. हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे पाठविले. निवेदनात म्हटले आहे की, कृती समितीच्या शिष्टमंडळासोबत ७ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली होती. यावेळी जिल्हाधिकारी यांच्यासह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग व पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी ३१ ऑगस्टपर्यंत हिप्परगी बॅरेजचे दरवाजे पूर्णपणे उघडे ठेवून विसर्ग खाली सोडण्यावर चर्चा झाली.

Karnataka Government Almatti Dam
Sindhudurg Rain : सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस; पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट, तर 1 जुलैला रेड अलर्ट जाहीर

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी हे मान्य करत कार्यवाहीबाबत पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना आदेश दिले होते. परंतु त्याची अंमलबजावणी केली नाही. परिणामी, पाटबंधारे विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळेच बंधारे पाण्याखाली ही परिस्थिती ३० जूनलाच उद्‌भवली आहे. सध्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार सरासरीपेक्षा जादा पाऊस पडणार असल्याचे अनुमान आहे. त्याची दखल जिल्हा प्रशासनाने घ्यावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.