Vishalgad Riots : विशाळगड दंगलीचा 'मास्टर माईंड' शोधा, गजापुरात जाळपोळ-हल्ले करणारे शिवभक्त कसे? जयंत पाटलांचा सवाल

Vishalgad Encroachment Dispute : निरपराध ग्रामस्थांवर हल्ले करणारे शिवभक्त असूच शकत नाहीत.
Vishalgad Riots Jayant Patil
Vishalgad Riots Jayant Patilesakal
Updated on
Summary

''गजापूरमधील घटना राज्य सरकारचे अपयश आहे. प्रार्थनास्थळात घुसून मोडतोड करण्यामागे समाजात दुहीचे कारस्थान आहे.''

इस्लामपूर : विशाळगडावरील अतिक्रमण (Vishalgad Encroachment Dispute) हटावला विरोधाच्या नावाखाली गडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूरमधील घरांची मोडतोड व जाळपोळ करणाऱ्या सर्वांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल कराच. त्याचवेळी या कृत्याचा मास्टर माईंड शोधून कायद्याचा हिसका दाखवा, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पत्रकार बैठकीत केली.

निरपराध ग्रामस्थांवर हल्ले करणारे शिवभक्त असूच शकत नाहीत. समाजात या कृत्याची चीड असून दोषींना तत्काळ अटक करा, अशी मागणीही त्यांनी केली. ते म्हणाले, ‘‘विशाळगडावर अतिक्रमण झाले आहे, काही प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. ती वगळून ज्यांना प्रशासनाने नोटीस दिली होती, त्यांची अतिक्रमणे असली तरी सध्याच्या मुसळधार पावसात काढणे माणुसकीला धरून नाही. प्रशासनाने पावसाळ्यापूर्वीच ही अतिक्रमणे काढून घ्यायला पाहिजे होती. पावसाळ्यानंतर ही कारवाई केली असती तरी चालली असती. विशाळगड म्हणजे मुसळधार पावसाचे आगर आहे.

Vishalgad Riots Jayant Patil
Vishalgad Controversy : दहशतवादी यासिन भटकळ विशाळगडवर कधी आला आणि कोठे राहिला? दंगलीनंतर काय म्हणाले मुश्रीफ?

अशा पावसात अतिक्रमणे काढल्यास त्या लोकांनी जायचे कुठे, शासनाने त्यांचे पुनर्वसन करावे. दुसरीकडे गजापूरमधील ग्रामस्थांवर केलेला हल्ला मात्र नियोजनबद्ध कट होता. त्यासाठी पुण्याहून काही लोक आले होते. ते शिवभक्त कधीही असू शकत नाहीत. त्यांनी धुमाकूळ घालत निरपराध लोकांची घरे व व्यवसायांची मोडतोड, तोडफोड केली. या गुन्ह्यामागचा ‘ब्रेन’ शोधला पाहिजे. त्यांच्यावर अजामीनपात्र कलमे लावून गुन्हे दाखल करा. ही प्रवृत्ती वेळीच रोखा, अन्यथा ती सर्वत्र वाढेल.’’

गजापूरमधील घटना राज्य सरकारचे अपयश आहे. प्रार्थनास्थळात घुसून मोडतोड करण्यामागे समाजात दुहीचे कारस्थान आहे. या घटनेची प्रशासनाला पूर्वकल्पना नसेल, तर ते त्यांचे अपयशच आहे. गजापूर येथे फक्त तीन पोलिस बंदोबस्तासाठी होते. म्हणजे यात काहीतरी वेगळे शिजतंय. ज्यांनी विशाळगडाकडे येण्याचे आवाहन केले, त्या लोकांनाही अजामीनपात्र कलमाखाली अटक करावी. झालेली घटना शिवप्रेमींचे नाव देऊन गुंडांनी हैदोस करणे अशोभनीय आहे. हे खऱ्या शिवप्रेमींनाही आवडलेले नाही.’’

Vishalgad Riots Jayant Patil
Vishalgad Riots : विशाळगडावरील हिंसक आंदोलनात 2 कोटी 85 लाखांचं नुकसान; गजापुरातील बाधितांना शासनाकडून 25 हजारांची मदत

जयंतराव म्हणाले...

  • विधानपरिषदेत आमची सर्व मते शेकापलाच

  • आमदार मानसिंगराव नाईक यांच्याबद्दल नाहक संभ्रम

  • विधानसभा मतदारसंघांचा लवकरच दौरा

  • सातारा, सोलापूर, धुळे, नाशिक, जळगाव, जालना, परभणीचा आजपासून दौरा

  • नऊ ऑॅगस्टपासून राज्यात पुन्हा संपर्क यात्रा

सरकारने तिजोरीची स्थिती तपासावी

जयंत पाटील म्हणाले, ‘‘राज्य सरकारचे शेवटचे काही दिवस असल्याने ते घोषणांचा पाऊस पाडत असून रोज एक घोषणा करीत आहेत. कारण त्‍याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्यांची असणार नाही. आता लाडक्या बहिणीनंतर लाडक्या भावाला पैसे द्यायची घोषणा आहे. एकदा सरकारने स्वतःच्या तिजोरीत हात घालून किती पैसे शिल्लक आहेत हे पाहावे; पण त्यांना त्याच्याशी देणेघेणे नाही. राज्य कर्जबाजारी करून जायचे ही त्यांची मानसिकता आहे. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हा उद्योग आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com