कणेरीत मुख्य जलवाहिनीला गळती हजारो लिटर पाणी वाया

कणेरीत मुख्य जलवाहिनीला गळती हजारो लिटर पाणी वाया

Published on

मुख्य जलवाहिनीला
कणेरीमध्ये गळती
गोकुळ शिरगाव, ता.१५ : कणेरी (ता.करवीर) येथे असणाऱ्या दत्त कॉलनीत महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागली असल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे. सध्या बीएसएनएलचे काम सुरू असताना जेसीबीमुळे मुख्य वाहिनीला गळती लागली होती. गळतीमुळे मुख्य रस्त्यावर चिखल झाला होता. त्यामुळे ये-जा करताना नागरिकांची गैरसोय होत होती.
कणेरीतील दत्त कॉलनी येथे असणाऱ्या पार्श्व स्टेशनरीसमोर खोदकाम सुरू असताना मुख्य वाहिनीला गळती लागली असल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. तसेच पाण्याचे मोठे फवारे परिसरात उडत आहेत. परिसरात गेले महिनाभर बीएसएनएलचे चे काम सुरू आहे. यामुळे मुख्य जर वाहिनीला वारंवार गळती लागत असते. तसेच कणेरीला पाणीपुरवठा होणारी प्रमुख जलवाहिनी ६० ते ७० टक्के सडलेली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे; अशी मागणी ग्रामपंचायत प्रशासनाकडून होत आहे. जलजीवन प्राधिकरण विभागाला ग्रामपंचायतीकडून वारंवार पाठपुरावा केला जातो. तरीसुद्धा मुख्य जलवाहिनी बदलण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. या मुख्य जलवाहिनीचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा; अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.