Kolhapur Crime : अकरावीत शिकणाऱ्या आर्यननं उचललं टोकाचं पाऊल; नैराश्यातून इमारतीवरून उडी मारुन केली आत्महत्या

आर्यनचे वडील शिवाजी विद्यापीठात नोकरी करतात. आर्यनला गेल्या तीन-चार महिन्यांपासून मानसिक नैराश्य जाणवत होते.
College Student committed suicide
College Student committed suicideesakal
Updated on
Summary

आपण स्वतः उडी मारल्याचे त्याने वडिलांना सांगितले. त्यानंतर त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले.

कोल्हापूर : अकरावीत शिकणाऱ्या (College Student) आर्यन राजेंद्र पाटील (वय १६, रा. बळवंतनगर, पाचगाव, ता. करवीर) याने नैराश्यातून आत्महत्या केली. शाहू नाका परिसरातील एका अर्धवट बांधलेल्या इमारतीवरून त्याने उडी मारली.

त्याला सीपीआरमध्ये (CPR) उपचारासाठी दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यनचे वडील शिवाजी विद्यापीठात नोकरी करतात. आर्यनला गेल्या तीन-चार महिन्यांपासून मानसिक नैराश्य जाणवत होते. त्यासाठी तो उपचारही घेत होता.

College Student committed suicide
Sindhudurg Rain : सह्याद्री पट्ट्यात मुसळधार; धबधब्याखाली अडकलेल्या 24 पर्यटकांची पोलिसांनी 'अशी' केली सुटका

काल संध्याकाळी तो मित्रांसोबत खेळण्यासाठी बाहेर पडला. शाहू नाका येथील एका क्रीडांगणावर तो खेळत होता. तेथून तो घरी जातो असे सांगून तो निघाला, मात्र रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला. यावेळी तो शाहू नाका परिसरातील एका अर्धवट बांधलेल्या इमारतीजवळ पडला होता.

College Student committed suicide
मोठी बातमी! सोनिया गांधी राज्यसभेची निवडणूक लढवणार? 'या' राज्यातील मुख्यमंत्र्याची विनंती करणार मान्य

आपण स्वतः उडी मारल्याचे त्याने वडिलांना सांगितले. त्यानंतर त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथून उपचारासाठी सीपीआरमध्ये आणले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आर्यनच्या मागे आई, वडील, बहिण असा परिवार आहे.

College Student committed suicide
DK Shivakumar : कर्नाटकातलं काँग्रेस सरकार पाडण्यासाठी सिंगापुरात मोठं षड्‍यंत्र; उपमुख्यमंत्र्यांचा मोठा गौप्यस्फोट

कोणत्याही गोष्टींमध्ये येणारे अपयश पचवता आले नाही की नैराश्य येते. यासाठी तरुण-तरुणींनी सांघिक मैदानी खेळ खेळले पाहिजेत. त्यातून पराभवही पचवता येतो. पालकांनी मुलांशी मुक्तपणे संवाद केला पाहिजे. मित्र-नातेवाईक यांच्यामध्ये मुलांनी मिसळले पाहिजे. त्यातून एकटेपणा जाणवत नाही.

-डॉ. आश्विन शहा, मानसोपचार तज्ज्ञ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.