गोविंद पानसरेंच्या खुनात सनातन संस्थेचा सहभाग? ATS च्या तपासावर पानसरे कुटुंबाची नाराजी, 68 पानी लेखी निवेदन सादर

मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) एटीएसला पानसरे कुटुंबाची बाजू जाणून घेण्याचे आदेश दिले होते.
Govind Pansare Murder Case
Govind Pansare Murder Caseesakal
Summary

सनातन संस्थेला मिळत असलेल्या आर्थिक रसदीचाही एटीएसने योग्य पद्धतीने तपास केला नसल्याचे पानसरे कुटुंबाने म्हटले आहे.

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे (Govind Pansare Murder Case) यांच्या खुनात सनातन संस्थेचा सहभाग असल्याचे पुरावे समोर असतानाही एटीएसकडून (ATS) तपासात होत असलेल्या हलगर्जीपणावर पानसरे कुटुंबाने (Pansare Family) नाराजी व्यक्त केली आहे. एटीएसचे पुणे विभागाचे अधीक्षक जयंत मीना यांच्याकडे ६८ पानी लेखी निवेदन शुक्रवारी (ता.२८) पानसरे कुटुंबाने सादर केले. या निवेदनात ही नाराजी व्यक्त केली.

मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) एटीएसला पानसरे कुटुंबाची बाजू जाणून घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पानसरे कुटुंबाने लेखी निवेदनाद्वारे आपली बाजू मांडली आहे. काही दिवसांपूर्वी पुणे न्यायालयाने डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपींना शिक्षा सुनावली होती. यानंतर सनातन संस्थेद्वारे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील विचारवंतांची हत्या करण्याचा कट रचला जात असल्याचे पुरावे समोर आले होते.

Govind Pansare Murder Case
'गणेश, आता आम्ही कोणाकडं बघायचं..'; आईनं फोडला टाहो, पर्यटनासाठी गेलेल्या तरुणांचा नदीत बुडून दुर्दैवी अंत

पानसरे कुटुंबाने आपल्या लेखी निवेदनात हेच पुरावे एटीएस अधिकाऱ्यांना सादर केले आहेत. एटीएसला दिलेल्या निवेदनात पानसरे परिवाराने सनातन संस्थेने मोठ्या प्रमाणात आपल्याकडे असलेल्या संघटनात्मक शक्ती, पैसा आणि साधकांचा वापर करत हत्या कशा केल्या, त्याच्यासाठी शस्त्र चालवण्याचे ‘ट्रेनिंग कँप’ कसे घेतले, विचारवंतांच्या नेहमीच्या हालचालींवर कसे लक्ष ठेवले, शस्त्रास्त्र कशी गोळा गेली, याबद्दलची माहिती दिली आहे. पानसरे कुटुंबाने एटीएसला सनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवले, वीरेंद्र मराठे आणि अन्य अधिकारी वर्गाचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Govind Pansare Murder Case
गुप्तधनाच्या गुपिताला सहा महिन्यांनी फुटली वाचा! वाटा न मिळाल्याने तिघांमध्ये वाद, हंडाभर गुप्तधन सापडलं अन्..

पानसरे-दाभोलकर हत्या प्रकरणात समान धागा

पानसरे यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत दाखल झालेल्या पाच आरोपपत्रांचा हवाला देत पानसरे कुटुंबाने सर्व संशयित आरोपी हे सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीचे सदस्य असल्याचे म्हटले आहे. यातील दोन संशयित आरोपी हे फरार घोषित करण्यात आले असून, काही संशयिचांचे दाभोलकर हत्या प्रकरणातील तपासातही नाव समोर आले होते. यामुळेच पानसरे-दाभोलकर हत्या प्रकरणात समान धागा असल्याचे पानसरे कुटुंबाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

पुढील सुनावणी १२ जुलैला

सनातन संस्थेला मिळत असलेल्या आर्थिक रसदीचाही एटीएसने योग्य पद्धतीने तपास केला नसल्याचे पानसरे कुटुंबाने म्हटले आहे. कुठल्यातरी मोठ्या व्यक्तीचा पाठिंबा असल्याशिवाय डॉ. वीरेंद्र तावडे आणि अमोल काळे यासारख्या व्यक्तींकडे मोठी रक्कम येणे शक्य नसल्याचे पानसरे कुटुंबाचे म्हणणे आहे. या प्रकरणात न्यायालयात पुढील सुनावणी १२ जुलैला होणार आहे.

संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची चौकशी होणे गरजेचे

‘आम्ही जाणतो की आपण (एटीएस) आणि सीबीआय, महाराष्ट्र पोलिस, कर्नाटक पोलिस आणि गोवा पोलिस हे या चार हत्या आणि इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये सनातन संस्थेचा सहभाग असल्याचे जाणून आहात, परंतु या संस्थेची अद्याप चौकशी का झाली नाही, याची कारणे तुम्हीच (एटीएस) सांगू शकता. याचसाठी जयंत आठवले, वीरेंद्र मराठे आणि सनातन संस्थेच्या अन्य पदाधिकाऱ्यांची चौकशी होणे गरजेचे आहे,’ असेही निवेदनात म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com