Almatti Dam : 'अलमट्टी धरण' सांगली, कोल्हापुरातील महापुराचे मुख्य कारण; कृष्णा कृती समितीचे महाराष्ट्राला 'हे' आवाहन

अलमट्टी धरण हे सांगली आणि कोल्हापुरातील महापुराचे (Kolhapur Flood) मुख्य कारण आहे.
Almatti Dam Krishna Flood Control Action Committee
Almatti Dam Krishna Flood Control Action Committeeesakal
Updated on
Summary

अमलट्टी धरणाची पाणीपातळी ३१ ऑगस्टपर्यंत ५१७.४० मीटर ठेवणे बंधनकारक आहे.

कोल्हापूर : ‘कर्नाटकमधील अलमट्टी धरणातील (Almatti Dam) पाणीपातळी जूनपासून ऑगस्टपर्यंत किती असावी, याची निश्चिती कायद्याने केली आहे. केंद्रीय जल आयोगाने (Central Water Commission) याबाबत निर्देशही दिले आहेत. मात्र, याचे पालन होत नाही. जूनपासून ऑगस्टपर्यंत पाणीपातळी कायद्याप्रमाणे राखली जात नाही. त्यामुळे दोन वेळा महापूर आला आहे. त्यामुळे अलमट्टीच्या पाणीपातळीवर महाराष्ट्र शासनाने समन्वयाने नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, अशी भूमिका कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीच्या (Krishna Flood Control Action Committee) पदाधिकाऱ्यांनी मांडली.

याबाबात चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलवावी, असे निवेदनही त्यांनी आज दिले. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका मांडली. महापुराचे अभ्यासक विजय दिवाण म्हणाले, ‘अलमट्टी धरण हे सांगली आणि कोल्हापुरातील महापुराचे (Kolhapur Flood) मुख्य कारण आहे. अमलट्टी धरणाची पाणीपातळी ३१ ऑगस्टपर्यंत ५१७.४० मीटर ठेवणे बंधनकारक आहे.

Almatti Dam Krishna Flood Control Action Committee
गुजरातच्या GST आयुक्तांनी कांदाटी खोऱ्यात बळकावली 620 एकर जमीन; महाबळेश्वरातलं 'झाडाणी' का आलं चर्चेत, जमिनीचा काय आहे दर?

यासाठी महाराष्ट्र शासनाने आपले जलसंपदाचे अभियंता अलमट्टी धरणावर ठेऊन दैनंदिन पाणीपातळी नोंदवावी. कर्नाटक शासनाला अलमट्टीमधील पाणीपातळी निर्देशाप्रमाणे ठेवण्यात भाग पाडावे. याबाबत भूमिका मांडण्यासाठी ७ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात येणार आहे.’

Almatti Dam Krishna Flood Control Action Committee
Karnataka Government : 'PM मोदींच्या हॉटेलमधील मुक्कामाचे 80 लाखांचे बिल काँग्रेस सरकार भरणार'; काय आहे कारण?

नृसिंहवाडीत १६ जूनला पूर परिषद

कुरुंदवाड : ‘यंदा १०६ टक्के पावसाचा अंदाज असल्याने लोकांमध्ये महापुराची भीती आहे. महापूर येऊ नये, यासाठी शासनदरबारी दबावगट निर्माण करण्यासाठी व उपाययोजनांचा ऊहापोह करण्यासाठी १६ जून रोजी नृसिंहवाडी येथे तिसरी पूर परिषद आयोजित करण्यात आल्याची माहिती ‘आंदोलन अंकुश’चे संस्थापक धनाजी चुडमुंगे व विजय दिवाण यांनी पत्रकार बैठकीत दिली.

‘आंदोलन अंकुश’च्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून महापुराच्या कारणांचा शोध व उपाययोजना करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. यंदाही पूर परिषदेच्या माध्यमातून महापुराच्या प्रश्नाची तीव्रता व कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करण्यासाठी शासन पातळीवरुन प्रयत्न व्हावेत, यासाठी जागर केला जाणार असल्याचे चुडमुंगे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.