कोल्हापूर : कोल्हापूर ते मिरज मार्गावर धावणाऱ्या पॅसेंजर गाडीला तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराज टर्मिनसवरून धावणाऱ्या दोन रेल्वे गाड्या रद्द केल्या. तसेच तीन रेल्वे गाड्यांचा प्रवास तब्बल एक ते दोन तास विलंबाने सुरू झाल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.