Laxman Hake : समाजासह, राज्यात अराजक माजवण्याचा जरांगेंचा उद्देश

मनोज जरांगे-पाटील यांचे मराठा आरक्षणाबाबत आकलन शून्य आहे. समाजासह, राज्यात अराजक माजवणे हाच त्यांचा उद्देश आहे.
Manoj Jarange Patil and Laxman Hake
Manoj Jarange Patil and Laxman Hakeesakal
Updated on

सांगली - मनोज जरांगे-पाटील यांचे मराठा आरक्षणाबाबत आकलन शून्य आहे. समाजासह, राज्यात अराजक माजवणे हाच त्यांचा उद्देश आहे. ज्या मराठा बांधवांनी आत्महत्या केल्या, त्यालाही जरांगे-पाटील जबाबदार आहेत.

मुख्यमंत्र्यांना शिव्या घालणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या भुताला बाटलीत बंद करावे. समुद्रात फेकून द्यावे, अशी घणाघाती टीका ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी रविवारी केली. प्रा. हाके यांनी रविवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना जरांगे-पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.

ते म्हणाले, ‘मराठा आरक्षण, राज्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या हक्क, अधिकाराबद्दल जरांगे-पाटील यांचे आकलन शून्य आहे. ते अतिशय सुमार दर्जाचे आहेत. राज्यात अराजक निर्माण करण्याचाच उद्देश आहे. त्यांच्यामागे नेमके कोण आहे त्याचा शोध घेतला पाहिजे. त्यांना ना आरक्षणाबद्दल काही माहिती आहे, ना गरीब मराठा तरुणांबद्दल कळवळा.’

ते म्हणाले, ‘जी गोष्ट कधीच मिळणार नाही, कायद्याला घटनेला अपेक्षित नाही ती मिळवून देण्याची भाषा करणाऱ्या जरांगे-पाटलांची चौकशी झाली पाहिजे. मुख्यमंत्री, वरिष्ठ मंत्र्यांना शिव्या घालणे महाराष्ट्रीय संस्कृतीला काळिमा फासणारे आहे. जरांगे नावाच्या भुताला सरकारने वेळीच आवर घातला पाहिजे.’

माजी आमदार प्रकाश शेंडगे म्हणाले, ‘जरांगे-पाटील पुन्हा आंदोलन सुरू करणार म्हणतात. पण आंदोलनाचे हत्यार आम्हीही उपसू. सगेसोयऱ्याचा जीआर काढणे सरकारला अवघड आहे. सरकारला जर शहाणपण सुचले नाही, तर विधानसभा निवडणुकीत मतदानाचे हत्यार आमच्याकडेही आहे. आम्हीपण उमेदवार पाडू शकतो. घटना दुरुस्त करा. आरक्षण घ्या; पण ओबीसीमधून आरक्षण घेऊ देणार नाही. प्रसंगी राजकीय, रस्त्यावरची लढाई हातात घेऊ.’

उपोषणकर्ते नवनाथ वाघमारे, विष्णू माने, संगीता खोत, कल्पना कोळेकर, विठ्ठल खोत, अमित गडदे आदी उपस्थित होते.

...तर ताकद दाखवू

प्रा. हाके म्हणाले, मराठा नेत्यांनी निवडणुका जिंकण्याचे व्याकरण आत्मसात केले आहे. आमदार, खासदार मराठी मतांवर निवडून येतो आहे, म्हणजे आमची संख्या जास्त आहे, हे डोक्यातून काढून टाकावे. ओबीसी दुय्यम स्थानी आहेत म्हणून काही कळत नाही, असे काही समजू नये. त्याला उत्तर जरूर देऊ. सरकार जर जरांगेंना घाबरत असेल तर ओबीसींची काय ताकद आहे, हे दाखवून देऊ.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.