Almatti Dam : महाराष्ट्राच्या विनंतीवरुन आलमट्टी धरणातून तब्बल 1 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग; महापुराचा धोका टळला?

खबरदारी म्हणून दोन दिवसांपासून ६५ हजार क्युसेक असलेला विसर्ग शनिवारी दुपारी दीड वाजता एक लाख क्युसेक करण्यात आला आहे.
Almatti Dam
Almatti Damesakal
Updated on
Summary

शुक्रवारी धरणात ९७ टीएमसी पाणीसाठा झाला होता. आता विसर्ग वाढविल्याने हा पाणीसाठा कमी होणार आहे. सध्या ६५ हजार क्युसेक आवक तर एक लाख क्युसेक विसर्ग सुरू आहे.

चिक्कोडी : धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढलेला पाऊस आणि कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभागातही (Karnataka-Maharashtra Border) दमदार पावसाने हजेरी लावल्याने कृष्णेत पाणी वाहून येण्याचे प्रमाण वाढले आहे. पुढील दोन दिवसांत आणखी पाणी वाढण्याही शक्यता धरून व पूरस्थिती नियंत्रणासाठी महाराष्ट्र पाटबंधारे विभागाकडून (Maharashtra Irrigation Department) कर्नाटक धरण नियंत्रण समितीकडे विनंती केल्यानंतर आलमट्टी धरणातून (Almatti Dam) विसर्ग वाढविला आहे.

Almatti Dam
उद्या गडावर जाऊन, कोणीही फाईव्हस्टार हॉटेल बांधेल; विशाळगडावरुन उदयनराजेंचा अतिक्रमणधारकांना स्पष्ट इशारा

खबरदारी म्हणून दोन दिवसांपासून ६५ हजार क्युसेक असलेला विसर्ग शनिवारी दुपारी दीड वाजता एक लाख क्युसेक करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील धरण क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून दमदार पाऊस सुरू आहे. या शिवाय कोल्हापूर, सांगली, चिक्कोडी भागातही चांगला पाऊस पडत असल्याने नदींमध्ये पाण्याची पातळी प्रचंड वाढत आहे. या भागातील वेदगंगा, दूधगंगा नद्या पात्राबाहेर पडल्या आहेत.

तर कृष्णेलाही पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या पुराचा फटका महाराष्ट्र व विशेष करून सांगली जिल्ह्याला अधिक बसतो. त्यासाठी महाराष्ट्रातील धरण क्षेत्रातील पाऊस व येणारे पाणी याचा विचार करून महाराष्ट्र शासनाच्या वतीने सांगली पाटबंधारे खात्याकडून कर्नाटक सरकारच्या पाटबंधारे खात्याकडे रितसर पत्र देऊन पूरनियंत्रणासाठी आलमट्टीतून विसर्ग वाढविण्याची विनंती केली होती. शनिवारी सकाळी याबाबतचे पत्र कर्नाटक पाटबंधारे खात्याला मिळाल्यानंतर लागलीच दीड वाजता हा विसर्ग वाढविण्यात आला आहे.

Almatti Dam
गोव्याला जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' घाटातील अवजड वाहतुकीवर बंदी, चारचाकी वाहनांना मुभा?

त्यामुळे सध्या नदीत वाहणारे पाणी हिप्परगी आणि आलमट्टीतील समांतर पातळी राहत आहे. दोन दिवसांपासून पावसाचे पाणी वाहून येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जितके पाणी येत होते तितका विसर्ग शुक्रवारी आलमट्टीतून सुरू होता. पण पाऊस संततधार आणि काही धरणातून विसर्ग होण्याआधीच पाणी अधिक असल्याने खबरदारी म्हणून हे पाऊल उचलले आहे. यामुळे सध्यातरी कृष्णाकाठाला पुराचा धोका निर्माण होणार नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

धरण भरण्यास अडचण नाही

शुक्रवारी धरणात ९७ टीएमसी पाणीसाठा झाला होता. आता विसर्ग वाढविल्याने हा पाणीसाठा कमी होणार आहे. सध्या ६५ हजार क्युसेक आवक तर एक लाख क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे आलमट्टीत साठा झालेले पाणी आणखी कमी होऊ शकते. शेवटच्या पावसात अधिक साठा करण्याचे धरण प्रशासनाचे नियोजन असते. पण, यावेळी अधिक पाऊस नसल्याने पहिल्याच पावसात अधिक साठा केला होता. आता पाऊस वाढल्याने वाहून येणारे पाणी सोडण्यात येत आहे. पाऊस ओसरल्यानंतरही धरणात अधिक पाणी वाहून येणार असल्याने धरण भरण्यास अडचण येणार नसल्याचे पाटबंधारे खात्याचे म्हणणे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com