Solapur News : समानीकरणात अडकली शिक्षकांची ४५० पदे; पटसंख्येच्या तुलनेत पुरेशा शिक्षकांची मागणी

गुणवत्ता वाढीतून पटसंख्या टिकविण्याचे आव्हान जिल्हा परिषद शाळांसमोर आहे. जवळपास दोन लाख विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेशित असून २४० शाळांची पटसंख्या दहा ते २० पर्यंतच आहे.
450 posts of teachers stuck in equalization demand for adequate teachers compared to number of students
450 posts of teachers stuck in equalization demand for adequate teachers compared to number of students sakal
Updated on

Solapur News : शिक्षक भरती, आंतरजिल्हा बदली होऊनही सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जवळपास १०० पदे रिक्तच राहतात. सर्व तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पटसंख्येच्या प्रमाणात पुरेसे शिक्षक मिळावेत, अशी मागणी आहे.

तब्बल ४०० ते ४५० शिक्षकांची पदे समानीकरणात लॉक आहेत. काही वर्षांपासून त्याच त्या शाळांमधील पदे लॉक असल्याने गुणवत्ता व पटसंख्येवर परिणाम होत असल्याने समानीकरणातून आता दुसऱ्या शाळांमधील पदे लॉक करावीत, अशीही मागणी वाढत आहे.

गुणवत्ता वाढीतून पटसंख्या टिकविण्याचे आव्हान जिल्हा परिषद शाळांसमोर आहे. जवळपास दोन लाख विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेशित असून २४० शाळांची पटसंख्या दहा ते २० पर्यंतच आहे. काही शाळांमध्ये पटसंख्या खूपच कमी असतानाही त्याठिकाणी दोन शिक्षक आहेत.

तर अनेक ठिकाणी पटसंख्या मोठी असतानाही त्या प्रमाणात शिक्षक नाहीत, अशी वस्तुस्थिती आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी ज्या शाळांची पटसंख्या मोठी आहे, त्या शाळांमध्ये शिक्षक कमी आहेत पण अध्यापनावर परिणाम होणार नाही अशा ठिकाणी ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार काही पदे समानीकरणाच्या तत्त्वानुसार लॉक करण्यात आली आहेत.

मात्र, त्याच त्या शाळांमध्ये किती दिवस समानीकरणातून पदे लॉक राहणार, असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी समानीकरणातील शाळा बदलण्यासाठी ठोस पावले उचलतील, अशी आशा शाळांना आहे.

450 posts of teachers stuck in equalization demand for adequate teachers compared to number of students
Solapur: खा.शिंदेंनी स्टंटबाजी सोडून कामाला लागावे, समाधान आवताडेंनी केली टिका

समानीकरण म्हणजे नेमके काय?

सोलापूर जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यात दोन हजार ७९५ शाळा असून त्याअंतर्गत दोन लाखांपर्यंत विद्यार्थी प्रवेशित आहेत. मात्र, अद्याप पटसंख्येच्या प्रमाणात शाळांना शिक्षक मिळालेले नाहीत. काहीवेळा एका तालुक्यात १०० टक्के शिक्षक असतात तर दुसरीकडे दूरवरील किंवा जिल्ह्याच्या सीमेवरील तालुक्यात खूपच कमी शिक्षक असतात.

अशावेळी सर्व तालुक्यांमध्ये समानप्रमाणात शिक्षक रिक्त ठेवून समानीकरणाच्या तत्त्वानुसार काही शाळांमधील ठरावीक पदे लॉक केली जातात. रिक्त पदांच्या तुलनेत पटसंख्येनुसार जिल्ह्याला पूर्ण क्षमतेने शिक्षक मिळाल्यानंतर समानीकरण उठविले जाते. दुसरीकडे एकाच शाळेसाठी हे तत्त्व लागू न करता काही वर्षांनी ते बदलून दुसऱ्या शाळांमध्ये लागू केले जाते.

450 posts of teachers stuck in equalization demand for adequate teachers compared to number of students
Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील आठ महामार्ग ठरतायेत ब्लॅक स्पॉट; 4 वर्षांत 421अपघात, 228 जणांचा मृत्यू

ग्रामविकास विभागाच्या निर्णयानुसार सर्व तालुक्यांना समानप्रमाणात शिक्षक असावेत, एका तालुक्यात १०० टक्के शिक्षक आणि दुसरीकडे कमी शिक्षक, असे समानीकरणामुळे होत नाही. आता शिक्षक भरतीतून नवीन २५८ शिक्षक, आंतरजिल्हा बदलीतून आलेले ५४ शिक्षक व जिल्हाअंतर्गत बदलीची प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे समानीकरणातील पूर्वीच्या शाळा बदलण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीत होवू शकते. त्यावर काही दिवसांत कार्यवाही होईल आणि त्याचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाला पाठविला जाईल.

- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.