पंढरपूर : गेल्या दहा वर्षामध्ये राज्यात महिलांवरील अत्याचारामध्ये वाढ झाली आहे, अशी खंत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज येथे व्यक्त केली. दरम्यान, अशा घटनांवर कोणी राजकारण करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. .माजीमंत्री पंकजा मुंडे आज श्री विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात आल्या होत्या. दर्शनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बदलापूर घटनेवर भाष्य करताना राज्यात गेल्या दहा वर्षात महिलांवरील अत्याचारांच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या दहा वर्षामध्ये वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या निभावल्या तरी अशा घटना काही कमी झाल्या नसल्याचेही त्या म्हणाल्या..मुंडे म्हणाल्या, अत्यंत क्रूर अशा अनेक घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. गेल्या दहा वर्षात पाहिले तर निर्भया ते बदलापूरपर्यंत महिलांवरील अत्याचारामध्ये क्रूरता वाढ चालली आहे. या क्रूरतेवर अधिक लक्ष दिले पाहिजे. गुन्हेगारांना होणाऱ्या शिक्षेवरदेखील लक्ष दिले पाहिजे. या दशकातील या घटना असतील तर यामध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या लोकांनी निभावल्या आहेत. कुठे तरी हा सामाजिक प्रश्न निर्माण झाला आहे. तो व्यवस्थित हाताळला पाहिजे. .यामध्ये राजकारण केले जाऊ नये. मी विरोधी पक्षात असले असते तरी मी याचे राजकारण केले नसते. माझ्यासाठी हा संवेदनशील विषय आहे. अशा नराधमांना चौकात आणून शिक्षा दिली पाहिजे, अशी मागणीही मुंडे यांनी केली. यावेळी मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते मुंडे यांचा सत्कार केला.....म्हणून पक्षाची ताकद कमी होत नाहीएक व्यक्ती किंवा एखादा नेता पक्ष सोडून गेला म्हणजे आमच्या पक्षाची ताकद कमी झाली, असा त्याचा अर्थ होत नाही. आमच्या सोबत अनेक पक्ष आले आहेत. त्याचाही विचार केला पाहिजे. सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये जे काही लोक गेले असतील तर त्यांचा तो निर्णय आहे. मात्र त्यांच्या जाण्याने आमच्या पक्षावर काही परिणाम होईल, असे वाटत नाही, असेही मुंडे म्हणाल्या. यावेळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
पंढरपूर : गेल्या दहा वर्षामध्ये राज्यात महिलांवरील अत्याचारामध्ये वाढ झाली आहे, अशी खंत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज येथे व्यक्त केली. दरम्यान, अशा घटनांवर कोणी राजकारण करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. .माजीमंत्री पंकजा मुंडे आज श्री विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात आल्या होत्या. दर्शनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बदलापूर घटनेवर भाष्य करताना राज्यात गेल्या दहा वर्षात महिलांवरील अत्याचारांच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या दहा वर्षामध्ये वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या निभावल्या तरी अशा घटना काही कमी झाल्या नसल्याचेही त्या म्हणाल्या..मुंडे म्हणाल्या, अत्यंत क्रूर अशा अनेक घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. गेल्या दहा वर्षात पाहिले तर निर्भया ते बदलापूरपर्यंत महिलांवरील अत्याचारामध्ये क्रूरता वाढ चालली आहे. या क्रूरतेवर अधिक लक्ष दिले पाहिजे. गुन्हेगारांना होणाऱ्या शिक्षेवरदेखील लक्ष दिले पाहिजे. या दशकातील या घटना असतील तर यामध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या लोकांनी निभावल्या आहेत. कुठे तरी हा सामाजिक प्रश्न निर्माण झाला आहे. तो व्यवस्थित हाताळला पाहिजे. .यामध्ये राजकारण केले जाऊ नये. मी विरोधी पक्षात असले असते तरी मी याचे राजकारण केले नसते. माझ्यासाठी हा संवेदनशील विषय आहे. अशा नराधमांना चौकात आणून शिक्षा दिली पाहिजे, अशी मागणीही मुंडे यांनी केली. यावेळी मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते मुंडे यांचा सत्कार केला.....म्हणून पक्षाची ताकद कमी होत नाहीएक व्यक्ती किंवा एखादा नेता पक्ष सोडून गेला म्हणजे आमच्या पक्षाची ताकद कमी झाली, असा त्याचा अर्थ होत नाही. आमच्या सोबत अनेक पक्ष आले आहेत. त्याचाही विचार केला पाहिजे. सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये जे काही लोक गेले असतील तर त्यांचा तो निर्णय आहे. मात्र त्यांच्या जाण्याने आमच्या पक्षावर काही परिणाम होईल, असे वाटत नाही, असेही मुंडे म्हणाल्या. यावेळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.