Monsoon Session: दहा व पंधरा अश्वशक्तीच्या विद्युत पंपाची ही थकीत वीज बिले माफ करा, विधानसभेत मागणी

दहा अश्वशक्तीच्या विज बिल माफी कडे मोहोळ विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांचे लक्ष
farmer light bill waive mohol
farmer light bill waive mohol
Updated on

मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांनी सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या दहा व पंधरा अश्वशक्तीच्या विद्युत पंपाची ही थकीत वीज बिले माफ करावीत अशी मागणी केल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. मोहोळच्या आमदाराचे मतदार संघातील शेतकऱ्यांच्या अडचणीवर लक्ष असते. गेल्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोशाला सामोरे जावे लागले होते. त्याचा मोठा परिणाम झाल्याने शेतकऱ्यांच्या मागण्या बाबत शासन सावधगिरीने पावले टाकत आहे. त्यामुळे अधिवेशन काळात शेतकऱ्यांना झुकते माप देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्वात जमेची बाजू म्हणजे शासनाने शेतकऱ्यांचे पाच व साडेसात अश्वशक्तीचे थकीत विज बिल माफ करण्याची घोषणा केली आहे. मात्र साडेसात अश्‍वशक्तीचे विद्युत पंप खूप कमी आहेत. पाच अश्वशक्तीच्या वीज बिल माफीचा शेतकऱ्यांना सर्रास फायदा झाला आहे.

दरम्यान मोहोळ विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांनी आष्टी तलाव, उजनी डावा कालवा, आष्टी उपसा सिंचन योजनेच्या जलस्त्रोतातून 110 व 140 एम एम जलवाहिन्या टाकून पाणी शेता पर्यंत आणले आहे. पाणी शेता पर्यंत येण्यासाठी दहा, साडेबारा,पंधरा अश्वशक्तीचे विद्युत पंप बसवावे लागतात, त्यामुळे त्यांची ही थकीत वीजबिले माफ करावीत. किमान दहा अश्वशक्ती पर्यंत तरी विज बिल माफी द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या शेतकरी निर्णयाचा फेर विचार करून दहा अश्वशक्ती पर्यंत वीज बिल माफी द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

दरम्यान अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा भरूनही त्यांना फारसा लाभ मिळाला नाही. अधिकारी व्यवस्थित माहिती देत नाहीत, त्यासाठी विमा कंपनीवर कडक कारवाईचीही मागणी आमदार माने यांनी केली आहे. सध्या महिला सबलीकरणाला शासनाचे मोठे प्राधान्य आहे. त्यासाठी बचत गटाच्या अनुदानातही वाढ करण्याची तसेच मोहोळ विधानसभा मतदार संघात पंढरपूर तालुक्यातील जोडलेल्या गावात बिबट्या सदृश्य प्राण्याने गेल्या दहा ते बारा दिवसापासून धुमाकूळ घातला आहे. त्याचाही संबंधित विभागाने बंदोबस्त करण्याची मागणी आमदार माने यांनी केले आहे. शेतकरी हिताच्या या मागण्या मुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. दरम्यान दहा अश्वशक्तीच्या वीज बिल माफी कडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com