Second Home : सोमाटणे, शिरगाव, गहुंजेला ‘सेकंड होम’साठी पसंती; पुण्या-मुंबईतील धनिकांचा ओढा

गावांत गगनचुंबी इमारती निर्माण झाल्या असून जमिनीचे प्रति गुंठ्याचे भाव सरासरी सात लाख ते वीस लाखांपर्यंत वाढले आहेत.
Second Home Preference
Second Home Preferencesakal
Updated on

सोमाटणे - मुबलक पाणी, दळणवळणासाठी महामार्ग, आल्हाददायक हवामान आणि डोंगर दऱ्या यांची पुण्या-मुंबईतील धनिकांना भुरळ पडली असून ‘सेंकड होम’ साठी सोमाटणे, शिरगाव, गहुंजे, सांगवडे भागांना अधिक पसंती मिळत आहे. त्याचा परिणाम म्हणून या गावांत गगनचुंबी इमारती निर्माण झाल्या असून जमिनीचे प्रति गुंठ्याचे भाव सरासरी सात लाख ते वीस लाखांपर्यंत वाढले आहेत, तर शेती नामशेष होण्याच्या मार्गावर आली आहे.

शहरी भागातील वाढत्या नागरीकरणामुळे वाढणारे हवा, पाणी, ध्वनीचे प्रदूषण, वाहनांच्या गर्दीमुळे होणारी वाहतूक कोंडी यापासून काहीसा दिलासा आणि शांतता मिळावी, महिन्यातील सुट्टीचे काही दिवस चांगल्या आनंददायी वातावरणात घालवता यावे यासाठी पुण्या-मुंबईसह परराज्यांतील धनिकांचा ओढा शहरी भागाच्या हद्दीला जवळ असलेल्या पवन मावळातील गावांकडे वाढला आहे. ही संधी शोधून अनेक बांधकाम व्यावसायिकांनी सोमाटणे, शिरगाव, गहुंजे, सांगवडे आदी गावांना अधिक पसंती देऊन जमिनी खरेदीचा सपाटा लावला.

निसर्गरम्य वातावरणाची भुरळ

पवना नदीचे मुबलक पाणी, दळणवळणासाठी मुंबई, पुण्याला जोडणारे महामार्ग, आल्हाददायक हवामान, डोंगरदऱ्यांलगत असलेले कृषी पर्यटन केंद्रे याची भुरळ शहरी भागातील नागरिकांना पडली आहे. याचा परिणाम म्हणून सोमाटणे, शिरगाव, गहुंजे, सांगवडे या गावांत जमिनीचे भाव प्रचंड वाढले असून किमान गुंठ्याला सरासरी सात लाख ते वीस लाखांपर्यंत वाढ झाली आहे.

आरामात जीवन जगण्याकडे कल

दिवसभर शेतात कष्ट करून अल्प उत्पन्न मिळवून त्यावर साध्या पद्धतीने जीवन जगण्यापेक्षा जमीन विकून आलेले पैसे बॅंकेत ठेवून त्या पैशांच्या व्याजावर आरामात जीवन जगण्याकडे अनेक तरुणांचा कल वाढत चालला आहे. याच कारणाने सध्या या गावांत अनेक पिढ्यांपासून पिकत असलेले भात, नाचणी, वरई, ऊस, गहू, ज्वारी, बाजरी, फुलशेती, भाजीपाला या पिकाची शेती कमी होऊन त्या जागी सिमेंटचे जंगल वाढत चालले आहे.

गेल्या दहा वर्षांत सांगवडे आणि परिसरातील गावांमध्ये गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या आहेत. गावच्या लोकसंख्येपेक्षा इमारतींची संख्या जास्त झाली आहे. शेतकऱ्यांनी पुढील पिढ्यांचा विचार करून शेती विकण्याऐवजी आधुनिक पद्धतीने करणे गरजेचे आहे.

- रोहन जगताप, सरपंच, सांगवडे

भविष्यात शेतीला फार महत्त्व येणार असल्याने शेतकऱ्यांनी शेती विकू नये.

- नितीन मुऱ्हे, माजी सरपंच, सोमाटणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com