Ratan Tata Love Story: : एक यशस्वी उद्योजक आणि यशाच्या शिखरावर असतानाही टाटा ग्रुपचे माजी चेअरमन रतन टाटा यांनी लग्न केलं नाही त्यामुळं त्यांना मुलंबाळंही नाहीत. पण तरुणपणात ते एका बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते. खुद्द त्यांनी आपल्या या प्रेमाची कबुली दिली होती. पण आता त्यांच्या निधनानंतर हा किस्सा देखील चर्चेला आला आहे.
सन २०११ मध्ये आपल्या या रोमॅन्टिक आठवणींबाबत खुद्द रतन टाटा यांनी सांगितलं होतं. चार वेळा लग्न जुळता जुळता राहिलं, विविध कारणांमुळं ते लग्नापासून मागे हटले असंही त्यांनी सांगितलं होतं. एकदा रतन टाटा अमेरिकेतील लॉस एन्जेलिसमध्ये लग्न करणार होते पण त्यांच्या आजीशी संबंधित एका गोष्टीनं त्यांना लग्नापासून परावृत्त केलं होतं.
१९७०-८० च्या दशकात बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या ते प्रेमात पडले होते. बराच काळ ते दोघेही त्यांच्या प्रेमात होते. ही अभिनेत्री त्यांची पत्नी बनणार होती, पण त्यांचं लग्न होऊ शकलं नाही. त्यामुळं नंतर या अभिनेत्रीनं दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केलं. पण या अभिनेत्रीचं लग्न जास्त काळ टिकू शकलं नाही. त्यानंतर रतन टाटा यांनी कधीच लग्नाचा विचार केला नाही.
ही अभिनेत्री म्हणजे सिमी गरेवाल होय. सिमी यांचा इंग्लंडमध्ये असताना जामनगरचे महाराजा शत्रुसाल्यासिंह यांच्यासोबत रोमँटिक नातं होतं. त्यानंतर सिमी यांचं नाव मन्सूर अली खान यांच्याशी देखील जोडलं गेलं. पण मन्सूर अली खान यांनी नंतर शर्मिला टागोर यांच्याशी लग्नगाठ बांधली. त्यानंतर सिमी गरेवाल यांनी रतन टाटा यांना डेट केलं. त्यानंतर दोघेही एकमेकांच्या अकंठ प्रेमात बुडाले.
दरम्यान, अभिनेत्री सिमी गरेवाल यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की, त्यांचं आणि रतन टाटा यांचं नात खूपच जुनं आहे. रतन टाटा यांना त्यांनी परफेक्ट जेंटलमन म्हटलं होतं. तसंच ते परफेक्ट आहेत त्यांच्यामध्ये हजरजबाबीपणा देखील आहे. तसंच ते विनम्र व्यक्तीमत्व आहेत. पैसा त्यांच्यासाठी कधीही प्रेरणा राहिलं नाही. ते भारतात इतके सहज नसतात जितके परदेशात असतात, असंही सिमी गरेवाल यांनी म्हटलं होतं.
सिमी गरेवाल यांच्यासोबत रतन टाटा यांचं खूपच प्रतिबद्धतेचं नातं होतं. पण दुःखद गोष्ट हीच होती की लग्नाशिवायचं त्यांचं नातं संपुष्टात आलं. त्यांनी लग्नाची योजना आखली होती पण नशिब त्यांच्याबाजून नव्हतं. त्यानंतर सिमी गरेवाल यांनी दिल्लीच्या रवि मोहन यांच्याशी लग्न केलं. पण नंतर १९७९ मध्ये ते विभक्तही झाले.
सिमी गरेवाल यांनी कर्ज, साथी, मेरा नाम जोकर, दो बदन आणि इतर सिनेमांमध्ये अभिनय केला होता. तसंच सत्यजीत रे दिग्दर्शित अरण्येर दिन या चित्रपटातही त्यांनी काम केलं होतं. सिमी गरेवाल यांच्या प्रसिद्ध टॉक शो रेंडेजवस विद सिमी गरेवाल यामध्ये स्टार सेलिब्रेटी सहभागी होत होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.