आधी वंदू तुज मोरया, असे म्हणूनच आपण कोणत्याही कार्याची सुरुवात करतो, त्यामागची भावना ही असते, की आपल्या संकल्पात, कार्यपूर्तीत कोणताही अडथळा यायला नको. हे संकल्प जसे व्यक्तिगत असतात, तसेच सामाजिक, राष्ट्रीय पातळीवरचेही असतात. .भारताच्या दृष्टीने विचार केला, तर आर्थिक विकास हे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आपल्या डोळ्यांसमोर आहे आणि १४० कोटी जनतेच्या जीवनमानाशीच नव्हे, तर आकांक्षांशीही त्याचा संबंध आहे. या बृहद्प्रकल्पात जाणवणारी आव्हानेही बरीच आहेत. म्हणूनच त्यांना तोंड देताना यशासाठी प्रार्थना करायची ती या आपल्या बुद्धिदेवतेची, आपल्या प्रयत्नांची दिशा कायम राहावी, तात्कालिक संकटांमुळे भरकटण्याची वेळ येऊ नये, यासाठी. .आर्थिक विकासदराचा या आर्थिक वर्षासाठीचा अंदाज रिझर्व्ह बँकेने ७.२ टक्के वर्तवला होता. एप्रिल ते जून या तिमाहीची आकडेवारी नुकतीच हाती आली आणि त्यात ‘जीडीपी’ वाढीची टक्केवारी ६.७ टक्के नोंदली गेली आहे. यंदाचा मॉन्सून चांगला झाल्याने कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढले आणि महागाईचा ताण काहीसा सैलावला, तर ग्रामीण भागातून वस्तू-सेवांना मागणी वाढू शकेल. तशी ती वाढली, तर रुतलेले अर्थव्यवस्थेचे चाक बाहेर पडून धावू लागेल, अशी एक आशा आहे. पण या गुलाबी चित्रावर अनेक ‘पण’, ‘परंतु’ किंवा ‘जर-तर’च्या सावल्या पडलेल्या आहेत. त्यामुळेच आपले उद्दिष्ट यशस्वी करायचे असेल तर अर्थव्यवस्थेशी संबंधित सर्वच घटकांनी... त्यात आपण सगळेही आलो... आपला वाटा उचलायला हवा, आपली भूमिका नीट पार पाडायला हवी..सर्वांत महत्त्वाचा घटक सरकार आणि आपला राजकीय वर्ग-पॉलिटिकल क्लास. खरे तर या देशात आर्थिक सुधारणा, उदारीकरण, जागतिकीकरण यावर ढोबळ राजकीय सहमती निर्माण झाल्याचे चित्र गेल्या तीन दशकांत आपण पाहिले. केंद्रात व राज्यात सरकारे कोणत्याही पक्षाची, युतीची वा आघाडीची असोत, त्यांची धोरणाची दिशा हीच राहिली. असे असूनही सुधारणांचा वेग मंदावलेला का दिसतो? .या यक्षप्रश्नाचे एक उत्तर आपल्या ‘पॉलिटिकल इकॉनॉमी’त सापडते. सुधारणांचे उपाय जनतेला पटवून देण्यासाठी राजकीय पक्ष उत्साहाने काम करीत नाहीत. बहुतांश आर्थिक सुधारणा राज्य पातळीवर, म्हणजेच राज्य सरकारांकडून व्हायला हव्या आहेत. पण त्या रखडल्याची पुरेशी चर्चाही होत नाही. मग तो वीजमंडळांचा कारभार असो किंवा शेतमालाच्या विक्रीची रचना असो..कामगार कायद्यात सुधारणांची नुसती वाच्यता करणेही राजकीय क्षेत्रात वर्ज्य मानले जाते. म्हणूनच आर्थिक साक्षरतेच्या प्रसारासाठी स्वयंसेवी संस्था व प्रसारमाध्यमे यांनी प्रभावीपणे काम करण्याची गरज आहे. याचे कारण तत्त्वतः स्वीकार आणि तपशिलात नकार असे आपल्याकडे आर्थिक सुधारणांचे झाले आहे..चौथा घटक उद्योगपतींचा. त्यांनी देशातील आपली गुंतवणूक वाढविण्यासाठी पुढे आले पाहिजे. केवळ सरकारी खर्चावर भिस्त ठेवली, तर वित्तीय तूट, महागाई, बेरोजगारी या एका दुष्टचक्रात आपण पुरते फसू. सर्वसामान्य जनता हा अर्थातच सर्वांत महत्त्वाचा घटक. ‘प्रपंच नेटका’ करताना योग्य बचत-गुंतवणूक आणि योग्य तिथे खर्च हा समतोल डोळसपणे ठेवत वाटचाल करणे आजच्या काळात आवश्यक आहे. अशा सुज्ञ आर्थिक वर्तनाचाही देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेच्या विकासाला आधार मिळत असतो, हेही विसरता कामा नये. असा हा सर्वांच्या हातभाराने पुढे जाणारा अर्थव्यवस्थेचा ‘रथ’ आहे. त्यातील कोणतीच कडी कमकुवत राहू नये, यासाठी निश्चयही करू या आणि प्रार्थनाही!‘सकाळ मनी’चे सर्व वाचक, हितचिंतक, जाहिरातदार यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
आधी वंदू तुज मोरया, असे म्हणूनच आपण कोणत्याही कार्याची सुरुवात करतो, त्यामागची भावना ही असते, की आपल्या संकल्पात, कार्यपूर्तीत कोणताही अडथळा यायला नको. हे संकल्प जसे व्यक्तिगत असतात, तसेच सामाजिक, राष्ट्रीय पातळीवरचेही असतात. .भारताच्या दृष्टीने विचार केला, तर आर्थिक विकास हे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आपल्या डोळ्यांसमोर आहे आणि १४० कोटी जनतेच्या जीवनमानाशीच नव्हे, तर आकांक्षांशीही त्याचा संबंध आहे. या बृहद्प्रकल्पात जाणवणारी आव्हानेही बरीच आहेत. म्हणूनच त्यांना तोंड देताना यशासाठी प्रार्थना करायची ती या आपल्या बुद्धिदेवतेची, आपल्या प्रयत्नांची दिशा कायम राहावी, तात्कालिक संकटांमुळे भरकटण्याची वेळ येऊ नये, यासाठी. .आर्थिक विकासदराचा या आर्थिक वर्षासाठीचा अंदाज रिझर्व्ह बँकेने ७.२ टक्के वर्तवला होता. एप्रिल ते जून या तिमाहीची आकडेवारी नुकतीच हाती आली आणि त्यात ‘जीडीपी’ वाढीची टक्केवारी ६.७ टक्के नोंदली गेली आहे. यंदाचा मॉन्सून चांगला झाल्याने कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढले आणि महागाईचा ताण काहीसा सैलावला, तर ग्रामीण भागातून वस्तू-सेवांना मागणी वाढू शकेल. तशी ती वाढली, तर रुतलेले अर्थव्यवस्थेचे चाक बाहेर पडून धावू लागेल, अशी एक आशा आहे. पण या गुलाबी चित्रावर अनेक ‘पण’, ‘परंतु’ किंवा ‘जर-तर’च्या सावल्या पडलेल्या आहेत. त्यामुळेच आपले उद्दिष्ट यशस्वी करायचे असेल तर अर्थव्यवस्थेशी संबंधित सर्वच घटकांनी... त्यात आपण सगळेही आलो... आपला वाटा उचलायला हवा, आपली भूमिका नीट पार पाडायला हवी..सर्वांत महत्त्वाचा घटक सरकार आणि आपला राजकीय वर्ग-पॉलिटिकल क्लास. खरे तर या देशात आर्थिक सुधारणा, उदारीकरण, जागतिकीकरण यावर ढोबळ राजकीय सहमती निर्माण झाल्याचे चित्र गेल्या तीन दशकांत आपण पाहिले. केंद्रात व राज्यात सरकारे कोणत्याही पक्षाची, युतीची वा आघाडीची असोत, त्यांची धोरणाची दिशा हीच राहिली. असे असूनही सुधारणांचा वेग मंदावलेला का दिसतो? .या यक्षप्रश्नाचे एक उत्तर आपल्या ‘पॉलिटिकल इकॉनॉमी’त सापडते. सुधारणांचे उपाय जनतेला पटवून देण्यासाठी राजकीय पक्ष उत्साहाने काम करीत नाहीत. बहुतांश आर्थिक सुधारणा राज्य पातळीवर, म्हणजेच राज्य सरकारांकडून व्हायला हव्या आहेत. पण त्या रखडल्याची पुरेशी चर्चाही होत नाही. मग तो वीजमंडळांचा कारभार असो किंवा शेतमालाच्या विक्रीची रचना असो..कामगार कायद्यात सुधारणांची नुसती वाच्यता करणेही राजकीय क्षेत्रात वर्ज्य मानले जाते. म्हणूनच आर्थिक साक्षरतेच्या प्रसारासाठी स्वयंसेवी संस्था व प्रसारमाध्यमे यांनी प्रभावीपणे काम करण्याची गरज आहे. याचे कारण तत्त्वतः स्वीकार आणि तपशिलात नकार असे आपल्याकडे आर्थिक सुधारणांचे झाले आहे..चौथा घटक उद्योगपतींचा. त्यांनी देशातील आपली गुंतवणूक वाढविण्यासाठी पुढे आले पाहिजे. केवळ सरकारी खर्चावर भिस्त ठेवली, तर वित्तीय तूट, महागाई, बेरोजगारी या एका दुष्टचक्रात आपण पुरते फसू. सर्वसामान्य जनता हा अर्थातच सर्वांत महत्त्वाचा घटक. ‘प्रपंच नेटका’ करताना योग्य बचत-गुंतवणूक आणि योग्य तिथे खर्च हा समतोल डोळसपणे ठेवत वाटचाल करणे आजच्या काळात आवश्यक आहे. अशा सुज्ञ आर्थिक वर्तनाचाही देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेच्या विकासाला आधार मिळत असतो, हेही विसरता कामा नये. असा हा सर्वांच्या हातभाराने पुढे जाणारा अर्थव्यवस्थेचा ‘रथ’ आहे. त्यातील कोणतीच कडी कमकुवत राहू नये, यासाठी निश्चयही करू या आणि प्रार्थनाही!‘सकाळ मनी’चे सर्व वाचक, हितचिंतक, जाहिरातदार यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.