सदानंद मोरेआपणाला कोठेतरी मानवाचे संवेदन आणि बुद्धी यांच्यात फरक करावा लागतो. भावना संवेदित होतात. कृत्रिम बुद्धिमत्तेला संवेदन नसते. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे उपस्थित होणारे प्रश्न गंभीर तर आहेतच, पण ते गहनही आहेत यांचे भान ठेवणे आवश्यक आहे..सेपियन्स हे युवाल नोआ हरारीचे पुस्तक हिब्रू भाषेत २०११मध्ये प्रकाशित झाले. त्यानंतर ते इंग्रजी व इतर भाषेत अनुवादरूपात अवतरले. पुस्तकाच्या शीर्षकाच्या विस्तारातील अ ब्रिफ हिस्टरी ऑफ ह्यूमनकाइंड हे शब्द पुस्तक मानवजातीचा संक्षिप्त इतिहास असल्याचे सूचित करतात. हरारीचे त्यानंतरचे पुस्तक म्हणजे होमो डेअस हे त्याच्या नामविस्तारात अवर ब्रिफ हिस्टरी ऑफ टुमॉरो म्हणजे आपल्या भविष्याचा संक्षिप्त इतिहास असल्याचे सूचित होते. प्रस्तुत पुस्तक पहिल्यांदा हिब्रूमध्ये २०१५ साली प्रकाशित झाले. त्याचा इंग्रजी अवतार त्यानंतर म्हणजे २०१६मध्ये प्रकट झाला. खरेतर हा एका अर्थाने आपल्याकडे ज्याला भविष्यपुराण म्हणतात त्या प्रकारचा आहे. तो मानवजातीच्या भविष्याचा इतिहास आहे.‘होमो सेपियन’ या शब्दाचा अर्थ शहाणा अथवा सुज्ञ माणूस असा होतो. तर ‘होमो डेअस’चा अर्थ देवमानव (God-Man) असा आहे. वेगळ्या पद्धतीने सांगायचे झाल्यास माणसाच्या उत्क्रांतीचा प्रवास शहाणपणा, सुज्ञपणा किंवा रॅशनॅलिटीकडून देवत्वाकडे, डिव्हिनिटीकडे, होत आहे.मानवाच्या पूर्वेतिहासात थोडे डोकावले तर तो जेव्हा केवळ होमो इरेक्टस होता तेव्हा त्याला होमो डेअसची अवस्था गाठणे शक्य नव्हते. त्याने त्यासाठी सेपियनचा टप्पा ओलांडणे आवश्यक होते. मानवाची आताची वैज्ञानिक प्रगती त्याला अशा देवात्वाप्रत पोहोचवील अशी हरारीला खात्री आहे. हा प्रवास अमरत्वाकडील, सर्वज्ञेकडील आहे.हरारीने वर्णिलेली किंवा कल्पिलेली देवत्वाची अवस्था प्राप्त होईल तेव्हा होवो मुद्दा ‘होमो’, मानव, या शब्दाविषयाचा आहे. कसा तो पाहा -हरारीच्या दुसऱ्या पुस्तकाच्या शीर्षकात ‘होमो’ शब्द अवतीर्ण झालेला आहेच. (होमो डेअस) पहिल्या पुस्तकाच्या शीर्षकात ‘सेपियन्स’ शब्द वापरताना त्याच्या अगोदर ‘होमो’ शब्द प्रयुक्त केला नसला तरी ‘अ ब्रिफ हिस्टरी ऑफ ह्यूमनकाइंड’ असा जो शब्दप्रयोग केला गेला आहे त्याचा अर्थ ‘होमो’ असाच होतो.थोडक्यात सांगायचे म्हणजे मानवाच्या उत्क्रांतीच्या पुढील टप्प्याचा वाचक म्हणून हरारी ‘होमो’ हाच शब्द कायम ठेवतो. दुसरीकडे नेमका शब्दप्रयोग किंवा वाचक शब्द न सापडल्याने ‘पोस्ट ह्यूमन’ शब्द वापरला जातो. मानवोत्तर असे म्हटले जाते.असे होणेही तितकेच स्वाभाविक समजले पाहिजे. अभ्यासक-संशोधकांपैकी बरीच मंडळी नास्तिक असतात. लौकिक गोष्टींच्या स्पष्टीकरणात देव वगैरे अलौकिक, इंद्रियातीत वस्तूंचा प्रवेश त्यांना योग्य वाटत नाही. या मंडळींच्या हे लक्षात येत नाही, की ज्याप्रमाणे अध्यात्म, धर्म यासंबंधीची मांडणी करणारे विद्वान लौकिक सृष्टीतील वस्तूंचा रूपकात्मक उपयोग करतात, त्याचप्रमाणे लौकिक व्यवहाराचे विवेचन करणाऱ्यांनाही अलौकिक सृष्टीचा रूपकात्मक (Metaphorical) उपयोग करायला हरकत नसावी.पाश्चात्त्य विचारपरंपरेचा इतिहास तपासला तर ‘देव’ कल्पनेचा उगम कसा झाला, याविषयी चर्चा झाली असल्याचे दिसून येते. मार्क्सच्या समकालीन, मार्क्सला (एकेकाळी) गुरुतुल्य असलेला व हेगेलने प्रभावित झालेला लुड्विग फ्यूरबाख हा विचारवंत या संदर्भात प्रातिनिधिक मानायला हरकत नाही.फ्यूरबाखच्या म्हणण्याप्रमाणे ईश्वर म्हणजे दुसरे तिसरे काही नसून मानवाच्या सारतत्त्वांचे मानवानेच केलेले बाह्य प्रक्षेपण (Projection) आहे. सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सर्वकर्ता असे गुणधर्म मानवात- आपल्यात- असावेत असे माणसांना वाटतच असते. पण प्रत्यक्षात मानवी व्यक्तींमध्ये ते नसतात. त्यामुळे मानव अशा गुणांचा पूर्ण परिपोष झालेल्या अस्तित्वाची कल्पना करतो, त्यालाच ईश्वर किंवा देव असे मानतो. थोडक्यात ईश्वर म्हणजे परिपूर्ण मानव -पुरुषोत्तम. मानवाची धडपड या पूर्णत्वाकडेच चाललेली असते. हरारीला ‘होमो डेअस’ (Man-God) शब्दाने हेच अभिप्रेत आहे. त्याने अशा अलौकिकातील कल्पनेचा उपयोग सुज्ञ मानवाच्या उत्क्रांत टप्प्यासाठी- त्याच्या नामकरणासाठी- करून घेतला. त्यामुळे उद्या खरोखरीच हा टप्पा मानवाने गाठला तर देवाचे काय होणार, त्याचे आणि या मानवाचे संबंध कसे असतील, मानव त्याची प्रार्थना, भक्ती वगैरे करील काय अशा स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात अर्थ नाही..मुद्दा हा आहे, की हरारी ज्याला ‘होमो डेअस’ म्हणतो तो टप्पा आजच्या मानवाच्या होमो सेपियन्सनंतर येणार असल्यामुळे या अर्थाने त्यालाही ‘पोस्ट ह्यूमन’ म्हणायला हरकत नसावी. अर्थात तसे करणे ना ‘पोस्टह्युमॅनिस्ट’ लोकांना आवडेल ना हरारीलाही पटेल.हरारीच्या दोन पुस्तकांच्या विवेचनाची पार्श्वभूमी म्हणून उल्लेख केल्यानंतर परत मानवोत्तरतेच्या संकल्पनेकडे वळायला हरकत नसावी. त्या संकल्पनेचे समर्थन करणारे म्हणजेच मानवाने तंत्रसामग्रीच्या कृत्रिम उपायांच्या व उपकरणाचा उपयोग करून आपल्या स्वाभाविक (नैसर्गिक) मर्यादा ओलांडायला हरकत नाही असे म्हणणारे, त्याविषयी तटस्थ राहणारे आणि ते उचित नसल्याचे समजणारे असे तीन प्रकारचे लोक संभवतात. तिसऱ्या वर्गाचा प्रातिनिधिक विचारवंत या नात्याने आपण फ्रान्सिस फुकुयामाची चर्चा सुरू केली होती. खरेतर हरारी ज्याप्रमाणे समग्र मानवजातीचा विचार करतो त्याप्रमाणे फुकुयामाही करतो. एक अर्थाने हे विद्वान मानवशास्त्रीय इतिहासकार (Anthropological Historian) आहेत, असे म्हणायला हरकत नाही. फुकुयामाच्या गाजलेल्या दी एन्ड ऑफ हिस्टरी या पुस्तकाची चर्चा करताना हा मुद्दा स्पर्शिला गेला होता. हरारी तर स्पष्टपणे ‘हिस्टरी ऑफ ह्यूमनकाइंड’ असा उल्लेखच करतो. फुकुयामाही वेगळ्या पद्धतीने मानवजातीचाच विचार करीत आहे.मानव हा मुळातच बुद्ध्यनुसारी वागणारा असल्यामुळे इतिहासकाळात प्रयत्न आणि प्रमाद (Trial and Error) पद्धतीने वाटचाल करताना, त्याने सर्व बाबींची, तत्त्वांची उपयुक्तता विचारपूर्वक म्हणजेच बुद्धीच्या साहाय्याने तपासून पाहिली; योग्य वाटली ती कायम करून इतरांचा त्याग केला. असेही म्हणता येईल, की अशा संस्थांचीही उत्क्रांती होत असते. ती अर्थातच या संस्थांच्या अस्तित्वासाठी कलहतत्त्वाला अनुसरून होत असते. कलहात किंवा स्पर्धेत जी लायक किंवा ‘फिट’ ठरते ती टिकते, म्हणजेच तिची निवड केली जाते. फुकुयामाचा दी एन्ड ऑफ हिस्टरी हा ग्रंथ एकप्रकारे मानवाने निर्माण केलेल्या अशा आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक संस्थांच्या उत्क्रांतीतत्त्वाला अनुसरून लिहिलेला इतिहासच आहे, असे म्हणता येते. या इतिहासात व्यक्तिनिष्ठ लोकशाही ही संस्था आपली उपयुक्तता सिद्ध करीत टिकून राहिली. ज्यांनी आजवर ही संस्थात्मक व्यवस्था प्रत्यक्षात स्वीकारली नाही त्यांनीही ती तत्त्वतः स्वीकारलेलीच आहे. आज ना उद्या त्यांना तिचा वास्तविकतया स्वीकार करण्याशिवाय गत्यंतर नाही, अशी ही उत्क्रांतिवादी इतिहासमीमांसा आहे. फुकुयामाच्या दृष्टीने व्यक्तिनिष्ठ भांडवलवादी लोकशाहीचा हा तात्त्विक विजय म्हणजे तत्त्वतः इतिहासाचाही अंतच होय. खरेतर अशा नकारात्मक मांडणीचे कारण नव्हते. जे काही घडले ती इतिहासाची परिपूर्ती होती, समापन होते असे हेगेलच्या पद्धतीने म्हणायला हरकत नाही आणि अर्थात लेखकालाही तेच अभिप्रेत आहे.तत्त्वतः जे घडले ते वास्तवात घडण्याच्या आड येणारी बाब म्हणजे इस्लामी संस्कृती, असे म्हणणाऱ्या सॅम्युअल हंटिग्टनने एका अर्थाने हरारीच्या विवेचनातील तपशिलाच्या जागा भरून काढल्या. याचा उल्लेख यापूर्वी झालेला आहेच.पण प्रश्न असा आहे की उद्या हंटिग्टन जिचा बागुलबुवा दाखवतो त्या इस्लामी संस्कृतीला म्हणजे अर्थातच तिचा पुरस्कार करणाऱ्या राष्ट्रांना किंवा तेथील जनतेला आपणहोऊन व्यक्तिनिष्ठ भांडवली लोकशाहीचे श्रेष्ठत्व पटले व त्यांनी तिचा स्वीकार केला, किंवा परिस्थितीच्या दडपणामुळे त्यांना तो करावा लागला तर फुकुयामाच्या स्वप्नाची पूर्ती झाली असे म्हणायचे का?.दुर्दैवाने तसे नाही. फुकुयामा आणि हरारी यांचे सांधे जुळवून सांगायचे झाल्यास असे म्हणता येते, की फुकुयामाच्या विचारात मानवी व्यक्तींच्या उत्क्रांतीपेक्षा मानवी संस्थांच्या उत्क्रांतीप्रक्रियेवर अधिक भर दिला गेलेला दिसतो. हरारी विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मानवी व्यक्तींमध्ये, त्यांच्या प्रकृतीच्या जडणघडणीमध्ये होणाऱ्या बदलांकडेही लक्ष वेधतो. हे बदल इतके टोकाचे असतील, की त्यातून निष्पन्न होणाऱ्या जिवाला मानवाच्या उत्क्रांतीचा पुढील टप्पा मानावा, की तो एक गुणात्मकपणे भिन्न असणारा असा जीव समजावा. जो ‘होमो सो अॅण्ड सो’ अशा मानवाच्यासंदर्भात केलेल्या विवेचनचौकटीत सामावलाच जात नाही. त्याला उदाहरणार्थ . ‘होमो टेक्निकस’ म्हणावे तर टेक्नॉलॉजीचा उपयोग, पुरेसा उपयोग, पूर्वाव्यवस्थेतील मानव करीत होताच. म्हणूनच अनेक विद्वानांनी त्यांच्यासाठी ‘पोस्ट ह्यूमन’ ही संज्ञा कायम केली. फुकुयामाही तिच्या आधारेच विवेचन करताना दिसतो. खरेतर पूर्वीच्या दोन सलग टप्प्यांवर घडलेल्या बदलांना आपण उत्क्रांती म्हणतो तशी ही उत्क्रांती नसून एक प्रकारची क्रांती, मूलभूत (Radical) परिवर्तन आहे. एक प्रकारची (क्वांटम म्हणूया का, तुलनेसाठी अर्थातच रूपकात्मक) झेप किंवा छलांग आहे.माहिती तंत्रज्ञान (IT) आणि जैवतंत्रज्ञान (BT) यामुळे शक्य झालेल्या या महापरिवर्तनाचा परिणाम काय होईल, हा पहिला प्रश्न आणि जो काही होईल तो इष्ट मानावा की अनिष्ट, हा दुसरा. फुकुयामामधील मानवशास्त्रीय इतिहासकाराला असे वाटते, की उत्क्रांतीच्या प्रक्रियेत मानवाने प्रयत्नपूर्वक ज्या गुणवैशिष्ट्यांची जोपासना केली आहे आणि ज्यांच्यामुळे त्याला मानव अशी ओळख मिळाली आहे आणि तो सृष्टीमधील सर्वात प्रभावी जीव ठरला आहे; त्या त्याच्या गुणवैशिष्ट्यांना दवडेल असे परिवर्तन शक्य असले, तरी इष्ट नसल्याने त्याचा स्वीकार करू नये. ही गुणवैशिष्ट्ये क्रांतीप्रक्रियेत मानवाने विकसित केली व त्यांच्यामुळेच मानवाला अस्तित्वासाठी चाललेल्या जीवनार्थ कलहात व स्पर्धेत इतरांवर मात करीत स्वतःला टिकवता आले व स्वतःचा दर्जा वाढवता आला. प्राण्यांची वाटचाल त्यांच्या प्रकृतीला अनुसरत झाली. मानवाने या प्रकृतीवर संस्कृतीचा इमला उभा केला. नैतिक निवड, भाषा, बुद्धी, भावना, सामाजिकता अशा गुणसमुच्चयाचा माणूसपण घडविण्यात वाटा आहे. माणसाच्या प्राकृतिक क्षमतांचे आणि सामर्थ्याचे संवर्धन (Enhancement) करायला सिद्ध झालेल्या वैज्ञानिकांना अशा संवर्धनप्रक्रियेत कृत्रिम उपायांना व उपकरणांना, तंत्रांना वापरण्यात काहीही चुकीचे वाटत नाही, ही फुकुयामासाठी चिंतेची बाब आहे. त्यातूनच त्याचे अवर पोस्टह्यूमन फ्युचर हे पुस्तक सिद्ध झाले..मानवाने विकसित केलेल्या गुणवैशिष्ट्यांच्या समुच्चयाला फुकुयामा ‘फॅक्टर एक्स’ असे नाव देतो. खरेतर या गुणांमधील बुद्धीला (Reason) प्राधान्य देत, तिला पायाभूत मानूनच आजवरचे मानवविषयक चर्चाविश्व घडत गेले. पण याचा अर्थ तेच सर्वस्व आहे, असा नाही आणि विशेष म्हणजे आज जी समस्या किंवा अरिष्ट आलेले दिसते त्याचे कारण, बुद्धी या वैशिष्ट्याला अलग करून त्याचा मानवी देहाबाहेर, स्वतंत्रपणे विकास करण्यात आला, हे होय. मानवाच्या गुणधर्मांचे बाहेर काल्पनिक प्रक्षेपण करीत ईश्वराची निर्मिती झाली असे फ्यूरबाख म्हणाला होता खरा. येथे मात्र खरोखरच या बुद्धीचा विकास मानवी देहाबाहेरील जीव आणि जाणीव नसलेल्या वस्तूंमध्ये किंवा वस्तूंच्या साहाय्याने करण्यात आला, ही वस्तुस्थिती आहे. अशा प्रकारे निर्माण करण्यात आलेली ही कृत्रिम बुद्धी (कृबु), मानवाने नैसर्गिकरित्या आपल्या व्यक्तिमत्त्वात मशागत करून विकसित केलेल्या बुद्धीच्या कानामागून येऊन तिखट झाल्याच्या अनुभव येत आहे.मानवाच्या गुणसमुच्चयात एक आहे भावना (Emotion) निर्मिती. तिच्या बरोबरीने बुद्धीही विचारात घेण्यात येते. या दोघांमधील संबंध हा सॉक्रेटिस-प्लेटो-ॲरिस्टॉटलच्या काळापासून चर्चेचा विषय ठरला असल्याचे आपण जाणतो. गणित सोडवणे हे बुद्धीचे कार्य मानले जाते व कथा, कविता, कादंबरी यांची निर्मिती प्रतिभेचे कार्य असल्याचा समज रूढ आहे. प्रतिभेला बुद्धीचाच एक आविष्कार मानले काय किंवा बुद्धी जेव्हा असे निर्मितीचे कार्य करते तेव्हा तिलाच प्रतिभा मानले काय, चालण्यासारखे आहे. पण याचा अर्थ असा होतो, की ही अशी प्रतिभा कार्यान्वित असेल तरच उदाहरणार्थ, वैज्ञानिकाला नवा सिद्धांत स्फुरू शकतो. तरीही अशा सिद्धांत स्फुरण्यात भावनेचा काही एक वाटा असल्याचा दावा कोणी करील, असे वाटत नाही. पण कविता स्फुरताना मात्र प्रतिभाशक्तीला भावनेचा आधार लागतो.या मुद्द्याचा परिणाम साहित्याच्या व्यवहारावर कसा होऊ शकतो ते पाहा. काव्य म्हणजे ‘स्पॉन्टेनिअस ओव्हरफ्लो ऑफ इमोशन्स’ असे वर्डस्वर्थचे उद्धरण जगभर सांगितले जाते. भले त्याला कवितेचे रूप प्राप्त होताना काहीएका शांततेची गरज लागत असेल. पण वर्डस्वर्थसारख्या कवीच्या कवितेप्रमाणेच, किंबहुना तिच्याशी बरोबरी करू शकेल अशी कविता कृबुकडून निर्मून घेता येईल, हे उघड आहे पण या कवितेत ‘स्पॉन्टेनिअस ओव्हरफ्लो ऑफ इमोशन्स’चा संबंध असणार नाही. म्हणजेच आपणाला कोठेतरी मानवाचे संवेदन (Feeling) आणि बुद्धी यांच्यात फरक करावा लागतो. भावना संवेदित होतात. They are felt. कृबुला संवेदन नसते, Feeling नसते. जाणीव (Consciousness) विकसित झाली तरी संवेदन हा तिचा भाग असेल काय?कृबुमुळे उपस्थित होणारे प्रश्न गंभीर तर आहेतच, पण ते गहनही आहेत यांचे भान ठेवणे आवश्यक आहे. तरच फुकुयामासारखे विचारवंत काय म्हणतात हे कळू शकेल.(डॉ. सदानंद मोरे इतिहास व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि संशोधक तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आहेत.)----------------------------------------------------.Technology Device : तुमचा मोबाईल यूजर फ्रेंडली आहे का? मोबाईल युझर इंटरफेसचं महत्व काय? समजून घेऊया .ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
सदानंद मोरेआपणाला कोठेतरी मानवाचे संवेदन आणि बुद्धी यांच्यात फरक करावा लागतो. भावना संवेदित होतात. कृत्रिम बुद्धिमत्तेला संवेदन नसते. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे उपस्थित होणारे प्रश्न गंभीर तर आहेतच, पण ते गहनही आहेत यांचे भान ठेवणे आवश्यक आहे..सेपियन्स हे युवाल नोआ हरारीचे पुस्तक हिब्रू भाषेत २०११मध्ये प्रकाशित झाले. त्यानंतर ते इंग्रजी व इतर भाषेत अनुवादरूपात अवतरले. पुस्तकाच्या शीर्षकाच्या विस्तारातील अ ब्रिफ हिस्टरी ऑफ ह्यूमनकाइंड हे शब्द पुस्तक मानवजातीचा संक्षिप्त इतिहास असल्याचे सूचित करतात. हरारीचे त्यानंतरचे पुस्तक म्हणजे होमो डेअस हे त्याच्या नामविस्तारात अवर ब्रिफ हिस्टरी ऑफ टुमॉरो म्हणजे आपल्या भविष्याचा संक्षिप्त इतिहास असल्याचे सूचित होते. प्रस्तुत पुस्तक पहिल्यांदा हिब्रूमध्ये २०१५ साली प्रकाशित झाले. त्याचा इंग्रजी अवतार त्यानंतर म्हणजे २०१६मध्ये प्रकट झाला. खरेतर हा एका अर्थाने आपल्याकडे ज्याला भविष्यपुराण म्हणतात त्या प्रकारचा आहे. तो मानवजातीच्या भविष्याचा इतिहास आहे.‘होमो सेपियन’ या शब्दाचा अर्थ शहाणा अथवा सुज्ञ माणूस असा होतो. तर ‘होमो डेअस’चा अर्थ देवमानव (God-Man) असा आहे. वेगळ्या पद्धतीने सांगायचे झाल्यास माणसाच्या उत्क्रांतीचा प्रवास शहाणपणा, सुज्ञपणा किंवा रॅशनॅलिटीकडून देवत्वाकडे, डिव्हिनिटीकडे, होत आहे.मानवाच्या पूर्वेतिहासात थोडे डोकावले तर तो जेव्हा केवळ होमो इरेक्टस होता तेव्हा त्याला होमो डेअसची अवस्था गाठणे शक्य नव्हते. त्याने त्यासाठी सेपियनचा टप्पा ओलांडणे आवश्यक होते. मानवाची आताची वैज्ञानिक प्रगती त्याला अशा देवात्वाप्रत पोहोचवील अशी हरारीला खात्री आहे. हा प्रवास अमरत्वाकडील, सर्वज्ञेकडील आहे.हरारीने वर्णिलेली किंवा कल्पिलेली देवत्वाची अवस्था प्राप्त होईल तेव्हा होवो मुद्दा ‘होमो’, मानव, या शब्दाविषयाचा आहे. कसा तो पाहा -हरारीच्या दुसऱ्या पुस्तकाच्या शीर्षकात ‘होमो’ शब्द अवतीर्ण झालेला आहेच. (होमो डेअस) पहिल्या पुस्तकाच्या शीर्षकात ‘सेपियन्स’ शब्द वापरताना त्याच्या अगोदर ‘होमो’ शब्द प्रयुक्त केला नसला तरी ‘अ ब्रिफ हिस्टरी ऑफ ह्यूमनकाइंड’ असा जो शब्दप्रयोग केला गेला आहे त्याचा अर्थ ‘होमो’ असाच होतो.थोडक्यात सांगायचे म्हणजे मानवाच्या उत्क्रांतीच्या पुढील टप्प्याचा वाचक म्हणून हरारी ‘होमो’ हाच शब्द कायम ठेवतो. दुसरीकडे नेमका शब्दप्रयोग किंवा वाचक शब्द न सापडल्याने ‘पोस्ट ह्यूमन’ शब्द वापरला जातो. मानवोत्तर असे म्हटले जाते.असे होणेही तितकेच स्वाभाविक समजले पाहिजे. अभ्यासक-संशोधकांपैकी बरीच मंडळी नास्तिक असतात. लौकिक गोष्टींच्या स्पष्टीकरणात देव वगैरे अलौकिक, इंद्रियातीत वस्तूंचा प्रवेश त्यांना योग्य वाटत नाही. या मंडळींच्या हे लक्षात येत नाही, की ज्याप्रमाणे अध्यात्म, धर्म यासंबंधीची मांडणी करणारे विद्वान लौकिक सृष्टीतील वस्तूंचा रूपकात्मक उपयोग करतात, त्याचप्रमाणे लौकिक व्यवहाराचे विवेचन करणाऱ्यांनाही अलौकिक सृष्टीचा रूपकात्मक (Metaphorical) उपयोग करायला हरकत नसावी.पाश्चात्त्य विचारपरंपरेचा इतिहास तपासला तर ‘देव’ कल्पनेचा उगम कसा झाला, याविषयी चर्चा झाली असल्याचे दिसून येते. मार्क्सच्या समकालीन, मार्क्सला (एकेकाळी) गुरुतुल्य असलेला व हेगेलने प्रभावित झालेला लुड्विग फ्यूरबाख हा विचारवंत या संदर्भात प्रातिनिधिक मानायला हरकत नाही.फ्यूरबाखच्या म्हणण्याप्रमाणे ईश्वर म्हणजे दुसरे तिसरे काही नसून मानवाच्या सारतत्त्वांचे मानवानेच केलेले बाह्य प्रक्षेपण (Projection) आहे. सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सर्वकर्ता असे गुणधर्म मानवात- आपल्यात- असावेत असे माणसांना वाटतच असते. पण प्रत्यक्षात मानवी व्यक्तींमध्ये ते नसतात. त्यामुळे मानव अशा गुणांचा पूर्ण परिपोष झालेल्या अस्तित्वाची कल्पना करतो, त्यालाच ईश्वर किंवा देव असे मानतो. थोडक्यात ईश्वर म्हणजे परिपूर्ण मानव -पुरुषोत्तम. मानवाची धडपड या पूर्णत्वाकडेच चाललेली असते. हरारीला ‘होमो डेअस’ (Man-God) शब्दाने हेच अभिप्रेत आहे. त्याने अशा अलौकिकातील कल्पनेचा उपयोग सुज्ञ मानवाच्या उत्क्रांत टप्प्यासाठी- त्याच्या नामकरणासाठी- करून घेतला. त्यामुळे उद्या खरोखरीच हा टप्पा मानवाने गाठला तर देवाचे काय होणार, त्याचे आणि या मानवाचे संबंध कसे असतील, मानव त्याची प्रार्थना, भक्ती वगैरे करील काय अशा स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात अर्थ नाही..मुद्दा हा आहे, की हरारी ज्याला ‘होमो डेअस’ म्हणतो तो टप्पा आजच्या मानवाच्या होमो सेपियन्सनंतर येणार असल्यामुळे या अर्थाने त्यालाही ‘पोस्ट ह्यूमन’ म्हणायला हरकत नसावी. अर्थात तसे करणे ना ‘पोस्टह्युमॅनिस्ट’ लोकांना आवडेल ना हरारीलाही पटेल.हरारीच्या दोन पुस्तकांच्या विवेचनाची पार्श्वभूमी म्हणून उल्लेख केल्यानंतर परत मानवोत्तरतेच्या संकल्पनेकडे वळायला हरकत नसावी. त्या संकल्पनेचे समर्थन करणारे म्हणजेच मानवाने तंत्रसामग्रीच्या कृत्रिम उपायांच्या व उपकरणाचा उपयोग करून आपल्या स्वाभाविक (नैसर्गिक) मर्यादा ओलांडायला हरकत नाही असे म्हणणारे, त्याविषयी तटस्थ राहणारे आणि ते उचित नसल्याचे समजणारे असे तीन प्रकारचे लोक संभवतात. तिसऱ्या वर्गाचा प्रातिनिधिक विचारवंत या नात्याने आपण फ्रान्सिस फुकुयामाची चर्चा सुरू केली होती. खरेतर हरारी ज्याप्रमाणे समग्र मानवजातीचा विचार करतो त्याप्रमाणे फुकुयामाही करतो. एक अर्थाने हे विद्वान मानवशास्त्रीय इतिहासकार (Anthropological Historian) आहेत, असे म्हणायला हरकत नाही. फुकुयामाच्या गाजलेल्या दी एन्ड ऑफ हिस्टरी या पुस्तकाची चर्चा करताना हा मुद्दा स्पर्शिला गेला होता. हरारी तर स्पष्टपणे ‘हिस्टरी ऑफ ह्यूमनकाइंड’ असा उल्लेखच करतो. फुकुयामाही वेगळ्या पद्धतीने मानवजातीचाच विचार करीत आहे.मानव हा मुळातच बुद्ध्यनुसारी वागणारा असल्यामुळे इतिहासकाळात प्रयत्न आणि प्रमाद (Trial and Error) पद्धतीने वाटचाल करताना, त्याने सर्व बाबींची, तत्त्वांची उपयुक्तता विचारपूर्वक म्हणजेच बुद्धीच्या साहाय्याने तपासून पाहिली; योग्य वाटली ती कायम करून इतरांचा त्याग केला. असेही म्हणता येईल, की अशा संस्थांचीही उत्क्रांती होत असते. ती अर्थातच या संस्थांच्या अस्तित्वासाठी कलहतत्त्वाला अनुसरून होत असते. कलहात किंवा स्पर्धेत जी लायक किंवा ‘फिट’ ठरते ती टिकते, म्हणजेच तिची निवड केली जाते. फुकुयामाचा दी एन्ड ऑफ हिस्टरी हा ग्रंथ एकप्रकारे मानवाने निर्माण केलेल्या अशा आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक संस्थांच्या उत्क्रांतीतत्त्वाला अनुसरून लिहिलेला इतिहासच आहे, असे म्हणता येते. या इतिहासात व्यक्तिनिष्ठ लोकशाही ही संस्था आपली उपयुक्तता सिद्ध करीत टिकून राहिली. ज्यांनी आजवर ही संस्थात्मक व्यवस्था प्रत्यक्षात स्वीकारली नाही त्यांनीही ती तत्त्वतः स्वीकारलेलीच आहे. आज ना उद्या त्यांना तिचा वास्तविकतया स्वीकार करण्याशिवाय गत्यंतर नाही, अशी ही उत्क्रांतिवादी इतिहासमीमांसा आहे. फुकुयामाच्या दृष्टीने व्यक्तिनिष्ठ भांडवलवादी लोकशाहीचा हा तात्त्विक विजय म्हणजे तत्त्वतः इतिहासाचाही अंतच होय. खरेतर अशा नकारात्मक मांडणीचे कारण नव्हते. जे काही घडले ती इतिहासाची परिपूर्ती होती, समापन होते असे हेगेलच्या पद्धतीने म्हणायला हरकत नाही आणि अर्थात लेखकालाही तेच अभिप्रेत आहे.तत्त्वतः जे घडले ते वास्तवात घडण्याच्या आड येणारी बाब म्हणजे इस्लामी संस्कृती, असे म्हणणाऱ्या सॅम्युअल हंटिग्टनने एका अर्थाने हरारीच्या विवेचनातील तपशिलाच्या जागा भरून काढल्या. याचा उल्लेख यापूर्वी झालेला आहेच.पण प्रश्न असा आहे की उद्या हंटिग्टन जिचा बागुलबुवा दाखवतो त्या इस्लामी संस्कृतीला म्हणजे अर्थातच तिचा पुरस्कार करणाऱ्या राष्ट्रांना किंवा तेथील जनतेला आपणहोऊन व्यक्तिनिष्ठ भांडवली लोकशाहीचे श्रेष्ठत्व पटले व त्यांनी तिचा स्वीकार केला, किंवा परिस्थितीच्या दडपणामुळे त्यांना तो करावा लागला तर फुकुयामाच्या स्वप्नाची पूर्ती झाली असे म्हणायचे का?.दुर्दैवाने तसे नाही. फुकुयामा आणि हरारी यांचे सांधे जुळवून सांगायचे झाल्यास असे म्हणता येते, की फुकुयामाच्या विचारात मानवी व्यक्तींच्या उत्क्रांतीपेक्षा मानवी संस्थांच्या उत्क्रांतीप्रक्रियेवर अधिक भर दिला गेलेला दिसतो. हरारी विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मानवी व्यक्तींमध्ये, त्यांच्या प्रकृतीच्या जडणघडणीमध्ये होणाऱ्या बदलांकडेही लक्ष वेधतो. हे बदल इतके टोकाचे असतील, की त्यातून निष्पन्न होणाऱ्या जिवाला मानवाच्या उत्क्रांतीचा पुढील टप्पा मानावा, की तो एक गुणात्मकपणे भिन्न असणारा असा जीव समजावा. जो ‘होमो सो अॅण्ड सो’ अशा मानवाच्यासंदर्भात केलेल्या विवेचनचौकटीत सामावलाच जात नाही. त्याला उदाहरणार्थ . ‘होमो टेक्निकस’ म्हणावे तर टेक्नॉलॉजीचा उपयोग, पुरेसा उपयोग, पूर्वाव्यवस्थेतील मानव करीत होताच. म्हणूनच अनेक विद्वानांनी त्यांच्यासाठी ‘पोस्ट ह्यूमन’ ही संज्ञा कायम केली. फुकुयामाही तिच्या आधारेच विवेचन करताना दिसतो. खरेतर पूर्वीच्या दोन सलग टप्प्यांवर घडलेल्या बदलांना आपण उत्क्रांती म्हणतो तशी ही उत्क्रांती नसून एक प्रकारची क्रांती, मूलभूत (Radical) परिवर्तन आहे. एक प्रकारची (क्वांटम म्हणूया का, तुलनेसाठी अर्थातच रूपकात्मक) झेप किंवा छलांग आहे.माहिती तंत्रज्ञान (IT) आणि जैवतंत्रज्ञान (BT) यामुळे शक्य झालेल्या या महापरिवर्तनाचा परिणाम काय होईल, हा पहिला प्रश्न आणि जो काही होईल तो इष्ट मानावा की अनिष्ट, हा दुसरा. फुकुयामामधील मानवशास्त्रीय इतिहासकाराला असे वाटते, की उत्क्रांतीच्या प्रक्रियेत मानवाने प्रयत्नपूर्वक ज्या गुणवैशिष्ट्यांची जोपासना केली आहे आणि ज्यांच्यामुळे त्याला मानव अशी ओळख मिळाली आहे आणि तो सृष्टीमधील सर्वात प्रभावी जीव ठरला आहे; त्या त्याच्या गुणवैशिष्ट्यांना दवडेल असे परिवर्तन शक्य असले, तरी इष्ट नसल्याने त्याचा स्वीकार करू नये. ही गुणवैशिष्ट्ये क्रांतीप्रक्रियेत मानवाने विकसित केली व त्यांच्यामुळेच मानवाला अस्तित्वासाठी चाललेल्या जीवनार्थ कलहात व स्पर्धेत इतरांवर मात करीत स्वतःला टिकवता आले व स्वतःचा दर्जा वाढवता आला. प्राण्यांची वाटचाल त्यांच्या प्रकृतीला अनुसरत झाली. मानवाने या प्रकृतीवर संस्कृतीचा इमला उभा केला. नैतिक निवड, भाषा, बुद्धी, भावना, सामाजिकता अशा गुणसमुच्चयाचा माणूसपण घडविण्यात वाटा आहे. माणसाच्या प्राकृतिक क्षमतांचे आणि सामर्थ्याचे संवर्धन (Enhancement) करायला सिद्ध झालेल्या वैज्ञानिकांना अशा संवर्धनप्रक्रियेत कृत्रिम उपायांना व उपकरणांना, तंत्रांना वापरण्यात काहीही चुकीचे वाटत नाही, ही फुकुयामासाठी चिंतेची बाब आहे. त्यातूनच त्याचे अवर पोस्टह्यूमन फ्युचर हे पुस्तक सिद्ध झाले..मानवाने विकसित केलेल्या गुणवैशिष्ट्यांच्या समुच्चयाला फुकुयामा ‘फॅक्टर एक्स’ असे नाव देतो. खरेतर या गुणांमधील बुद्धीला (Reason) प्राधान्य देत, तिला पायाभूत मानूनच आजवरचे मानवविषयक चर्चाविश्व घडत गेले. पण याचा अर्थ तेच सर्वस्व आहे, असा नाही आणि विशेष म्हणजे आज जी समस्या किंवा अरिष्ट आलेले दिसते त्याचे कारण, बुद्धी या वैशिष्ट्याला अलग करून त्याचा मानवी देहाबाहेर, स्वतंत्रपणे विकास करण्यात आला, हे होय. मानवाच्या गुणधर्मांचे बाहेर काल्पनिक प्रक्षेपण करीत ईश्वराची निर्मिती झाली असे फ्यूरबाख म्हणाला होता खरा. येथे मात्र खरोखरच या बुद्धीचा विकास मानवी देहाबाहेरील जीव आणि जाणीव नसलेल्या वस्तूंमध्ये किंवा वस्तूंच्या साहाय्याने करण्यात आला, ही वस्तुस्थिती आहे. अशा प्रकारे निर्माण करण्यात आलेली ही कृत्रिम बुद्धी (कृबु), मानवाने नैसर्गिकरित्या आपल्या व्यक्तिमत्त्वात मशागत करून विकसित केलेल्या बुद्धीच्या कानामागून येऊन तिखट झाल्याच्या अनुभव येत आहे.मानवाच्या गुणसमुच्चयात एक आहे भावना (Emotion) निर्मिती. तिच्या बरोबरीने बुद्धीही विचारात घेण्यात येते. या दोघांमधील संबंध हा सॉक्रेटिस-प्लेटो-ॲरिस्टॉटलच्या काळापासून चर्चेचा विषय ठरला असल्याचे आपण जाणतो. गणित सोडवणे हे बुद्धीचे कार्य मानले जाते व कथा, कविता, कादंबरी यांची निर्मिती प्रतिभेचे कार्य असल्याचा समज रूढ आहे. प्रतिभेला बुद्धीचाच एक आविष्कार मानले काय किंवा बुद्धी जेव्हा असे निर्मितीचे कार्य करते तेव्हा तिलाच प्रतिभा मानले काय, चालण्यासारखे आहे. पण याचा अर्थ असा होतो, की ही अशी प्रतिभा कार्यान्वित असेल तरच उदाहरणार्थ, वैज्ञानिकाला नवा सिद्धांत स्फुरू शकतो. तरीही अशा सिद्धांत स्फुरण्यात भावनेचा काही एक वाटा असल्याचा दावा कोणी करील, असे वाटत नाही. पण कविता स्फुरताना मात्र प्रतिभाशक्तीला भावनेचा आधार लागतो.या मुद्द्याचा परिणाम साहित्याच्या व्यवहारावर कसा होऊ शकतो ते पाहा. काव्य म्हणजे ‘स्पॉन्टेनिअस ओव्हरफ्लो ऑफ इमोशन्स’ असे वर्डस्वर्थचे उद्धरण जगभर सांगितले जाते. भले त्याला कवितेचे रूप प्राप्त होताना काहीएका शांततेची गरज लागत असेल. पण वर्डस्वर्थसारख्या कवीच्या कवितेप्रमाणेच, किंबहुना तिच्याशी बरोबरी करू शकेल अशी कविता कृबुकडून निर्मून घेता येईल, हे उघड आहे पण या कवितेत ‘स्पॉन्टेनिअस ओव्हरफ्लो ऑफ इमोशन्स’चा संबंध असणार नाही. म्हणजेच आपणाला कोठेतरी मानवाचे संवेदन (Feeling) आणि बुद्धी यांच्यात फरक करावा लागतो. भावना संवेदित होतात. They are felt. कृबुला संवेदन नसते, Feeling नसते. जाणीव (Consciousness) विकसित झाली तरी संवेदन हा तिचा भाग असेल काय?कृबुमुळे उपस्थित होणारे प्रश्न गंभीर तर आहेतच, पण ते गहनही आहेत यांचे भान ठेवणे आवश्यक आहे. तरच फुकुयामासारखे विचारवंत काय म्हणतात हे कळू शकेल.(डॉ. सदानंद मोरे इतिहास व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि संशोधक तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आहेत.)----------------------------------------------------.Technology Device : तुमचा मोबाईल यूजर फ्रेंडली आहे का? मोबाईल युझर इंटरफेसचं महत्व काय? समजून घेऊया .ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.