सुधीर कोर्टीकरसंस्कृतीमधूनच प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो. आपल्या कलासंपन्न संस्कृतीशिवाय आपले जीवन निरस आहे. असे कलागुण व छंद आपल्या जीवनाला आनंद देणारे सुमधुर संगीत निर्माण करून जातात. त्यामुळेच मानवी मन समृद्ध होते..छत्रपती संभाजीनगरचा विचार करता, स्वातंत्र्यापूर्वीपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये संगीतनाटकांची परंपरा सुरू होती. इथे नाट्यचळवळ अशी नव्हती, पण जे नाट्यकलावंत घडले, ते गणपतीच्या मेळ्यांमधून काम करत करत घडले. त्यामध्ये कुसुमताई जोशी यांचा उल्लेख करावा लागेल. त्यानंतरच्या कालखंडाचा विचार केला, तर कमलाकर सोनटक्के, पुरुषोत्तम हाऊसवाला, बाबुराव कोराने, सतीश महाजन, निवृत्त पोलिस अधिकारी एस.जी. गोखले, कुमार देशमुख, अलोक चौधरी, विजय दिवाण, त्र्यंबक महाजन, सूर्यकांत सराफ, दिलीप घारे, रमाकांत मुळे अशा नाट्यकलावंतांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. त्याचबरोबर ‘वऱ्हाड..’कार डॉ. लक्ष्मण देशपांडे यांच्या नाटकांनी तर विश्वविक्रमाची नोंद करून छत्रपती संभाजीनगरचे नाव नाट्यसृष्टीच्या साऱ्या विश्वात सुवर्णाक्षरांनी कोरले..डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाने १९७३मध्ये महाराष्ट्रात प्रथमच नाट्यशास्त्र विभाग स्वतंत्रपणे सुरू केला. त्यावेळचे नाट्य कलावंत कमलाकर सोनटक्के, लक्ष्मण देशपांडे यांनी अपरिमित मेहनत घेऊन मराठवाड्यातील विविध भागांतून येणाऱ्या नाट्यकलावंतांना इथे प्रशिक्षण दिले. याच नाट्यशास्त्र विभागात पुढे जाऊन जयंत शेवतेकर यांनी दिलेले योगदानही मोलाचे आणि महत्त्वाचे आहे. जयंत शेवतेकर यांनी डान्स-ड्रामा-योगा अशा विविध स्तरावर मोलाची कामगिरी बजावलेली आहे..नाट्यक्षेत्रामध्ये अलौकिक असे स्थान निर्माण करणारे चंद्रकांत कुलकर्णी, प्रतीक्षा लोणकर, मकरंद अनासपुरे, लक्ष्मण देशपांडे, प्रशांत दळवी, अजित दळवी, दासू वैद्य, धनंजय सरदेशपांडे यांच्या अनमोल कामगिरीमुळेच छत्रपती संभाजीनगरच्या नाट्यसंस्कृतीला मानाचे स्थान प्राप्त झाले. धनंजय सरदेशपांडे यांना नुकतेच जिगिषा ग्रुपच्यावतीने मानाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रसिद्ध नाट्यकलावंत, लेखक सूर्यकांत सराफ यांची नाट्य क्षेत्रातली कामगिरी तर अनमोल आहेच, त्याचबरोबर त्यांचा मुलगा शार्दूल सराफ आणि मुलगी केतकी सराफ यांनी नाटक, चित्रपट आणि अनेक मालिकांमधून आपले वेगळे असे वलय निर्माण केलेले आहे.अगदी हिंदी मालिकांमध्ये आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करताना सहदिग्दर्शन आणि लेखनही केले आहे..छत्रपती संभाजीनगरमधील नाट्यसंस्कृतीमध्ये दलित रंगभूमीचे कामदेखील मोठे विलक्षण आहे. दत्ता भगत, प्रकाश त्रिभुवन, राम गायकवाड, प्रताप कोचीरे या नाट्यकलावंतांनी, दिग्दर्शकांनी आणि लेखकांनी दलित रंगभूमीसाठी दिलेले योगदान साऱ्यांच्या स्मरणात राहील इतके मोठे आहे.छत्रपती संभाजीनगरमध्ये उर्दू जाणकार खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. उर्दूसाठी काही शैक्षणिक केंद्रेदेखील निर्माण केलेली आहेत. असे असले तरी उर्दूसाठी रंगभूमीकडे मात्र उर्दू भाषिकांचे पूर्णतः दुर्लक्ष झालेले आहे, हे मात्र खरे..चला हवा येऊ द्या फेम योगेश शिरसाट, बाळूमामाच्या नावानं चांगभलं, स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकांतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा रोहित देशमुख, राजा राणीची गं जोडी फेम शैलेश कोरडे, मंजिरी पवार, दीपक अंभोरे, प्रवीण डाळिंबकर, रमाकांत भालेराव, प्राजक्ता सुपेकर, सुनील कांबळे अशा कितीतरी कलावंतांनी आपल्या करिअरची सुरुवात छत्रपती संभाजीनगरमधूनच केलेली आहे.पुढे ही मंडळी मुंबईसारख्या मोठ्या नगरीमध्ये जाऊन चमकली. या कलाकारांनी सुरुवातीला राज्य नाट्य स्पर्धा, कामगार कल्याण स्पर्धा यांमध्ये भाग घेऊन त्या गाजवलेल्या आहेत. नाट्यकलावंतांचे, दिग्दर्शकांचे, संगीतकारांचे योगदान जसे महत्त्वाचे असते, तसेच नाट्यसमीक्षकांचेही. त्यांच्यामुळेच नाट्यकलावंतांची आणि नाटकांची प्रतिमा, प्रतिभा जनमानसामध्ये उमटते. अशा समीक्षकांमध्ये सुधीर सेवेकर यांचे नाव मोठ्या आदराने घ्यावे लागेल. सुधीर सेवेकर उत्तम नाट्य रसग्रहण करतात, समीक्षा करतात. सुधीर सेवेकर यांनी अनेक राज्य नाट्य स्पर्धा, कामगार नाट्य स्पर्धांचे परीक्षण, रसग्रहण केलेले आहे..गेल्या पन्नास वर्षांपासून सुधीर सेवेकर सातत्याने अनेक वृत्तपत्रांतून, मासिकांतून नाट्यसमीक्षा, नाट्यपरीक्षण केलेले आहे. सुधीर सेवेकरांनी अनेक नाट्यकलावंतांना प्रशिक्षण शिबिरांतून मार्गदर्शन केलेले आहे. त्याचबरोबर हिंदी नाट्यसमीक्षक, नाट्यपरीक्षक म्हणून सुधीर सेवेकरांचे खूप मोलाचे योगदान आहे.संभाजीनगरच्या कलासंस्कृतीचा विचार केला, तर साधारणतः १९६०च्या कालखंडामध्ये संभाजीनगरमध्ये कलानिकेतन नावाचे चित्रकला शिकवणारे एक रात्रीचे कॉलेज भडकल गेट येथे सुरू झाले होते. संपूर्ण मराठवाड्यातून शहरात येणारी मुले दिवसभर विविध कामे करीत आणि रात्री कलानिकेतनमध्ये चित्रकला शिकत असत. मात्र या कॉलेजला स्वतःची जागा नव्हती. आर्थिक पाठबळ मिळाले नाही म्हणून पुढे ते बंद पडले.साधारणतः १९७५च्या आसपास धर्मराज भोईर यांनी सातवाहन कला अकादमीची स्थापना केली. धर्मराज भोईर हे स्वतः अत्यंत चांगले चित्रकार तर होतेच, त्याचबरोबर उत्कृष्ट लेखकही होते. कलामहर्षी बाबुराव पेंटर यांचे ते शिष्य होते. त्या काळात गीत गाया पत्थरोंने या चित्रपटातील पेंटिंगचे काम व्ही. शांताराम यांनी धर्मराज भोईर यांना दिले होते आणि त्यांनी ते समर्थपणे पार पाडले..धर्मराज भोईर यांनी सातवाहन कला अकादमीच्या माध्यमातून वसंत भवन येथे चित्रकला स्पर्धा आणि नंतर त्याची प्रदर्शने भरवण्यास सुरुवात केली. भोईर यांनी या अकादमीच्या माध्यमातून मराठवाड्यातील चित्रकलेला मोठी गती दिली. त्यासाठी त्यांना यशवंतराव चव्हाण, विलासराव देशमुख, गोविंदभाई श्रॉफ, लक्ष्मण देशपांडे यांनी मोलाची मदत केली. भोईरांना शिल्पकलाही चांगली अवगत होती. भारतीय शिल्पकला आणि पाश्चिमात्त्य शिल्पकला यावर त्यांनी वृत्तपत्रांत अनेक लेख लिहिले. १९९१मध्ये त्यांना समीक्षा क्षेत्रातील महाराष्ट्रातील पहिला पुरस्कार देऊन गौरवण्यात आले..त्या काळामध्ये अनंत भालेराव यांचे दैनिक मराठवाडा यशाच्या शिखरावर होते. त्यावेळी धर्मराज भोईर दर आठवड्याला जगातील मान्यवर चित्रकारांवर लेख लिहीत असत.लेखाला अनुरूप चित्रे ते स्वतः काढत असत. हाच प्रघात पुढे रूढ झाला. महावीर जोंधळे, नागनाथ कोत्तापल्ले, गंगाधर पानतावणे, यु. म. पठाण अशा मान्यवरांच्या लेखांसाठी अनुरूप चित्रे ते काढून द्यायचे.धर्मराज भोईर यांचा वारसा त्यांचा मुलगा उदय भोईर यांनी पुढे चालू ठेवला आणि १९९५मध्ये त्यांनी राजा रविवर्मा नावाने चित्रकलेचे एक महाविद्यालय सुरू केले. या ठिकाणी डिप्लोमा, डिग्री, मास्टर्स डिग्री असे कोर्स आजही सुरू आहेत..उदय भोईर हे उत्तम चित्रकार आहेतच, त्याचबरोबर उत्तम लेखक व समीक्षकदेखील आहेत. भारतीय संस्कृतीवर त्यांनी साकारलेली चित्रे तर परदेशातही लोकप्रिय झालेली आहेत. उदय भोईर यांनी ‘नास्तिकता’ या विषयावर काढलेले चित्र हे संपूर्ण महाराष्ट्रात गाजले. त्यास पु. ल. देशपांडे यांचा मानाचा पुरस्कार देऊन अमोल पालेकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे. धर्मराज भोईर आणि उदय भोईर यांच्या अतुलनीय कामगिरीमुळे छत्रपती संभाजीनगरमधील चित्रकला क्षेत्र संपन्न झाले हे बाकी खरे.आपले कलागुण, छंद, परंपरा यामधून कलाविष्कार निर्माण होतो. ज्ञानसंपन्नतेमधूनच गुणसंपन्नता निर्माण होते. तीच खरी आपली संस्कृती आणि या संस्कृतीमधूनच प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो..आपल्या कलासंपन्न संस्कृतीशिवाय आपले जीवन निरस आहे. असे कलागुण व छंद आपल्या जीवनाला आनंद देणारे सुमधुर संगीत निर्माण करून जातात. त्यामुळेच मानवी मन समृद्ध होते.संभाजीनगरमध्ये अशाच प्रकारचे सुमधुर संगीत घेऊन येणारे केवळ मराठवाडाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या संगीताच्या माध्यमातून अगणित कार्यक्रम करणारे प्रा.राजेश सरकटे आणि त्यांचा परिवार यांनी आपल्या संगीताच्या माध्यमातून संभाजीनगरची कलासंस्कृती जपली व सातासमुद्रापार नेली.संभाजीनगरच्या संगीत क्षेत्रामध्ये प्रसाद साडेकर, अंजली साडेकर यांचेदेखील योगदान महत्त्वाचे आहे. प्रसाद साडेकर नाट्यशास्त्र विभागाचे पदवीधर असूनही संगीत क्षेत्रामध्ये आपल्या जादुई आवाजामुळे त्यांनी आपले वेगळे वलय निर्माण केलेले आहे..त्याचबरोबर संगीत क्षेत्रामध्ये अलौकिक कामगिरी करणारे लक्ष्मीकांत काळे आणि दीपा काळे या दांपत्याचेदेखील मोठे योगदान आहे. त्यांनी एक हजाराहून अधिक कार्यक्रम संभाजीनगरमध्ये करून साऱ्या रसिक श्रोत्यांना आपलेसे केलेले आहे. अनेक जाहिराती, मालिकेतील छोट्या-मोठ्या भूमिकांमधून सर्वांना परिचित असणारा संतोष तळेकर म्हणजे हरहुन्नरी कलावंत, ते नाट्यकलावंतदेखील आहेत आणि त्याचबरोबर उत्तम मिमिक्रीही करतात. त्यांनी गेल्या चार दशकांपासून संभाजीनगरमध्ये मिमिक्रीचे हजारांहून अधिक प्रयोग केलेले आहेत..एखाद्या कलावंताच्या ओंजळीत निसर्गाने किती कलागुण द्यावेत याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रेणुका जोशी. रेणुका जोशी या उत्तम चित्रकार आहेत. रेणुका नाट्य-नृत्यकला, कविता, लेखन, कथाकथन, चित्रपट, लघुपट, नाटक, अल्बम अशा अनेक क्षेत्रांमध्ये सहजतेने वावरतात. रेणुका यांना आतापर्यंत महाराष्ट्रातील तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील अठरा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.‘नवदुर्गांचा सन्मान’मध्ये छत्रपती संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांनी रेणुका जोशींची घेतलेली मुलाखत यूट्यूबवर पाहता येते. रेणुका जोशींना आंतरराष्ट्रीय नृत्य परीक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि साऱ्या संभाजीनगरवासीयांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. .रेणुका जोशीचे पती श्रीपाद जोशी हेदेखील ज्ञानसंपन्न कलासंपन्न असे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी भोंगा या चित्रपटात साहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका पार पाडलेली आहे. त्याचबरोबर या चित्रपटात त्यांनी खलनायकाची भूमिकादेखील ताकदीने केली आहे.रेणुका जोशी आणि श्रीपाद जोशी या दांपत्याने आपल्या कलासंपन्नतेतून संभाजीनगरची कलासंस्कृती जपली, विकसित केली आणि त्याची कीर्ती परदेशातही पसरवली असेच म्हणावे लागेल.अशा कितीतरी कलागुणसंपन्न, ज्ञानसंपन्न कलावंतांमुळे छत्रपती संभाजीनगरची नाट्यसंस्कृती व कलासंस्कृती आज साऱ्यांनाच प्रेरणा देणारी आणि समृद्ध झालेली आहे, असे म्हणावेसे वाटते.(सुधीर कोर्टीकर कला, संस्कृती, नाट्यअभ्यासक, समीक्षक आहेत.)-----------------------------------.Love Story : ५६ वर्षांची मी आणि ३६ वर्षांचा तो..! रिटायरमेंटच्या वयात सुरू झाली मुंबईची प्यारवाली लव्ह स्टोरी.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
सुधीर कोर्टीकरसंस्कृतीमधूनच प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो. आपल्या कलासंपन्न संस्कृतीशिवाय आपले जीवन निरस आहे. असे कलागुण व छंद आपल्या जीवनाला आनंद देणारे सुमधुर संगीत निर्माण करून जातात. त्यामुळेच मानवी मन समृद्ध होते..छत्रपती संभाजीनगरचा विचार करता, स्वातंत्र्यापूर्वीपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये संगीतनाटकांची परंपरा सुरू होती. इथे नाट्यचळवळ अशी नव्हती, पण जे नाट्यकलावंत घडले, ते गणपतीच्या मेळ्यांमधून काम करत करत घडले. त्यामध्ये कुसुमताई जोशी यांचा उल्लेख करावा लागेल. त्यानंतरच्या कालखंडाचा विचार केला, तर कमलाकर सोनटक्के, पुरुषोत्तम हाऊसवाला, बाबुराव कोराने, सतीश महाजन, निवृत्त पोलिस अधिकारी एस.जी. गोखले, कुमार देशमुख, अलोक चौधरी, विजय दिवाण, त्र्यंबक महाजन, सूर्यकांत सराफ, दिलीप घारे, रमाकांत मुळे अशा नाट्यकलावंतांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. त्याचबरोबर ‘वऱ्हाड..’कार डॉ. लक्ष्मण देशपांडे यांच्या नाटकांनी तर विश्वविक्रमाची नोंद करून छत्रपती संभाजीनगरचे नाव नाट्यसृष्टीच्या साऱ्या विश्वात सुवर्णाक्षरांनी कोरले..डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाने १९७३मध्ये महाराष्ट्रात प्रथमच नाट्यशास्त्र विभाग स्वतंत्रपणे सुरू केला. त्यावेळचे नाट्य कलावंत कमलाकर सोनटक्के, लक्ष्मण देशपांडे यांनी अपरिमित मेहनत घेऊन मराठवाड्यातील विविध भागांतून येणाऱ्या नाट्यकलावंतांना इथे प्रशिक्षण दिले. याच नाट्यशास्त्र विभागात पुढे जाऊन जयंत शेवतेकर यांनी दिलेले योगदानही मोलाचे आणि महत्त्वाचे आहे. जयंत शेवतेकर यांनी डान्स-ड्रामा-योगा अशा विविध स्तरावर मोलाची कामगिरी बजावलेली आहे..नाट्यक्षेत्रामध्ये अलौकिक असे स्थान निर्माण करणारे चंद्रकांत कुलकर्णी, प्रतीक्षा लोणकर, मकरंद अनासपुरे, लक्ष्मण देशपांडे, प्रशांत दळवी, अजित दळवी, दासू वैद्य, धनंजय सरदेशपांडे यांच्या अनमोल कामगिरीमुळेच छत्रपती संभाजीनगरच्या नाट्यसंस्कृतीला मानाचे स्थान प्राप्त झाले. धनंजय सरदेशपांडे यांना नुकतेच जिगिषा ग्रुपच्यावतीने मानाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रसिद्ध नाट्यकलावंत, लेखक सूर्यकांत सराफ यांची नाट्य क्षेत्रातली कामगिरी तर अनमोल आहेच, त्याचबरोबर त्यांचा मुलगा शार्दूल सराफ आणि मुलगी केतकी सराफ यांनी नाटक, चित्रपट आणि अनेक मालिकांमधून आपले वेगळे असे वलय निर्माण केलेले आहे.अगदी हिंदी मालिकांमध्ये आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करताना सहदिग्दर्शन आणि लेखनही केले आहे..छत्रपती संभाजीनगरमधील नाट्यसंस्कृतीमध्ये दलित रंगभूमीचे कामदेखील मोठे विलक्षण आहे. दत्ता भगत, प्रकाश त्रिभुवन, राम गायकवाड, प्रताप कोचीरे या नाट्यकलावंतांनी, दिग्दर्शकांनी आणि लेखकांनी दलित रंगभूमीसाठी दिलेले योगदान साऱ्यांच्या स्मरणात राहील इतके मोठे आहे.छत्रपती संभाजीनगरमध्ये उर्दू जाणकार खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. उर्दूसाठी काही शैक्षणिक केंद्रेदेखील निर्माण केलेली आहेत. असे असले तरी उर्दूसाठी रंगभूमीकडे मात्र उर्दू भाषिकांचे पूर्णतः दुर्लक्ष झालेले आहे, हे मात्र खरे..चला हवा येऊ द्या फेम योगेश शिरसाट, बाळूमामाच्या नावानं चांगभलं, स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकांतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा रोहित देशमुख, राजा राणीची गं जोडी फेम शैलेश कोरडे, मंजिरी पवार, दीपक अंभोरे, प्रवीण डाळिंबकर, रमाकांत भालेराव, प्राजक्ता सुपेकर, सुनील कांबळे अशा कितीतरी कलावंतांनी आपल्या करिअरची सुरुवात छत्रपती संभाजीनगरमधूनच केलेली आहे.पुढे ही मंडळी मुंबईसारख्या मोठ्या नगरीमध्ये जाऊन चमकली. या कलाकारांनी सुरुवातीला राज्य नाट्य स्पर्धा, कामगार कल्याण स्पर्धा यांमध्ये भाग घेऊन त्या गाजवलेल्या आहेत. नाट्यकलावंतांचे, दिग्दर्शकांचे, संगीतकारांचे योगदान जसे महत्त्वाचे असते, तसेच नाट्यसमीक्षकांचेही. त्यांच्यामुळेच नाट्यकलावंतांची आणि नाटकांची प्रतिमा, प्रतिभा जनमानसामध्ये उमटते. अशा समीक्षकांमध्ये सुधीर सेवेकर यांचे नाव मोठ्या आदराने घ्यावे लागेल. सुधीर सेवेकर उत्तम नाट्य रसग्रहण करतात, समीक्षा करतात. सुधीर सेवेकर यांनी अनेक राज्य नाट्य स्पर्धा, कामगार नाट्य स्पर्धांचे परीक्षण, रसग्रहण केलेले आहे..गेल्या पन्नास वर्षांपासून सुधीर सेवेकर सातत्याने अनेक वृत्तपत्रांतून, मासिकांतून नाट्यसमीक्षा, नाट्यपरीक्षण केलेले आहे. सुधीर सेवेकरांनी अनेक नाट्यकलावंतांना प्रशिक्षण शिबिरांतून मार्गदर्शन केलेले आहे. त्याचबरोबर हिंदी नाट्यसमीक्षक, नाट्यपरीक्षक म्हणून सुधीर सेवेकरांचे खूप मोलाचे योगदान आहे.संभाजीनगरच्या कलासंस्कृतीचा विचार केला, तर साधारणतः १९६०च्या कालखंडामध्ये संभाजीनगरमध्ये कलानिकेतन नावाचे चित्रकला शिकवणारे एक रात्रीचे कॉलेज भडकल गेट येथे सुरू झाले होते. संपूर्ण मराठवाड्यातून शहरात येणारी मुले दिवसभर विविध कामे करीत आणि रात्री कलानिकेतनमध्ये चित्रकला शिकत असत. मात्र या कॉलेजला स्वतःची जागा नव्हती. आर्थिक पाठबळ मिळाले नाही म्हणून पुढे ते बंद पडले.साधारणतः १९७५च्या आसपास धर्मराज भोईर यांनी सातवाहन कला अकादमीची स्थापना केली. धर्मराज भोईर हे स्वतः अत्यंत चांगले चित्रकार तर होतेच, त्याचबरोबर उत्कृष्ट लेखकही होते. कलामहर्षी बाबुराव पेंटर यांचे ते शिष्य होते. त्या काळात गीत गाया पत्थरोंने या चित्रपटातील पेंटिंगचे काम व्ही. शांताराम यांनी धर्मराज भोईर यांना दिले होते आणि त्यांनी ते समर्थपणे पार पाडले..धर्मराज भोईर यांनी सातवाहन कला अकादमीच्या माध्यमातून वसंत भवन येथे चित्रकला स्पर्धा आणि नंतर त्याची प्रदर्शने भरवण्यास सुरुवात केली. भोईर यांनी या अकादमीच्या माध्यमातून मराठवाड्यातील चित्रकलेला मोठी गती दिली. त्यासाठी त्यांना यशवंतराव चव्हाण, विलासराव देशमुख, गोविंदभाई श्रॉफ, लक्ष्मण देशपांडे यांनी मोलाची मदत केली. भोईरांना शिल्पकलाही चांगली अवगत होती. भारतीय शिल्पकला आणि पाश्चिमात्त्य शिल्पकला यावर त्यांनी वृत्तपत्रांत अनेक लेख लिहिले. १९९१मध्ये त्यांना समीक्षा क्षेत्रातील महाराष्ट्रातील पहिला पुरस्कार देऊन गौरवण्यात आले..त्या काळामध्ये अनंत भालेराव यांचे दैनिक मराठवाडा यशाच्या शिखरावर होते. त्यावेळी धर्मराज भोईर दर आठवड्याला जगातील मान्यवर चित्रकारांवर लेख लिहीत असत.लेखाला अनुरूप चित्रे ते स्वतः काढत असत. हाच प्रघात पुढे रूढ झाला. महावीर जोंधळे, नागनाथ कोत्तापल्ले, गंगाधर पानतावणे, यु. म. पठाण अशा मान्यवरांच्या लेखांसाठी अनुरूप चित्रे ते काढून द्यायचे.धर्मराज भोईर यांचा वारसा त्यांचा मुलगा उदय भोईर यांनी पुढे चालू ठेवला आणि १९९५मध्ये त्यांनी राजा रविवर्मा नावाने चित्रकलेचे एक महाविद्यालय सुरू केले. या ठिकाणी डिप्लोमा, डिग्री, मास्टर्स डिग्री असे कोर्स आजही सुरू आहेत..उदय भोईर हे उत्तम चित्रकार आहेतच, त्याचबरोबर उत्तम लेखक व समीक्षकदेखील आहेत. भारतीय संस्कृतीवर त्यांनी साकारलेली चित्रे तर परदेशातही लोकप्रिय झालेली आहेत. उदय भोईर यांनी ‘नास्तिकता’ या विषयावर काढलेले चित्र हे संपूर्ण महाराष्ट्रात गाजले. त्यास पु. ल. देशपांडे यांचा मानाचा पुरस्कार देऊन अमोल पालेकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे. धर्मराज भोईर आणि उदय भोईर यांच्या अतुलनीय कामगिरीमुळे छत्रपती संभाजीनगरमधील चित्रकला क्षेत्र संपन्न झाले हे बाकी खरे.आपले कलागुण, छंद, परंपरा यामधून कलाविष्कार निर्माण होतो. ज्ञानसंपन्नतेमधूनच गुणसंपन्नता निर्माण होते. तीच खरी आपली संस्कृती आणि या संस्कृतीमधूनच प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो..आपल्या कलासंपन्न संस्कृतीशिवाय आपले जीवन निरस आहे. असे कलागुण व छंद आपल्या जीवनाला आनंद देणारे सुमधुर संगीत निर्माण करून जातात. त्यामुळेच मानवी मन समृद्ध होते.संभाजीनगरमध्ये अशाच प्रकारचे सुमधुर संगीत घेऊन येणारे केवळ मराठवाडाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या संगीताच्या माध्यमातून अगणित कार्यक्रम करणारे प्रा.राजेश सरकटे आणि त्यांचा परिवार यांनी आपल्या संगीताच्या माध्यमातून संभाजीनगरची कलासंस्कृती जपली व सातासमुद्रापार नेली.संभाजीनगरच्या संगीत क्षेत्रामध्ये प्रसाद साडेकर, अंजली साडेकर यांचेदेखील योगदान महत्त्वाचे आहे. प्रसाद साडेकर नाट्यशास्त्र विभागाचे पदवीधर असूनही संगीत क्षेत्रामध्ये आपल्या जादुई आवाजामुळे त्यांनी आपले वेगळे वलय निर्माण केलेले आहे..त्याचबरोबर संगीत क्षेत्रामध्ये अलौकिक कामगिरी करणारे लक्ष्मीकांत काळे आणि दीपा काळे या दांपत्याचेदेखील मोठे योगदान आहे. त्यांनी एक हजाराहून अधिक कार्यक्रम संभाजीनगरमध्ये करून साऱ्या रसिक श्रोत्यांना आपलेसे केलेले आहे. अनेक जाहिराती, मालिकेतील छोट्या-मोठ्या भूमिकांमधून सर्वांना परिचित असणारा संतोष तळेकर म्हणजे हरहुन्नरी कलावंत, ते नाट्यकलावंतदेखील आहेत आणि त्याचबरोबर उत्तम मिमिक्रीही करतात. त्यांनी गेल्या चार दशकांपासून संभाजीनगरमध्ये मिमिक्रीचे हजारांहून अधिक प्रयोग केलेले आहेत..एखाद्या कलावंताच्या ओंजळीत निसर्गाने किती कलागुण द्यावेत याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रेणुका जोशी. रेणुका जोशी या उत्तम चित्रकार आहेत. रेणुका नाट्य-नृत्यकला, कविता, लेखन, कथाकथन, चित्रपट, लघुपट, नाटक, अल्बम अशा अनेक क्षेत्रांमध्ये सहजतेने वावरतात. रेणुका यांना आतापर्यंत महाराष्ट्रातील तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील अठरा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.‘नवदुर्गांचा सन्मान’मध्ये छत्रपती संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांनी रेणुका जोशींची घेतलेली मुलाखत यूट्यूबवर पाहता येते. रेणुका जोशींना आंतरराष्ट्रीय नृत्य परीक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि साऱ्या संभाजीनगरवासीयांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. .रेणुका जोशीचे पती श्रीपाद जोशी हेदेखील ज्ञानसंपन्न कलासंपन्न असे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी भोंगा या चित्रपटात साहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका पार पाडलेली आहे. त्याचबरोबर या चित्रपटात त्यांनी खलनायकाची भूमिकादेखील ताकदीने केली आहे.रेणुका जोशी आणि श्रीपाद जोशी या दांपत्याने आपल्या कलासंपन्नतेतून संभाजीनगरची कलासंस्कृती जपली, विकसित केली आणि त्याची कीर्ती परदेशातही पसरवली असेच म्हणावे लागेल.अशा कितीतरी कलागुणसंपन्न, ज्ञानसंपन्न कलावंतांमुळे छत्रपती संभाजीनगरची नाट्यसंस्कृती व कलासंस्कृती आज साऱ्यांनाच प्रेरणा देणारी आणि समृद्ध झालेली आहे, असे म्हणावेसे वाटते.(सुधीर कोर्टीकर कला, संस्कृती, नाट्यअभ्यासक, समीक्षक आहेत.)-----------------------------------.Love Story : ५६ वर्षांची मी आणि ३६ वर्षांचा तो..! रिटायरमेंटच्या वयात सुरू झाली मुंबईची प्यारवाली लव्ह स्टोरी.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.