वाघोली - वाहतूक कोंडी होते आहे. तुम्ही बाजूला व्हा, असे म्हणल्याने चिडून जावून चौघांच्या अंगावर कार घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रकार तुळापूर आळंदी रोड वर बुधवारी (दि. २८) रोजी घडला. यामध्ये चौघे जण गंभीर जखमी झाले. यामध्ये दोन तरुणींचा समावेश आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.