Khadakwasla Dam : ‘खडकवासला’तून विसर्ग वाढला ;पानशेत, वरसगावमधील साठा ९३ टक्के

पानशेत धरणातील विसर्ग वाढविल्याने शनिवारी खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग २२ हजार क्युसेकहून २७ हजार क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला.
Khadakwasla Dam
Khadakwasla Damsakal
Updated on

खडकवासला : पानशेत धरणातील विसर्ग वाढविल्याने शनिवारी खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग २२ हजार क्युसेकहून २७ हजार क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला.

खडकवासला धरणात १.६५ टीएमसी म्हणजे ८३.३१ टक्के पाणीसाठा जमा आहे. कालव्यातून एक हजार पाच क्युसेक, तर मुठा नदीत २७ हजार ०१६ क्युसेक विसर्ग सुरू आहे. दोन्ही मिळून या धरणातून २८ हजार ०२१ क्युसेक पाणी सोडले जात आहे. शनिवारी सकाळी सहा ते सायंकाळी पाच या वेळेत तेथे आठ मिलिमीटर पाऊस झाला.

पानशेत व वरसगाव या दोन्ही धरणांत सुमारे ९३ टक्के पाणीसाठा कायम ठेवण्यात आला आहे. परिणामी पावसाचे जमा होणारे पाणी धरणातून सोडले जात आहे. सर्वच धरणांच्या परिसरात शनिवारी दिवसभर जोरात पाऊस झाला.

पानशेत धरण शनिवारी सायकांळी पाच वाजेपर्यंत ९.९७ टीएमसी म्हणजे ९३.६७ टक्के भरले होते. या धरणातून एकूण ५८७३ क्युसेक पाणी सोडले गेले आहे. शनिवारी सकाळी सहा ते सायंकाळी पाच या वेळेत पानशेतला ४५ मिलिमीटर पाऊस झाला.

वरसगाव धरण शनिवारी सायकांळी पाच वाजता ११.९० टीएमसी म्हणजे ९२.८२ टक्के धरण भरले होते. या धरणातून एकूण ८३०३ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.

टेमघर धरण शनिवारी सायकांळी पाच वाजता ३.६२ टीएमसी म्हणजे ९७.७४ टक्के धरण भरले होते. या धरणातून वीज निर्मितीसाठी २७५ क्युसेक विसर्ग सुरू आहे. शनिवारी सकाळी सहा ते सायंकाळी पाच या वेळेत तेथे ३९ मिलिमीटर पाऊस झाला.

रात्री नऊ वाजता पानशेत मधून ५८७३, वरसगाव मधून ८३०३ क्युसेक तर टेमघर मधून २७५ क्युसेक असे १४ हजार ४५१ क्युसेक पाणी थेट खडकवासला धरणात जमा होत आहे.

धरण साखळीत सुमारे ९३ टक्के पाणी जमा झाला आहे. अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे पाटबंधारे चे सर्व अधिकारी कर्मचारी यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. धरणाच्या आतील आणि नदीकाठी राहणाऱ्या सर्व नागरिकांनी सतर्क राहावे.

- श्वेता कुऱ्हाडे, कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग

अधिकारी तळ ठोकून

सर्व धरणांच्या परिसरात गेल्या बारा दिवसांपासून मुसळधार पावसात पडत आहे. यामुळे खडकवासला पाटबंधारे विभागाच्या वतीने येथील सर्व ठिकाणचे शाखा अभियंता संबंधित धरणावर तळ ठोकून आहेत. पानशेतचे अनुराग मारके, वरसगावचे विकी राऊत, खडकवासल्याच्या गिरिजा फुटाणे यांच्यासह कर्मचारी धरणावर तळ ठोकून आहेत. कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे व उपविभागीय अभियंता मोहन बेदाणे, हेदेखील प्रत्येक धरणात पडणारा पाऊस त्यामुळे जमा होणारे पाणी, त्यामुळे सोडावा लागणारा विसर्ग या संदर्भात इतर सहकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.