पुणे - बदलापूर येथे घडलेल्या घटनेनंतर विद्यार्थ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या शिक्षण विभागांसह पोलिसांनीदेखील आता शाळेतील कंत्राटी कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या चारित्र्य पडताळणी तत्काळ करण्याबाबतच्या सूचना शाळांना दिल्या आहेत. त्यामुळे कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या कामगार आणि कर्मचाऱ्यांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यासाठी शाळांची धावपळ सुरू झाल्याचे दिसून येत आहे.