पुणे : ‘‘मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणे, हे एक कारस्थान आहे. हिंदू-मुस्लिम दंगल पेटवण्यासाठीच हे कारस्थान रचण्यात आले. कारण या दंगलीवर काहींना आपल्या स्वार्थाची पोळी भाजून घेता येते’’, असा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी रविवारी केला.