Latest Chakan News: लोकसभेच्या निवडणुकीत कांद्याच्या प्रश्नावर राजकारण राज्यात तापलं काही पक्षांना त्याचा फटकाही बसला तसेच काहींना फायदाही झाला . त्यामुळे राज्यात, देशात कांद्याचे राजकारण जोरात होताना दिसते. निवडणुकीतील मतावर त्याचा परिणाम होतो.
कांद्याची राजकीय बात महत्वाची ठरतेय.निवडणुकीत कांदा हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो आहे असे वास्तव निर्माण होत आहे.नुकताच अफगाणिस्तान च्या कांद्याची आयात पंजाब, दिल्ली येथे होत आहे त्यामुळे कांद्याचे भाव देशांतर्गत थोडे गडगडत आहेत असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीतही कांद्याचा प्रश्न निर्णायक ठरणार आहे असे चित्र आहे.