Ashadhi Wari : ‘दर्शन घेताना काळजी घ्या’;पालखी सोहळाप्रमुखांचे भाविकांना आवाहन

‘यंदा राज्यातील बहुतांश भागांत चांगला पाऊस झाल्याने पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे वारीत देहू-आळंदीपासूनच वारकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत’’, असे समाधान व्यक्त करत ‘‘वारकऱ्यांची संख्या वाढल्याने गर्दी भरपूर आहे, त्यामुळे भाविकांनी पालख्यांचे दर्शन घेताना काळजी घ्यावी’’
Ashadhi Wari
Ashadhi Warisakal
Updated on

पुणे : ‘‘यंदा राज्यातील बहुतांश भागांत चांगला पाऊस झाल्याने पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे वारीत देहू-आळंदीपासूनच वारकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत’’, असे समाधान व्यक्त करत ‘‘वारकऱ्यांची संख्या वाढल्याने गर्दी भरपूर आहे, त्यामुळे भाविकांनी पालख्यांचे दर्शन घेताना काळजी घ्यावी’’, असे आवाहन संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज संस्थानांच्या पदाधिकाऱ्यांनी केले.

आषाढी वारीनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचे पालखी सोहळे रविवारी पुण्यनगरीत मुक्कामासाठी दाखल झाले. यानिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज संस्थानच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ कार्यालयाला भेट देत संवाद साधला. या प्रसंगी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप, विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे हे उपस्थित होते.

‘‘इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी दोन्ही संस्थान प्राधान्याने प्रयत्न करणार आहेत. त्यासाठी सरकार आणि अन्य यंत्रणांकडे सातत्याने पाठपुरावा केला जाईल’’, अशी माहिती दोन्ही संस्थानांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

‘राज्य सरकारने नियुक्त केलेल्या नोडल अधिकाऱ्यांमुळे समस्यांबाबत समन्वय साधणे यंदा सोपे होत आहे. वारीपूर्वी सर्व बाबींबाबत प्रशासनाशी चर्चा झाली होती. त्यानुसार उपाययोजना झाल्या आहेत. त्याच्या अंमलबजावणीबाबत आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि आम्ही प्रशासनाशी दररोज संपर्कात आहोत, येणाऱ्या अडीअडचणींची त्यांना माहिती देत आहोत’’, असेही त्यांनी सांगितले. या वेळी ‘सकाळ’चे मुख्य संपादक सम्राट फडणीस उपस्थित होते.

हे लक्षात ठेवा...

  • पालखीचे दर्शन घेताना भाविकांनी स्वतःची काळजी घ्यावी

  • पालखीचा रथ आणि दिड्यांना वाटचालीसाठी पुरेशी जागा ठेवावी

  • वारीच्या वाटेवर कचरा टाकण्यासाठी पुरेशी व्यवस्था हवी

  • वारीत शक्यतो केळी फळाचे वाटप टाळावे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.