Pune District Dam Water : पुणे जिल्ह्यातील धरणांत २ दिवसांत २१.७७ टीएमसी पाणीसाठा; ‘खडकवासला’त २३.४९ टीएमसी पाणी

पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये अवघ्या दोन दिवसांत एकूण २१.७७ टीएमसी पाणी जमा झाले आहे. यापैकी खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये फक्त दोन दिवसात १.८२ टीएमसी पाणी साठा झाला आहे.
Khadakwasala Dam Water
Khadakwasala Dam Watersakal
Updated on

पुणे - पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये अवघ्या दोन दिवसांत एकूण २१.७७ टीएमसी पाणी जमा झाले आहे. यापैकी खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये फक्त दोन दिवसात १.८२ टीएमसी पाणी साठा झाला आहे. यामुळे सध्या जिल्ह्यातील सर्व धरणांमधील एकूण पाणीसाठा हा ११४.९३ टीएमसी झाला आहे. जिल्ह्यातील सर्व धरणांमधील एकूण पाणीसाठ्याचे हे प्रमाण ५७.९४ टक्के झाले आहे.

जिल्ह्यात टाटा समूहाच्या सहा धरणांसह एकूण ३२ धरणे आहेत. ‘टाटां’च्या धरणांचा अपवाद वगळता अन्य २६ धरणे असून, या २६ धरणांची मिळून एकूण उपयुक्त पाणीसाठा क्षमता ही १९८.३४ टीएमसी इतकी आहे. या २६ पैकी पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या ‘खडकवासला’ प्रकल्पांत टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही चार धरणे येतात.

या चार धरणांमधील मिळून एकूण उपलब्ध पाणीसाठा क्षमता ही २९.१५ टीएमसी इतकी आहे. यापैकी या चार धरणात आतापर्यंत २३.४९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. खडकवासला धरणात आतापर्यंत जमा झालेल्या पाणीसाठ्याचे हे प्रमाण ८०.५७ टक्के आहे. पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये उजनी, भामा आसखेड, माणिकडोह, चासकमान, पवना, मुळशी, टेमघर, वरसगाव, पानशेत, गुंजवणी, नीरा देवधर, भाटघर, वीर आदी प्रमुख धरणांचा समावेश आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये (टाटांची धरणे वगळता) गेल्या वर्षीच्या आजच्या तारखेला एकूण ८८.११ टीएमसी (४४.४२ टक्के) पाणीसाठा झाला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील धरणांमध्ये २६.८२ टीएमसी जास्तीचा पाणीसाठा झाला आहे. टक्केवारीनुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १३.५२ टक्के अधिकचा पाणीसाठा झाला आहे.

शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या चार धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या आजच्या तारखेला १९.९८ टीएमसी (६८.५१ टक्के) पाणीसाठा पाणीसाठा झाला होता. त्यामुळे खडकवासला प्रकल्पांतही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३.५१ टीएमसी जास्तीचे पाणी जमा झाले आहे.

टाटा समूहाच्या धरणांमध्ये ३२.२४ टीएमसी साठा

पुणे जिल्ह्यात टाटा समूहाची एकूण सहा धरणे आहेत. या सर्व धरणांमधील एकूण उपलब्ध पाणीसाठा क्षमता ही ४२.७६ टीएमसी इतकी आहे. यापैकी आतापर्यंत या धरणांमध्ये एकूण ३२.२४ टीएमसी (७५.३८ टक्के) पाणी जमा झाले आहे. टाटा समूहाच्या धरणांमध्ये मुळशी, ठोकरवाडी, शिरोटा, वळवण, लोणावळा व कुंडली या धरणांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.