Pune Rain : घरात पाणी शिरल्याने नागरिकांवर आली उपासमारीची वेळ

पावसाळा सुरू झाल्यापासून शहराच्या उपनगरांमध्ये ठिकठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी ड्रेनेज लाईन, नालेसफाई व पावसाळी वाहिन्यांची स्वच्छता केल्याचा पालिका प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे.
Pune Rain
Pune Rain sakal
Updated on

कँटोन्मेंट: पावसाळा सुरू झाल्यापासून शहराच्या उपनगरांमध्ये ठिकठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी ड्रेनेज लाईन, नालेसफाई व पावसाळी वाहिन्यांची स्वच्छता केल्याचा पालिका प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे. शहरात रविवारी रात्री झालेल्या जोरदार पावसानंतर काशिवाडी परिसरातील दहा नंबर कॉलनी येथील ड्रेनेज लाईन, पावसाळी वाहिन्या व नाले तुंबून अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाल्याने अक्षरशः त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. नाले सफाई करिता कोट्यावधींचा खर्च करून ही ड्रेनेज व नाल्यांची योग्य प्रकारे सफाई न झाल्याने ही परिस्थिती ओढावल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

यावेळी काही घरांमध्ये अक्षरशः गुडघ्याइतके पाणी भरले होते. त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. अनेकांना रात्रभर घरात घुसलेले पाणी उपसावे लागले. यापाण्यामध्ये चिखल व गाळाचे प्रमाण जास्त होते. परिणामी परिसरात मोठी दुर्गंधी पसरली होती. अनेकांच्या घरातील टिव्ही, फ्रिज, कपाट सर्वच साहित्य संपूर्ण पाण्यात वाहत होते. शिवाय घरातील अन्न धान्य व अनेक जीवनावश्यक वस्तूंची पाण्यामुळे नासाडी झाली. त्यामुळे सिलेंडर व शिगडी सहित सर्व साहित्य घराबाहेर काढावे लागल्याने अनेकांच्या घरात चूल पेटलीच नाही. सर्व अंथरूण पांघरूनही भिजल्याने लेकरा बाळांसहित उभे राहूनच रात्र काढावी लागली.

रहिवासी शेखर महादेव हनुमंते म्हणाले की,

पावसाळा आला की, ही समस्या गेल्या अनेक वर्षापासून यापरिसर निर्माण होत असते. भागातील एकही प्रतिनिधी विचारपूस करण्यासाठी डोकावत नाही. ड्रेनेज व नाल्यांची सफाई कधी होतच नाही.

रोशनी देवकुळे - यंदा मी दहावीत शिक्षण घेत आहे. मला आई नाही, वडील आणि भाऊ कामावर असतात. मी ही क्लास ला गेले होते. अचानक पाण्याचा लोट घरात आल्याने घरातील सर्व साहित्य पाण्याखाली गेले त्यात संपूर्ण शैक्षणिक वह्या पुस्तके की ही पाण्याखाली गेल्याने मी आता अभ्यास कसा करू असे म्हणत रोशनीचे डोळे पाणावले होते.

नगरसेवकांच्या वादात नागरिक भोवऱ्यात

याप्रभागात नगरसेवकांचा आपापसातील वाद असल्यामुळे नागरिकांचा प्रश्न सोडवण्यासाठी नगरसेवक पुढाकार घेत नाही. समस्या घेऊन गेल्यास प्रत्येकजण आपली जबाबदारी टाळून एकमेकांच्या अंगावर ढकलतात. गेल्या वीस वर्षांपासून आम्ही या गैर सुविधांच्या अभावामुळे मरण यातना भोगत असल्याचे रहिवासी कैलास गाडे यांनी सांगितले.

यावेळी सहदेव ढावरे, मनोज क्षीरसागर, विजय मोहिते, विनोद कांबळे, रोहन चौधरी या सामाजिक कार्यकर्त्यांनी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त किसन दगडखेड यांना रात्री घटनेची माहिती देऊन घटनास्थळी तत्काळ बोलावून घेतले.

यावेळी दगडखेड म्हणाले की, नाल्यामध्ये अधिक गाळ साचल्याने नाल्यांची पाणी पुढे जाण्याची पूर्णपणे बंद झाली. यावेळी त्वरित सफाई सुरू करण्यात आली आहे.

पाणी तुंबण्याचे नेमके काय आहे कारण

नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. लोखंडी, थर्माकोल, तुटलेले फर्निचर आदी साहित्य टाकण्यात आले आहे. या नाल्याच्या गेट ला कायम कुलूप लावलेले असते. याची चावी मनपा सफाई कर्मचाऱ्यांनी एका तथाकथित व्यक्तीला भाडेपोटी त्याचे समान ठेवण्यासाठी दिली आहे. असे नागरिकांनी तक्रार करत दगडखेड यांना माहिती दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.