पुणे - 'माझ्यासाठी अपंग, शेतकरी, मजुर यांची कर्जमाफी, घरकुल असे प्रश्न महत्त्वाचे आहेत. हे मुद्दे राजकारणात चर्चेला यायला पाहिजेत. याच मुद्यावर कोणाबरोबर जायचे याचा निर्णय होईल आणि त्यासाठी वेळप्रसंगी आम्ही काहीही निर्णय घेऊ शकतो.' अशा स्पष्ट शब्दात प्रहार अपंग क्रांती मोर्चाचे नेते व आमदार बच्चू कडू यांनी शनिवारी महायुती सरकारला अप्रत्यक्षपणे निर्वाणीचा इशारा दिला. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची कडू यांनी शनिवारी अचानक भेट घेत महायुतीला आणखीनच पेचात टाकले.