हार्वेस्टरने गहू, हरभरा काढणीस वेग

हार्वेस्टरने गहू, हरभरा काढणीस वेग

Published on

नीरा नरसिंहपूर, ता.१० : राज्यात चार ते पाच दिवसांपासून जोरदार वादळी पाऊस पडत आहे. पावसामुळे रब्बी पिकांसह फळबागांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नीरा नरसिंहपूर तसेच पिंपरी बुद्रुक परिसरात अधिकचे नुकसान टाळण्यासाठी काढणीला आलेल्या गहू, हरभरा पिकांची काढणी हार्वेस्टरच्या माध्यमातून वेगात सुरू आहे.
इंदापूर तालुक्यात पाऊस हजेरी लावत असून सध्या अनेक भागात कधी ऊन, तर कधी ढगाळ हवामान, तर थंडी यामुळे गहू, - कांदा पिकांना फटका बसत आहे. त्यातच वाढीच्या अवस्थेत असलेल्या कलिंगड, काकडी व भाजीपाला पिकांवरही रोग, किडीचा प्रादुर्भावाची शक्यता आहे. गेल्या महिन्यातही पावसामुळे पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली आहे. ढगाळ हवामानामुळे जोमात आलेल्या पिकांवर रोग, किडींनी आक्रमण केले आहे. सततचे बदलत्या हवामानामुळे पिकांवर रोग किडीचा प्रादुर्भाव वाढत असून फवारणीच्या खर्चात वाढ होऊ लागली आहे.
सध्याच्या वातावरणातील बदलामुळे शेतातील गहु, बाजरी, हरभरा, मका काढणीला वेग आला आहे. तर केळी, द्राक्ष, डाळिंब, पपई पिके वाचविण्यासाठी औषध फवारणी करावी लागत असल्याचे अशोक बोडके, आबासाहेब बोडके, बाळासाहेब घाडगे, तुकाराम बोडके, शशिकांत सूर्यवंशी यांनी सांगितले. काकडी, शेपू, मेथी, भेंडी, गवार, शेवगा आदि भाजीपाल्यावरही अवकाळी पावसाचा मोठा परिणाम दिसून येत असल्याचे रणधीर मोहिते, प्रकाश बोडके, तुकाराम घोगरे, फणिंद्र कांबळे यांनी सांगितले.

03257

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.