सरहद आणि वंदेमातरम्तर्फे
लोकचळवळ उभी करणार

सरहद आणि वंदेमातरम्तर्फे लोकचळवळ उभी करणार

पुणे, ता. १ : महाराष्ट्र आणि बंगाल यांच्यात ऐतिहासिक नाते आहे. देशाच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक चळवळीचे नेतृत्व या राज्यांनी केले आहे. याला उजाळा देण्यासाठी सरहद आणि वंदेमातरम् संघटनेच्या वतीने वंदेमातरम् गीताच्या १५० व्या वर्षपूर्तीनिमित्त महाराष्ट्र बंगाल मैत्री पर्व या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरुणांना सोबत घेऊन दोन राज्यांना एकत्र आणण्यासाठी लोकचळवळ उभी करण्यात येईल, अशी माहिती लेशपाल जवळगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे २५ युवक-युवतींनी नुकतीच बंगालला भेट दिली. त्या वेळी बंगालमधील सामाजिक, राजकीय, साहित्य, शिक्षण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या मान्यवरांच्या भेटी घेण्यात आल्या. या राज्यांतील संबंध आणखी दृढ करण्यासाठी काय पावले उचलायला हवीत याबद्दल चर्चा करण्यात आली, असेही जवळगे यांनी सांगितले.
या वेळी सत्यजित पवार, अभिषेक आहेर, उमेश वाघ, वैभव साळुंके उपस्थित होते.
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com