Gram Panchayat Election : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल कधी वाजणार?

गुडग्यालाबाशिंग बांधून काहीजण जोरदार तयारीत
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल कधी वाजणार?
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल कधी वाजणार?Sakal
Updated on

Chakan News : येत्या काही दिवसांमध्ये लोकसभेच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होणार आहे. त्यापूर्वी राज्यातील काही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी वार्डातील आरक्षणाची सोडत नुकतीच झाली आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या मतदानासाठी मतदार याद्याही प्रसिद्ध होणार आहेत.

आरक्षण सोडत झाल्यामुळे व प्रत्येक ग्रामपंचायतीला सरपंच कोण होणार हे सर्व जाहीर झाल्यामुळे ग्रामपंचायतीच्या सदस्य, सरपंच निवडणुकीसाठी अनेकांनी कंबर कसली आहे. काहीजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले आहेत.गावातील प्रत्येक वाडी, वस्त्यांवर प्रस्तावित उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत.

यात महिलावर्गही आघाडीवर आहे. तसेच ज्या महिलांना सरपंच पदाची संधी आहे त्या महिलांचे पतीराजही आघाडीवर आहेत.येत्या काही महिन्यात लोकसभा निवडणुका होणार आहे. ग्रामपंचायत निवडणुका लोकसभेच्या निवडणुकीनंतर जून किंवा जुलैमध्ये होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती होणार आहे. असा काही वरिष्ठ सूत्रांचा अंदाज आहे.

चाकण औद्योगिक वसाहतीमुळे आर्थिक विकास झालेल्या गावातील ग्रामपंचायतीचे आर्थिक उत्पन्न मोठे असते. त्यामुळे त्या गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष असते. आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या ग्रामपंचायतीचा पुढारी आपण असलो पाहिजे.

ती ग्रामपंचायत आपल्याच गटाच्या ताब्यात पाहिजे अशी प्रत्येकाची काही राजकीय पुढार्‍यांची, नेत्यांची, कार्यकर्त्यांची इच्छा असते.चाकण औद्योगिक वसाहतीच्या परिसरात तसेच खेड तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या ग्रामपंचायती आपल्या पक्षाकडे आपल्या गटाकडे ताब्यात असण्यासाठी अगदी आमदार, पक्षाचे पदाधिकारी यांची मोठी रस्सीखेच असते.

ग्रामपंचायतीचे सरपंच पद कोणत्या घटकासाठी आहे ते आपल्या ताब्यात राहण्यासाठी प्रत्येक पक्ष, प्रत्येक कार्यकर्ते आमदारही अगदी मंत्रीही प्रयत्न करतात. आपल्या पक्षाच्या ताब्यात अनेक ग्रामपंचायती असल्या पाहिजेत असाही अनेकांचा होरा असतो.

गाव पातळीवरील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला विशेष महत्त्व आले आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत लाखो,कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते. उमेदवारांचा प्रत्यक्ष कागदावरचा खर्च नगण्य असतो परंतु प्रत्यक्षातील पडद्यामागचा खर्च कोट्यावधी रुपयांचाही होतो असे वास्तव आहे.

हॉटेल,ढाब्यातील जेवणावळीपासून बाकी सर्व प्रकार भेटवस्तु देणे, मताला पैसे देणे, साड्यांचे वाटप करणे आदी प्रकार उमेदवार मतदारांसाठी चालू करतात. अगदी एका मताला दहा, वीस, पंचवीस हजार रुपयेही दिले जातात.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एका मताला ही महत्त्व असते. एका मतानेही उमेदवार विजयी,पराभूत होत असतो.म्हणून एका,एका मतांची आकडेवारी महत्त्वाची असते.त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला विशेष महत्त्व आहे.

ग्रामपंचायतीच्या सरपंच पद व वार्डातील आरक्षणाची सोडत निघाल्यामुळे गावातील पदाधिकारी, कार्यकर्ते आतापासूनच प्रचार करू लागले आहेत. दिवसा,रात्री मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. बैठकाही घेत आहेत.लोकसभेच्या निवडणुका केव्हाही जाहीर होऊ शकतात.

फेब्रुवारी,मार्च महिन्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार की लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर जून, जुले महिन्यात निवडणुका होणार अशाही चर्चा रंगत आहेत.वरिष्ठ सूत्रांच्या माहितीनुसार लोकसभा निवडणुका झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे.तोपर्यंत प्रशासक राहणार आहे.

खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी सांगितले की, "खेड तालुक्यात चाळीस ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी वार्डातील आरक्षणाच्या सोडतीचा कार्यक्रम नुकताच झालेला आहे. निवडणुकीचा प्रोग्राम आमच्याकडे सध्यातरी आलेला नाही. निवडणुका केव्हा होतील हे सांगता येत नाही."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.