N. R. Narayana Murthy: भारताला ग्लोबल लीडर म्हणण्यास नारायण मूर्तींचा आक्षेप, इन्फोसिसचे प्रमुख नेमकं काय म्हणाले?

Manufacturing hub in India: देशातील आघाडीची आयटी कंपनी इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी उत्पादन क्षेत्रात चीनशी स्पर्धा करण्याच्या भारताच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. चीनचा जीडीपी भारताच्या तुलनेत सहा पट अधिक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
N. R. Narayana Murthy
N. R. Narayana MurthySakal
Updated on

N.R. Narayana Murthy: देशातील आघाडीची आयटी कंपनी इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी उत्पादन क्षेत्रात चीनशी स्पर्धा करण्याच्या भारताच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. चीनचा जीडीपी भारताच्या तुलनेत सहा पट अधिक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अशा परिस्थितीत मॅन्युफॅक्चरिंग हब फॉर इंडिया असे शब्द वापरणे धाडसाचे आहे. देशातील उत्पादन क्षेत्राच्या विकासासाठी सरकारचा सहभाग आणि सार्वजनिक प्रशासनात सुधारणा आवश्यक आहे.

नारायण मूर्ती पुढे म्हणाले की, चीनला मागे टाकण्याच्या आणि भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्याच्या स्वप्नांमध्ये देशाला कठीण आव्हानांचा सामना करावा लागला आहे.

चीन वर्ल्ड फॅक्टरी

मॅन्युफॅक्चरिंग हब आणि भारतासाठी ग्लोबल लीडर सारख्या जड शब्दांचा वापर करणे टाळले पाहिजे, ते म्हणाले की चीन यापूर्वीच जगातील मॅन्युफॅक्चरिंगचा कारखाना बनला आहे.

N. R. Narayana Murthy
Sovereign Gold Bond: गुंतवणूकदारांना मोठा धक्का! सरकार SGB योजना बंद करण्याच्या तयारीत; काय आहे कारण?

चीनचा जीडीपी भारतापेक्षा सहा पट जास्त आहे. अशा परिस्थितीत, उत्पादन क्षेत्रात भारत ग्लोबल लीडर होईल असे म्हणणे आपल्यासाठी अत्यंत धाडसी आहे. जीडीपी हे एक महत्त्वाचे आव्हान आहे जे भारताला पार करणे आवश्यक आहे.

भविष्याबद्दल बोलताना मूर्ती म्हणाले की, एआयच्या वाढत्या प्रवाहात मानवी सर्जनशीलता कायम राहील असा त्यांचा विश्वास आहे.

मूर्ती यांनी असेही म्हटले की उद्योजकांना बाजाराच्या परिस्थितीचे अधिक चांगले मूल्यांकन करण्यासाठी आणि मूल्य वाढविण्यासाठी गणितीय मॉडेल वापरणे शिकले पाहिजे. ते म्हणाले, उद्योजकांना बाजाराचे मूल्यांकन करणे शिकावे लागेल.

N. R. Narayana Murthy
LinkedIn: 9 ते 5 शिफ्ट इतिहास जमा होणार; लिंक्डइनच्या सह-संस्थापकाचं भाकीत, कोण जास्त पैसे कमावणार?

यापूर्वी नारायण मूर्ती यांनी अमेरिकन संस्था एमआयटी, हार्वर्ड आणि स्टॅनफोर्ड यांचे उदाहरण देताना म्हटले होते की माजी विद्यार्थ्यी संस्थांना कोट्यवधी रुपये दान करतात आणि संस्थांमध्ये मोठे संशोधन येथे केले जाते.

भारतातील आयआयटीसारख्या सर्व संस्था अजूनही आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारवर पूर्णपणे अवलंबून आहेत. इथल्या माजी विद्यार्थ्यांनी आयटी उद्योगाच्या प्रगतीमध्ये योगदान दिले पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.